Sunday 31 January 2010

25-11-2009

मी, तुम्ही रजेवर असतानाच विचार केला होता, याविषयी लिहिले होते, आणि भावाशी बोललो होतो, कि, हे सर्व शिक्षण वगैरे बोलायला ठीक वाटत्ते, राहिला प्रश्न पत्रकारितेचा वागैरेचातर ते त्यालाही माहितीत आहे कि, मी उस्मानाबादला हे डिग्री न घेताही करू शकतो कारण माझे मित्र असे कांही कोर्स न शिकतादेखील लोकमत/सामना सारख्या दैनिकात उपसंपादक आहेत. ते मला बोलावतात देखील, तो प्रश्न वेगळा मात्र माझी व्यावहारिक अडचण अशी आहे कि, मला सध्याच्या नोकरी विषयी आहे/नाही माहिती नाही.
दुसरी बाब नकारात्मक असली तरीही अशी कि मला, आता 'सोब्रायटी' पेक्षा आर्थिक स्थिरता महत्वाची वाटते.त्यासाठी प्राथमिकता मी नोकरीला देणार आहे.कारण घरच्यांचा अनुभव कांही ठीक नाही.त्यामुळे उगाच हातचे सोडून आणि दारूचा बागुलबुवा करून काही अर्थ नाही असे वाटते.
तिसरा मुद्दा असा कि, मला जो आर्थिक सुरक्षेशी निगडीत आहे तो अस कि, माझे वैयक्तिक पैसे असतील तर मला कुठेही लॉजवर वगैरे स्वतंत्र राहू शकेन, राहता येईल. पुन्हा स्लीप, शारीरिक आजार यासाठी मदतीसाठी यावे लागणार नाही.अस एक हेतू आहेच.
चौथा मुद्दा असा कि, घरच्यांचा प्रश्न येतो तेंव्हा मी त्यांना काय किंवा त्यांनी मला काय उगाच एकमेकांना दोष देण्यापेक्षा वेगळे झालेले बरे.कारण शेवटी प्रत्येकाला आपले आपले आयुष्य असतेच.
राहिला मुद्दा जसे वैशाली मॅडम सांगतात तसे बौद्धिक वगैरेचा तर पण त्याने पोट भारत नाही.तसे काही कौशल्य माझ्यात नाही. तेंव्हा एकटे राहणे अवघड नाही आणि जिथे २० वर्ष काढली तिथेतर मुळीच नाही.
मी इथे येण्यामागे स्वतःसाठी वेळ देणे, आपले काय चुकते? आपण अशी दारू का पितो? आपला दुसऱ्यांना त्रास का होतो? हे सर्व पहिले, कारण नुसतेच असे व्यसनमुक्ती केंद्रात राहून नंतर घरून कांहीच प्रतिसाद मिळत नाही.तेंव्हा तीही डीपेन्डसी सोडावी हा निर्णय घ्यावालागतो कारण मी माझे प्रमाणपत्रे कुठे दारू पिऊन घालवले नाहीत, तर घरातच गहाळ झाली आहेत.
तेंव्हा या सर्वांचे ओझे तरी मी का वाहावे? मला राहण्यासाठी एक बॅग पुरते! त्यांच्याकडे राहिलो तर ते केंव्हाही हेच करतात, करू शकतात म्हणून दारूपासून लांब राहाचे ते तर पाहूच पण परत गड्या आपला गाव बरा!कारण सर्व गोष्टी गृहीत धरल्या तरी हे बोलायला, वरवर चांगले वाटते, पण मदतीची वेळ आली कि, अनुभव फारसा चांगला नसतो.त्यामुळे तिथे जास्तीत जास्त बडतर्फीची शक्यता गृहीत धरले तरी अपील करावे लागेल.त्यामुळे जास्त डोके चालवायचे नाही असे ठरवले आहे.
सर्वच गोष्टी सांगायच्या नसतात पण मी कुठेही जाण्यामागे कांही उद्देश असतात, त्यामुळे जसा दारूचा त्रास होऊ लागला म्हणून मी इथे आलो, तसा सोलापूरला जाण्यामागेही एक उद्देश होता कि, मला 'मटका' थोडा कलतो, आणि पोलिसांची भीती वाटत नाही या जमेच्या बाजू असल्याने तिथे काम करावे म्हणून गेलो तर, 'आचारसंहितेमुळे' सर्व थंड होते.म्हणून परत औरंगाबादला आलो, तिथे परत दारू चालू झाली. उगाच बहिणीला त्रास नको म्हणून भावाला इथला पत्ता दिला.


23-11-2009

शनिवारी भाऊ आला होता काय बोलणे झाले माहित नाही.पण एक मात्र निश्चित कि सर्व सकारात्मकच असेल.
पुन्हा एकदा सहज विचार करताना प्रामाणिकपणे वाटते कि आता दारूपासून लांब राहणे जमेल, इतके दिवस उगाच आजारीपणा,अनामिक भीती, याला घाबरून गेलो, पण लगेच वाटते कि नाही..
कारण सरकारी नोकरी आज सहजासहजी लागत नाही, त्यात स्थिरता आहे.उगाच दारूचा बाऊ करण्याची गरज नाही, वाटते काहीही करून परत जावे.पण अंतस्थ हेतू परत आर्थिक कारनापाशी घोटाळताना दिसतो. 'मी दुसरे कांही दारू शकत नाही' हि भीती [खरी आणि उगाचही कदाचित असेल] पण आहे. व्यावहारिक दृष्ट्या सरळ साधं आयष्य त्यात आहे मात्र तेथील आता काही माहिती नसल्यामुळे दारूची मात्र भीती वाटते.असो. यासंदर्भात प्रत्यक्ष बोलेन.
आज करकरे मॅडमनी हस्तलिखित अंकासाठी इतरांकडून तसेच माझीही कांही लिखाण जमवा असे सांगितले, मी आणि अजून इतर दोघे-चौघे बरेच लिहू शकतो पण सर्वांनी काहीतरी द्यायला हवे [कारण काहीही लिहिले तरी आपणच वाचणार!] असो.
आता qt मध्ये बोअर करण्याऐवजी मुद्द्याचेच लिहिणार आहे कारण उगाच डोक्याला ताप नको! तुमच्याही आणि माझ्याही!
नमस्कार,
हे बरं झालं कि, तुमच्या qt मुळे आमच्या डोक्याला ताप होतो असं तुमचं मत आहे.
तुमच्या आयुष्याबद्दल इतर कुणीही काहीही निर्णय घेण्यापेक्षा तुमच्या मनात काय प्लानिंग आहे हे एकदा कळलं कि, त्या योजनेतील अडथळे, शक्यता यांचा अंदाज येईल.
आणि सोन्याचा पिंजरा आपल्याला मान्य नसला तरी त्या पिंजऱ्यात येण्या-जाण्याचं स्वातंत्र्य आपल्या उत्तम कृतीने आपण ठरवू शकतो.
आपण प्रत्यक्ष बोलूया.
संगीता जोशी मॅडम

माया {चित्रकार विन्सेंट वानगॉग कि कल्पित प्रेमिका माया से}



अप्सरा ओ अप्सरा!
शहजादी ओ शहजादी!
विन्सेंट की गोरी!
तुम सच क्यूँ नही बताती?

यह कैसा हुस्न और कैसा इश्क!
और तू कैसी अभिसारिका!
अपने किसी महबूब की
तू आवाज क्यों नहीं सुनती?

दिल में एक चिनगारी डालकर
जब कोई साँस लेता है
कितने अंगारे सुलग उठते है,
तू उन्हें क्यों नही गिनती?

यह कैसा हुनर और कैसी कला!
जीने का एक बहाना है
यह तखय्यल का सागर
तू कभी क्यों नही नापती?

अप्सरा ओ अप्सरा!
शहजादी ओ शहजादी!
तेरा ख्याल न आर देता है
न पार देता है

सूरज रोज ढूंडता है
मुंह कंही दिखता नही
तेरा मुंह, जो
रात को
इकरार देता है

तड़प किसे कहते है,
तू यह नही जानती
किसीपर कोई अपनी
जिन्दगी क्यों निसार करता है

अपने दोने जहाँ
कोई दाँव पार लगता है
नामुराद हँसता है
और हार जाता है

अप्सरा ओ अप्सरा!
शहजादी ओ शहजादी!
इस तरह लाखों खयाल
आयेंगे चले जायेंगे

तेरा यह सुर्ख जहर
कोई रोज पी लेगा
और तेरे नक्श हर रोज
जादू कर जायेंगे

तेरी कल्पना हँसेंगी,
कोई रात-भर तडपेगा
और बरस के बरस
इस तरह बीत जायेंगे

हूनर भूका है, ऐ रोटी!
प्यार भूका है, ऐ गोरी!
तेरे कितने वानगॉग
इस तरह मर जायेंगे!

अप्सरा ओ अप्सरा!
शहजादी ओ शहजादी!
हुस्न कैसा खेल है
कि इश्क जीत नही पाता

रात जाने कितनी कलि है--
उम्र को भी जला के देख लिया
चाँद-सूरज कैसे चिराग है
कोई जल नही पाता

ऐ अप्सरा! तुम्हारा बुत
और गेंहू कि एक बाली
वह कैसी धरतियाँ है
कुछ भी उग नही पाता

हुनर भूखा है, ऐ रोटी!
प्यार भूखा है, ऐ गोरी!
निजाम का पेड़ कैसा है,
जिसमे कोई फल नही आता....


अमृता प्रीतम
संकलक:प्रवीण कुलकर्णी



20-11-2009

आज आउटपुट मध्ये जोशी सरांनी एक गोष्ट सांगितली, सांता सिंग नामक काल्पनिक पेशंटची...
तो इथे ९० दिवस उपचार घेतो, सर्व कांही इथले 'रुटीन' पार पडतो, जाताना तो सर्वाना भेटतो.[कारण वेळोवेळी त्याने सर्वच कौन्सिलर्सची मदत घेतलेली असते.] सरानाही तो भेटतो, सर त्याला विचारतात, 'पुढे काय करणार?' तो म्हणतो, 'दारूपासून कसे लांब राहायचे हे मी इथे शिकलो आहे.प्रश्न तो नाही, नोकरी पहिली अथवा पर्यायी मिळेल!'
आता त्याला फॅमिली हवी, छान मुले हवीत, यासाठी सुंदर बायको हवी! पण....
ती 'प्रेग्नन्ट' हवी!!
मी ग्रीकल्चर नंतर जोशी सरांना भेटलो. मी त्यान सांगितले कि, 'माझी देखील गोष्ट कांहीशी अशीच आहे, पण हाईट म्हणजे मला बायको 'प्रेग्नंट' च नको तर 'आयत्या लेकराची' हवी! [डिल्हीव्हरी देखील खर्च नको!]
सरांना मी माझा निर्णय सांगितला, त्यांनी त्यासंदर्भात मार्गदर्शन केले.क्षमता व मर्यादा लिहून काढण्यास सांगितले.तसेच मी त्यांना सांगितले कि, मदत जास्त काळ गृहीत धरणार नाही हेदेखील स्पष्ट केले.
इथे आता इतके मार्गदर्शन उपलब्ध असताना माझ्या मनात कांही संभ्रम नाहीत हे खरे, कारण प्रत्येक निर्णय माझ्यादृष्टीने महत्वाचा आहे.तसे इथे काय, घरी काय, किंवा सरकारी अथवा दुसरी नोकरी काय, स्थितीशीलता मला नको आहे.इथे आत्मविश्वास, पर्याय, मदत, मार्गदर्शन इत्यादी कृतज्ञतेचे साधने मला मिळतात म्हणून आधार वाटतो, पण त्यातच
स्थितीशीलता येऊ लागली तर कांही अर्थ उरत नाही.कारण घर असो वा रीहॅब सोन्याचा असला तरी पिंजऱ्यात रहायला कोणाला आवडणार? काही काळ स्वतःसाठी देणे आवश्यक आहे. कारण मला सामन्यात: अनिश्चीततेपेक्षा स्थिरता केंव्हाही हवी आहे.कारण विचार करण्याची क्षमता जिथे दारूच्या बाटली भोवती फिरत होती ती किमान आता स्वतः भोवती फिरते आहे.बरेच मुद्दे, गोष्टी सध्या माझ्या हातात नाहीत, शिवाय घरचा प्रतिसाद काय? माहित नाही. अशा वेळी मी काहीही ठरवले, self talk कितीही चांगला असला तरी कांही [जशा आर्थिक] माझ्या हातात हातात नाही.त्यासंबंधी भावाशी आपल्याशी बोलल्यावर पुढील मार्ग दिसेल.
दुसरा महत्वाचा प्रश्न उस्मानाबादचा नोकरीचा कारण इथे कांही करण्यासाठी तिथला निर्णय घेणे आवश्यक आहे कारण सरकारच्या दृष्टीने मी अनधिकृत गैरहजर, बेपत्ता आहे.
त्यामुळे मी आपल्याशी व भावाशी चर्चा करून निर्णय घेईन.


Nasha Vol 1

भारताची राजनीती : मराठी शायरी






भारताची राजनीती, समजण्याला लागत
षंढताही खूप, थोडी-थोडकी ना लागते
खूप केला यत्न आम्ही, आम्हास नाही समजली
ना
कळो आम्हास, आहे पुष्कळांना समजली
आता कशाची लाज, आता काश्मीरही देऊ अम्ही
काय त्याने भारताचे व्हायचे आहे कमी
दिल्ली जरी गेली तरीही, हार ना आम्ही म्हणू
उंचावूनी लुंग्या स्वतःच्या 'जय जगत' आम्ही म्हणू

बोलू नका कैलास, आम्हा धार्मिकता कोठे नको
गाऊ नका शिवभूप, आम्हा जातीयता कोठे नको
आहे निधर्मी राज्य येथे, अस्मिता नुसती हवी
केंव्हाच ना सांगू अम्ही, का हवी, कसली हवी

नेवो स्त्रिया ओढून, त्यांना केंव्हाच ना शत्रू म्हणू
काय मोठे त्यात, आम्ही मेहुणे त्यांना म्हणू

होता असा अपहार आम्हा, खेदही नाही तसा
नाहीतरी षंढास त्यांचा,
उपयोगही नसतो तसा

सांगतो निक्षून आम्हा, शांती हवी शांती हवी
सांगतो तीही पुन्हा, अमुची नको, त्यांची हवी

ऐसे नव्हे या भारती या, बुद्ध नुसता जन्मला
नुसताच नाही बुद्ध येथे, आहे शिवाजी जन्मला
वीरतेची भारती या, ना कमी कधी झाली
आमचा इतिहास नुसता, इतिहास ना झाला कधी
हीच आहे हौस आम्हा, व्हावया समरी शहीद
बाजी प्रभूही आज आहे, आज जो अब्दुल हमीद

बोलला इतुकेच अंती, 'आगे बढो, आगे बढो'
धर्माहुनीही श्रेष्ठ आपुल्या, देशास जो या समजला
जन्मला जो जो इथे तो, वीर आहे जन्मला
अध्यात्मही या भारताचा, युद्धात आहे जन्मला

भाऊसाहेब पाटणकर
संकलक:प्रवीण कुलकर्णी



Saturday 30 January 2010

सूर्य आणि शायर:मराठी शायरी


भास्करा, येते दया मजला तुझी अधीमधी
आहेस का रे पाहिली तू, रात्र
प्रणयाची कधी?

[यावर सूर्य शायराला उत्तर देतो]

आम्हासही या शायराची, कीव येऊ लागते
याच्या म्हणे प्रणयास याला, रात्र यावी लागते
ना म्हणू की इश्क त्याला, आहे जराही समजला
इष्कातही दिवसास की जो रात्र नाही समजला
खेळू नको बेधुंद ऐसा, चंद्रा अरे, तारांसवे
घे जरा लक्षात आहे, रोहिणीही तुजसवे
पृथ्वीवरी असतास जर का, छंद तू हा घेतला
खास तुझिया रोहिणीने, डायव्होर्स असता घेतला

तोंडही जेंव्हा कुणाला, दावू नयेसे वाटते
दुनियेसही आमुच्यात कांही, तेंव्हाच आहे वाटते

नजरेस मिळवी नजर वा, नजरेस तू येवू नको
यातील कांही कर हवे ते, वाया अशी जाळू नको

भाऊसाहेब पाटणकर
संकलक:प्रवीण कुलकर्णी

मजेत मी!


आयुष्य बेचिराख तरीही मजेत मी!
आली व्यथा कवेत, व्यथेच्या कवेत मी!

आताच तो उदास लपंडाव संपला;
थोडे उजाडताच....मिळालो सचेत मी!

झाला जमा अखेर निराधार हुंदका;
आता नसो खुशाल कुणाच्या कवेत मी!

आता कसा निवांत सुखनैव सोसतो,
घेतो मधून श्वास फुलांच्या हवेत मी!

येती तशी अजून घराची निमंत्रणे;
रस्त्यावरी उभाच मनाच्या सभेत मी!

माझा मी उगीच पणा प्राण लावला;
गेला चुकून ताल तरीही समेत मी!

सुरेश भट
संकलन:प्रवीण कुलकर्णी

कथा ही पहिल्या प्रीतीची


कथा ही पहिल्या प्रीतीची, मनाच्या नवथर भीतीची,
कशी सांगू कुणा सांगू, व्यथा त्या अपुऱ्या भेटीची?
कथा ही पहिल्या प्रीतीची!

सैलसर वळणाच्या वाटा
मनातुनी सळसळल्या लाटा
उमटला अंगावर काटा
उगा भ्याले, मुकी झाले, विसरले बोली ओठीची
कथा ही पहिल्या प्रीतीची!

उगा का काळीज धडधडलं?
पाखरू उरात फडफडलं
कसं ग काहीच ना घडलं?
कशी बाई, खुळी मीही, हरवली दौलत गाठीची?
कथा ही पहिल्या प्रीतीची! जरा तो गालांतच हसला
हसला, पुन्हा नाही दिसला
भाबडा जीव माझा फसला
नको ते ते, मनी येते, अता मी रडते रातीची!
कथा ही पहिल्या प्रीतीची!

शान्ता ज.शेळके
संगीत:दशरथ पुजारी
संकलन:प्रवीण कुलकर्णी


उन्मत्त..


उन्मत्त श्वापदांची आली वरात आली
जिंकून राजरस्ते घुसुनी वरात आली

एकही सज्जनाचे घर सोडिले न यांनी
प्रत्येक सत्विकाच्या बेडी करात आली

जमले थव्याथव्यांनी तांडे समर्थकांचे
लाचार गांडूळांची भक्ती भरात आली

जे माननीय होते लाचार तेही झाले
अब्रू पितामहांची सस्त्या दरात आली

गणवेश घातलेले मारेकरी सभोती
देण्यास लाच टोळी ही मंदिरात आली

मुर्दाड नागड्यांचा हा चालला तमाशा
ज्योती खुडून साऱ्या ही काळरात्र आली

विकिले न हात ज्यांनी झेलावयास थुंकी
कळ एक जीवघेणी त्यांच्या उरात आली

मंगेश पाडगावकर
संकलन:प्रवीण कुलकर्णी

नास्तिक...


एक खराखुरा नास्तिक जेंव्हा देवळाबाहेर थांबतो,
तेंव्हा खरं तर गाभाऱ्यातच भर पडत असते
की कोणीतरी आपापल्यापुरता सत्याशी का होईना,
पण प्रामाणिकपणे राहिल्याच्या पुण्याईची!

एक खराखुरा नास्तिक जेंव्हा देवळाबाहेर थांबतो
तेंव्हा शक्यता होते निर्माण
देवाने आपला आळस झटकून देवळाबाहेर येण्याची!

एक खराखुरा नास्तिक जेंव्हा देवळाबाहेर थांबतो
तेंव्हा कोऱ्या नजरेने पाहात राहतो
सभोवतालच्या हालचाली, भाविकांच्या जत्रा...
कोणीतरी स्वतःचे ओझे स्वतःच्याच पायांवर
सांभाळत असल्याचे समाधान देवालाच!

म्हणून तर एक खराखुरा नास्तिक जेंव्हा देवळाबाहेर थांबतो
तेंव्हा देवाला एक भक्त कमी मिळत असेल कदाचित,
पण मिळते आकंठ समाधान एक सहकारी लाभल्याचे!

देऊळ बंद झाल्यावर एक मस्त आळस देऊन
बाहेर ताटकळलेल्या नास्तिकाशी गप्पा मारता मारता
देव म्हणतो, 'दर्शन देत जा अधून मधून...
तुमचा नसेल विश्वास आमच्यावर,
पण आमचा तर आहे ना!'

देवळाबाहेर थांबलेला एक खराखुरा नास्तिक
कंटाळलेल्या देवाला मोठ्या मिन्नतवारीने परत पाठवतो देवळात
तेंव्हा कुठे अनंत वर्षे आपण घेऊ शकतो दर्शन,
अस्तिकत्वाच्या भरजरी शालीत गुदमरलेल्या देवाचे....

एक खराखुरा नास्तिक जेंव्हा देवळाबाहेर थांबतो....

संदीप खरे
संकलन:प्रवीण कुलकर्णी

सखये १


मोबाइलच्या भरवशावरी आता जगतो सखये
'एस.एम.एस.' तू पाठवलेले वाचत बसतो सखये

जे जे करता आले ते ते इलाज सारे केले
विसरायचे तेच नेमके का मी स्मरतो सखये

या पृथ्वीच्या गोलाईवर कसा भरोसा ठेवू
कुठे तरी भेटशील म्हणुनी वणवण फिरतो सखये

नियतीने हि अखेर केली शिकार दो हॄदयांची
विच्छिन्न झाल्या दर्पणात मी तुला शोधतो सखये

आज ना उद्या कधी तरी तू होशील बघ परक्याची
हाच विषारी विचारप्याला प्राशित असतो सखये

इतिहासाची पुनरावृत्ती होते तर मग व्हावी
आशेवरती ह्याच 'इलाही' सखये जगतो सखये

इलाही जमादार
संकलन:प्रवीण कुलकर्णी

स्वप्न


शापच आहे मला संगमरवरात स्वप्न
लपवून ठेवण्याचा.
पांडुरंगाच्या चरणाला प्रक्षाळन करणारी
चंद्रभागा मी पाहिली नाही, आत्मसंवादाची
हीच प्रचीती आली माउलीच्या उरावर
पाय ठेवताना.
शापच आहे मला संगमरवरात स्वप्न
लपवून ठेवण्याचा.
प्राणांचे मोल देऊन मुक्ती विकत घेत
असतो मी; देहूच्या बाजारात अभंग
विकणाऱ्या तुकारामाप्रमाणे-शापच आहे
मला संगमरवरात स्वप्न लपवून ठेवण्याचा.
चाहुलवेड्या वाटूलीच्या प्रतीक्षेत चरणगंधाच्या
स्मृतीचे फुल उमलताना पहिले नाही मी,
वाचली नाही सांद्र तमागारात काजव्याने
रचलेली प्रकाश गाथा; पण फुटलेल्या
डोळ्यांच्या निरांजनात तुला ओवाळणारी शिळा
पहिली आहे रे....
शापाचा आहे मला संगमरवरात स्वप्न
लपवून ठेवण्याचा.
ग्रेस
संकलन:प्रवीण कुलकर्णी

18-11-2009

मी इथे पहिल्या महिन्यात होतो त्यावेळी करकरे मॅडमचे एक इनपुट विचारप्रक्रिये संदर्भात होते. त्यावेळी विचार करण्याबाबत मी उस्फुर्तपणे उद्गारलो होतो, 'कि, दोन क़्वार्टर मारल्याशिवाय आपलं तर डोकंच चालत नाही!'
यावर हसून
मॅडम म्हणाल्या, आमचं चालतं बुवा! तर सांगण्याचा उद्देश असा कि, आता या चार महिन्यात मी दारू न पिता थोडा 'विचार' केला आहे.
माझा मूळ मुद्दा कांहीच न करण्यापाशी जो अडत होता किंवा तोच अधोरेखित करून स्वयंकेंद्रित न राहता थोड्या सर्व शक्यता पडताळून केला आहे.वेळेत लिहिता येणार नाही पण जेवढे येईल तेवढे लिहितो आहे.
मी प्रथमच उल्लेख केल्याप्रमाणे मला मूळ नोकरी 'विस्तार अधिकारी' किंवा वरिष्ठ सहायक म्हणून पदावर नेमणूक मिळेल अथवा न मिळेल, पण प्राप्त परिस्थितीत आहे ते पद आवश्यक वाटते.हे मी नमूद केलेले आहेच.
त्यासाठी मला तेथील सध्या कांहीच माहिती नाही, मात्र नियमात असल्यास सर्व प्रयत्न करून परत मिळवू धाकतो, हि एक शक्यता.
मग हा प्रश्न येतो कि, माझ्या अधिकाऱ्याने मला वेळ दिला होता तेंव्हाच मी का गेलो नाही?
# त्यानंतर २-३ वेळा रीहॅब झाले तरी का नाही?
# आर्थिक सुरक्षा आताच महत्वाची का वाटते?
# वडिलोपार्जित जी कांही मालमत्ता आहे ती आताच का हवी?
उत्तरं कांही सरळ नाहीत, कारण असुरक्षितता हे महत्वाचे कारण आहे.
मी इथे येण्याआधीच स्वतःसाठी वेळ हवा, दारू आता पुरे झाली हि उद्दिष्टे घेऊन आलो.
आता दुसरा भाग असा कि, मी पत्रकारितेचा अभ्यास वगैरे करीन तेंव्हा करीन [कारण रीहॅबमध्ये ते शक्य नाही याची मला जाणीव आहे.आणि तसेही शैक्षणिक वर्षाला अजून बराच अवधी आहे.] पण त्याच वेळी मला दोन गोष्टी करायच्या आहेत..
१ आहे ती नोकरी सोडणे.
२ वडिलोपार्जित जमीन वगैरेचा नाद सोडून देणे.
कारण माझ्या आताच्या अनुभवानुसार मी त्या पातळीवर मदत मिळेल म्हणून कदाचित कृतीशून्य आहे.
दुसरे क्षेत्र, पत्रकारिता वगैरे करून त्यात यश मिळेल कि नाही हे महत्वाचे आता नाही.करणे, सुरुवात करणे,त्याचबरोबर एखादी नोकरी शोधणे [कामाची, पगाराची अपेक्षा फार न ठेवता] कारण सद्यस्थितीत घरच्यांचा प्रतिसाद अनुकूल असावा अशी अपेक्षाआहे.
याचबरोबर शक्यता दोन, हे सर्व लिहिणे वरवर फार आदर्श वाटते पण, उद्या भावाने मदत माकारली, नोकरी नाही, सरकारी, खाजगी दोन्हीही नाही, सर्व बाजूने प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली तर? त्यावेळी मी काय करणार? निदान जगण्यासाठी आवश्यक पैसे देणारी पर्यायी नोकरी आता किंवा कालांतराने [म्हणजे किती?] हे ठरवणे भागआहे.

मी आतापर्यंत यासंदर्भात तरी मनमानीच केली; स्वतःच निर्णय घेतले, यावेळीही स्वतःच घ्यायचा आहे, मनमानीच आहे पण माझ्यापेक्षा जास्त ज्यांना कळत, ज्यांच्यावर मी सध्या अवलंबून आहे, किंवा पुढील वाटचाल आहे अशांना विचारून, चर्चा करून घ्यायचा आहे.[ तसाही हा कांही ज्वलंत राष्ट्रीय प्रश्न नाही!]
राहिला प्रश्न मर्यादांचा, क्षमतांचा तर मी स्वतःला कधी आणि कुठे सिद्ध केले? कोणत्या कसोटीवर पारखले? म्हणून लगेच कस लागणार?
एक गोष्ट मात्र निश्चित कि, निर्णय कांहीही असला तरी, प्रतिसाद दारूचा देऊ नये हि प्रामाणिक इच्छा आहे....हि झाली आपली रडकथा! आता थोडा रिलीफ...!
मागे संगीता मॅडम इथे कांही कामासंबंधी बोलल्या होत्या, त्यावेळी तिथे जोशी सरही होते, त्यावेळी मी हसलो, मी का हसलो ते सरांना,मॅडमना कदाचित कळले नसेल! त्याचा आता खुलासा करावा वाटतो....
त्याचं असं आहे, एक दिवस 'सरकारी' काम केलं की माणूस 'सरकारी' होतो! मी तर तब्बल तीन वर्षे केलं आहे! [पुढे जे विधान करणार आहे त्याची सत्यता पटवण्यासाठी इथे तीन सरकारी नोकर आहेत, अप्पा, शंकरराव, राहुल त्यांना विचारा!
तर आमच्या डिक्शनरीत 'नाही' हा शब्द नसतो! काहीही काम सांगा, [करणे अथवा न करणे; शक्यतो करणे आमच्या हातात असते!] आणि शक्यतो करणे शक्य नसले तरीही आम्ही 'नाही' कधीही म्हणणार नाही!
कुणी जर भर टळटळीत उन्हात 'सूर्याचा चंद्र करा' म्हंटले तरी तितक्याच शांतपणे, आत्मविश्वासाने आम्ही "होय" म्हणतो!
तेंव्हा मी 'नाही' म्हणणे ही रिकव्हरी ची पहिली पायरी!

नमस्कार,
साहित्यिक विश्वात रमणार असाल [कारण त्याबद्दल तुमचं ज्ञान आणि शैली उत्तम आहे.] तर या संदर्भात कांही तरी निर्णय घेण्याची गरज आहे.कारण आपण पुढील आयुष्यासाठी कांहीच ठरवले नाही.इथे किंवा घरी राहून कशाचाच त्रास नसू शकतो; परंतु आपल्या वागण्यामुळे ही परिस्थिती कायम टिकू शकत नाही. त्यामुळे यासंदर्भात कांहीतरी निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरु करा.
संगीता जोशी
मॅडम



16-11-2009

मला इतरांकडून उत्तरे नको असती तर लिहिण्याचा तरी प्रपंच कशाला केला असता? मात्र बोलताना संदर्भ नीट नसतात म्हणून कदाचित असेल...असो.
मी नौकरी विषयी लिहिल्यावर आपण जे लिहेले होते कि, बौद्धिक पात्रता वगैरे तर माझे सगळे नाकारण्याच्या दिशेने चालू असते. कारण खरे पाहता, एवढेतर सामान्यत: सातवी पास मुल्ल्गादेखील लिहू शकेल, त्यात कांही विशेष नाही.
मागे qt मध्ये हाच मुद्दा लिहिला तेंव्हा संगीता मॅडमनी सांगितले कि, एकंदर तुम्हाला दुसऱ्याकडूनही आपली नालायकी वदवून घेऊन 'बाटलीत स्वतःला बंद करून घ्यायचे आहे.'
हाही मुद्दा कांही अंशी खरा आहे पण जेंव्हा आज पुन्हा मी वारंवार qt मध्ये लिहितो तोच मुद्दा, कि मला भावना, संवेदना यापेक्षा बेसिक नीड्स या महत्वाच्या वाटतात.यावर rebt च्या तासात करकरे
मॅडमनी मुलभूत गरजा-सुरक्षा-ओळख-आत्मसन्मान-आत्मज्ञान; असा त्रिकोण दाखवला.
त्या त्रिकोणात आज तरी मला बेसिक नीड्स चं महत्व जास्त आहे.बौद्धिक पात्रता नाकारूनही जेमतेम आहे हे मान्य पण सध्या त्याने पोट भारत नाही हे खरं आहे.त्यामुळे मी त्याला प्राथमिकता दिली तर त्यात कांही गैर आहे असे मला वाटत नाही. शिवाय स्वतःची निर्णयक्षमता असली तरीही त्यावर विश्वास ठेवणे अवघड वाटते.
भावाने यासंदर्भात संगीता
मॅडमशी बोलून काय ते ठरवू असे सांगितले आहे.तरी स्वतःवर विश्वास नाही अशी सद्यस्थिती आहे.पत्रकारीतेसंदर्भात संजय मोघे यांना बोललो ते माहिती देईन म्हणाले.
पण परत एकटा पडलो तरीही बेसिक नीड्स आता आवश्यक वाटतात. परत एक छोटी गोष्ट...[कारण कुठेतरी, कांहीतरी वाचलेलं असतं, दारूमुळे सकाळचे दुपारी आठवत नाही, किमान तेवढाच व्यायाम!] तर,एक 'जू' नावाचा चीनी तत्वज्ञ नदीकिनारी मासे पकडत बसलेला असतो.तेथे सम्राटाचा राजदूत येतो.तो जूला सांगतो कि, आपणांस सम्राटांनी पंतप्रधानपदी नियुक्त केले आहे.
जू क्षणभर थांबतो, त्याला विचारतो, 'तू सम्राटांचे संग्रहालय पहिले आहेस काय? तेथे एक मोठी ढाल आहे. ती कासवाच्या पाठीची आहे.तो कासव जर आज हयात असता तर, त्याला संग्रहालयात राहायला आवडले असते कि, दलदलीत?'
राजदूत उत्तरतो, 'दलदलीत' जू त्याल म्हणतो, 'तर मग आता तू आपल्या सम्राटाना सांग कि, मी इथे मुक्त मासे पकडत दलदलीतच बरा आहे.'
माझ्याबाबतीत विरोधाभास असला तरीही बेसिक नीड्स ज्याला दलदल म्हणू तेथे मिळत असतील तर मगच बाकी बौद्धिक,भावना, संवेदना वगैरेना पुन्हा अर्थ येतो!
कदाचित इतकी वर्षे दारू पिऊन पिऊन डोके बधीर झाल्याने कांही असंदर्भ लिखाण होत असेल तर क्षमस्व!

Friday 29 January 2010

टच मी टच मी..

देखा जो तुझे यार..

अल्ला हो अकबर..

प्यार दो प्यार लो..

जिहालेमस्ती-मुकून-ब-रंजिश

तेरा साथ है कितना प्यारा..

हर किसीको नहीं मिलता..

परदेसियाँ..

ये देश है वीर जवानोका.

तय्यबअली प्यार का दुश्मन.

सज रही गली मेरी अम्मा..

पट्टी रॅप..

कजरारे..

चल छैंया छैंया..

.हम्मा..

टेक इटइझी उर्वशी..

मुक्काला..मुकाबला...

बन्नी बन्नी..

आ आंटे अमलापुरम.

सिन्नदो[तेलगू ]

धूम मचाले..२

धूम मचाले..

बुरे बुरे...

संया संया..

ओ मेरी मेरी जोहराजबीं..

मौजाही मौजा...

नगाड़ा बजा..

व्हाइट व्हाइट फेस देखे..

दय्या दय्या दय्या रे..

हम न समझे थे..

होषवालोंको खबर क्या..

तुम इतना जो मुस्करा रहे हो..

झुकी झुकी सी नजर..

होटोंसे छू लो तुम..

दिखाई दिए यूँ ..

किसी नजरको तेरा..

दिल के अरमा

आपकी नजरोने समझा..

अजीब दास्ताँ है ये..

आनेवाला पल जानेवाला है

.मै जिस दिन भुला दु..

हमे और जीने की चाहत न होती..

तेरे बिना भी क्या जीना

13-11-2009

मी जास्त दिवस सोबर [फक्त न पिता] राहिलो नाही हे अगदी खरं आहे.त्यामुळे मला प्रथम त्याबद्दलच भीती वाटते.यासंदर्भात पुन्हा एकदा खलील जिब्रानची एक छोटी गोष्ट आठवली.
एक छोटी वाडी असते..कुत्र्यांची.त्यात बरीच कुत्री राहत असतात.पण आपापसात कलह, विद्रोह, भांडण, मारामारी, प्रचंड असते.त्यात एक वेगळा, समाजसुधारक, 'नेता' या गटात मोडणारा एक कुत्रा असतो.तो सतत विचारीपणाने सर्वाना 'बाबानो, भांडू नका, शांत राहा' वगैरे असे आवाहन न थकता सातत्याने करत असतो.तो विचारीपणाने हे करत असतो.
एके दिवशी अचानक सर्व कुत्री भांडायची, मारामारी करायची थांबतात.आठवडा होतो, महिना होतो, सर्वत्र शांतता प्रस्थापित झालेली असते.हा 'सुधारक' कुत्रा अस्वस्थ होतो.मग तो एक युक्ती करतो.के दिवशी पहाटे एकटा लपून माळावर जातो.व स्वर बदलून तारस्वरात किंचाळू,भुंकू लागतो.ते ऐकून पुन्हा इतर कुत्री मूळपदावर येतात.सर्व पुन्हा नित्यनियमाने चालू होते.मग हा 'नेता', 'सुधारक' कुत्रा परत वापस येऊन आपले 'दुकान' चालू करतो...'बाबानो, शांत राहा, भांडू नका!'
जिब्रानची कथा जरी पथदर्शन,मार्गदर्शनाचा अविर्भाव करून अनुयायांना परत वाममार्गाला लावणारे राजकीय, सामाजिक उपहासगर्भ लेखन असले तरी, माझ्या संदर्भात....
माझ्या मनात अशीच एक कुत्र्यांची वाडी असते.ह्यात बरेचसे तर्कदुष्ट, तर्कविसंगत कुत्री सतत आपसात कलह करीत असतात.हा 'नेता', तर्कनिष्ठ, तर्कसंगत कुत्रा त्यांना समजावत असतो...
एके दिवशी त्याच्या समजावण्याने ही तर्कदुष्ट, तर्कविसंगत कुत्री कलह बंद करतात.[काळ :कांही दिवस, कांही महिने]
आता नंतर ही तर्कशुद्ध, तर्कनिष्ठ आणि तर्कसंगत कुत्रा...याचे दुसरे अजून एक नाव 'युक्तिवाद' आहे! हा असाच माळावर जाऊन वेगळा सूर काढतो, मग सारी तर्कदुष्ट, तर्कविसंगत कुत्री पुन्हा आपला कलह राजरोस सुरु करतात;
मग हा तर्कनिष्ठ, तर्कसंगत कुत्रा परत त्यांना वाटेवर आणण्याचा प्रयत्न केल्याचे दाखवतो.

टीप: एवढे सगळे लिहिण्यापेक्षा सरळ, सध्या शब्दात 'मला सर्व कांही सुरळीत असताना टेन्शन मध्ये राहावे वाटे, हे करण्यासाठी दारू प्यावी लागते!कारण त्याने टेन्शन आपोआप क्रिएट होते!'एवढे दोन वाक्ये सांगणे;बोलणे जीवावर येते.
एवढे कौन्सिलर इथे हजार असतात पण कधी विचारू वाटत नाही, बिडीझोन मध्ये फालतू, वायफळ बडबड पुरे म्हणेपर्यंत चालू असते मात्र कामासंदर्भात मात्र योग्य ठिकाणी [इथे वा कुठेही] तोंड उघडत नाही.
लोक कांही अंतर्ज्ञानी नसतात हे कळते पण बोलू वाटत नाही हे खरे.हा दोष आहे हे मान्यही आहे पण तो कसा
घालवावा ते कळत नाही.कारण योग्य ठिकाणी न बोलल्यामुळे मला मुळात काय हवंय ते समोरच्याला [घरात, बाहेर] कळलेले नाही. असे थोडे आता जाणवत आहे.
दारूच्या गुत्त्यात जेवढे बोलतो त्याच्या २% जरी घरात, किंवा कामाच्या ठिकाणी बोललो तरी चालले असते असे आता वाटते.

नमस्कार,
स्वतःला 'का' हा प्रश्न विचारून बघा ना कि मी का बोलत नाही? कदाचित तुम्हाला इतरांकडून उत्तरं नको असतील, कदाचित तुम्हाला आमच्याशी बोलायला जमत नसेल तर का?
पुढच्याबद्दल अविश्वास कि स्वतःबद्दल खात्री नाही? इतक्या शक्यतांपैकी कोणती आहे का बघा.
आपण नक्की बोलू.
वैशाली जोशी मॅडम





11-11-2009

आज 4th स्टेप विषयी इनपुट/आउटपूट मध्ये चर्चा झाली.तशी मी पहिल्यांदाच उल्लेख केल्याप्रमाणे माझी खुन्नस वगैरे घरच्यांविषयी कि, माझ्यावर अन्याय झाला वगैरे वगैरे पण विश्लेषण केले असता मी मागेच लिहिले तसे कि, मी जबाबदारी घेऊ शकलो नाही
प्रश्न त्या सर्व विश्लेषणात संपत नाही.आज सर्व मुद्दे पुन्हा एकदा लिखित स्वरूपातील वाचले, मनन केले तर, नव्याने एक जाणवले कि, मी कोणाचाच आपला होऊ शकत नाही, हा मानला तर दोष पुन्हा प्रकर्षाने जाणवला.
वस्तुत: अतिमद्यपान हे पलायनवाद आहे हे मलाही कळते, समजते पण कशापासून? कुठपर्यंत? याव्हे उत्तर बऱ्यापैकी qt आणि वर्क पेपर च्या माध्यमातून लिहिली आहेत पण तरी पुन्हा कोणाचा आपला न होणे हे थोडे लिहावे वाटले.कारण माझे तर सर्वच आहेत.मला ते हवेही आहेत.हवे असतात.त्यांच्यावर मी हक्क गाजवतो, पण त्यांना देखील कधी माझी गरज लागत असेल असे मला वाटत नाही.तसे उदाहरणे भरपूर आहेत.[म्हणजे आजपर्यंत तेच {तेच} केले आहे.] त्यामुळे हि टोचणी जास्त लागते.याची जाणीव जेवढी तीव्र तेवढे लांब पाळावे असे वाटते.पण पुन्हा तोच मुद्दा, कुठपर्यंत?
मी लहान होतो तेंव्हापासून पाहू, [वेळेअभावी जास्त लिहिता येत नाही]
उदा: मी लहान म्हणजे १० वर्षांचा होतो तेंव्हा माझा भाऊ ३ वर्षांचा होता, आम्हा दोघांत सात वर्षाचे अंतर आहे.मध्ये दोन लहान बहिणी, तर त्याचे केस वाढलेले होते.फार छान दिसे.मी मनात येई तेंव्हा त्याच्याशी खेळी, त्याला सांभाळण्यासाठी एक बाई होती, एरवी तो मन्ना [ती बाई] कडेच राही.पण मी बाहेर जाताना रडत माझ्याकडे येई.अपेक्षा असे कि, मी खांद्यावर बसवून एखादी चक्कर गल्लीतून मारून आणावी.
उलटपक्षी मी भीती दखवून सतत त्याला परत पाठवी.तसेच वडिलांनी त्याला पैसे दिले असल्यास ते मी काढून घेई आणि मग चक्कर मारून सोडून देई,मागतो रडत बसे.
आज २४ वर्षानंतर देखील परिस्थिती तीच; दवाखाना,व्यसनमुक्ती केंद्र,ह्यात गेल्या वर्ष-सवावर्षात रोख अडीच ते तीन लाख रुपये खर्च झाला आहे.सहल,राहणे, पुस्तके, प्रवास, कपडे वगैरे इतर खर्च वेगळाच.काम करण्याची अपेक्षा नाही.अपेक्षा साधी आणि एकाच कि, प्रकृतीची काळजी घ्यावी,दारू पिऊ नये एवढीच![तीदेखील मला त्रास होतो म्हणून!]
तर एवढी साधी अपेक्षा मी पुरी करू शकत नाही.याची खंत[guilt ] वाटते.म्हणून आपले जरी असले तरी आर्थिक भार त्यांच्यावर येऊ नये म्हणून आपले आहे ते आर्थिक स्वातंत्र्य थोडे स्वार्थी होऊन महत्वाचे वाटते, एवढेच.

नमस्कार,
तुमच्या भावना अगदी समजतात कारण कधीकधी समोरच्याचं खूप चांगलं असणं ह्याचंही ओझं वाटतं.व जरी ते माणूस कांही डिमांड करत नाही तरी त्या चांगुलपणाचं ओझंच होऊन जातं.
लहानपणाचे जे अनुभव तुम्ही लिहिले आहेत त्यातून स्वतःची संवेदनशीलता तुम्हाला जाणवतेय हे कळतंय.पण माझं म्हणणं अनावधानानं ज्या चुका घडतात त्या ठीक पण आता अवेअरनेस आलाय तर त्याबद्दल कांही करता येईल का? माफी मागणं हे छान उत्तर आहे पण मी म्हणेन कि, तसं करून तुम्ही परत प्यायलात तर त्या माफीची गोडी त्यांना वाटणार नाही.उलटपक्षी सोबर राहून [बराच काळ, सतत] जे हे सगळं नुसतं गप्पांच्या ओघात बोलाल तरी हे त्यांना केवढं मोठं असेल.
तर तुम्हाला घरच्यांबद्दल जे कांही वाटतंय ना ते gratitude असेल.प्रेम, बोच, गिल्ट हे सगळं वाटणं तुम्ही सकारात्मक बदल करून वेगळे वागलात तर त्यांच्यापर्यंत नक्की पोचणार आहे.एक कायम लक्षात ठेवणे कि, शब्दांपेक्षा माणूस कृतीतून जे कांही बोलतो ते फार परिणामकारक असतं.तर तसं कांही करून पहा.
दुसरी गोष्ट आर्थिक स्वावलंबनाची, जी मला अगदी पटते व महत्वाची वाटते.कारण इथला अनुभव असा दिसतो कि, खूप मोकळा वेळ व सोब्रायटी एकत्र टिकत नाहीत.तेंव्हा काम करणं हे तर फार जरुरी आहे पण मला असं वाटतं कि, ज्यात बुद्धीला चालना किंवा challenge असेल असा जॉब तुम्ही निवडलात तर तुम्हाला मजा येईल.मग तो आवडीने टिकेलही.कारण तुमच्या पास्ट मधल्या नोकऱ्या व तुमची बौद्धिक पातळी ह्यात मला विशेष मेळ दिसत नाही.तेंव्हा पैशाच्या जोडीने जॉब सॅटीसफॅक्शन मिळेल असा कामधंदा शोधलात तर बरं असं मला वाटतं.
विचार करा व लिहा.
वैशाली जोशी मॅडम






09-11-2009

मी मागेच याविषयी लिहिले होते.पण याबाबत संगीता मॅडमशी बोला असे लिहिल्यामुळे ते टाळले.सध्यातरी इथे राहून नेमके आपल्या समस्या तरी काय आहेत हे थोडेफार समजू लागले आहे.
त्यातून मी दिवाळीत भावाशी बोललो तर भाऊ म्हणाला कि, 'ठीक आहे पण तू उस्मानाबादला जाशील तर कदाचित परत दारू चालू होईल.'
मी म्हणालो, 'अरे, तसे पहिले तर गाडीची पाटी बघितल्यापासून मला क्रेव्हिंग,बसेशन, वगैरे जे काय म्हणतात ते सगळं सुरु होतं बघ!पण शेवटी जावं तर लागेलचना! तिथे माझे कुणी न पिणारे मित्र वगैरे नाहीत.बोलणारा वगैरे असेल तर तो देखील दारूडाच, कामाचे ठिकाणी सहकारी दारूडेच!मग कुणाकुणाला टाळणार?
याआधी मला अगदी कुणालाही बोलायला, भेटायला जाण्याआधी दारू प्यावी लागत असे.त्याच्याशिवाय मी दोन शब्द धड बोलूही शकत नव्हतो.याविषयी मी विचार केला, तशी माझ्या व्यसनाची सुरुवात जरी कमी वयात झालेली असली तरी अठरा-एकोणीस वयापर्यंत मी ज्याला 'सोशल'म्हणू शकू या पातळीवर फक्त रात्री किंवा कधीतरी दिवसा पीत असे.या काळात क्रिकेट मंडळ, सार्वजनिक मंडळाच्या कामासाठी नेते, सामाजिक कार्यकर्ते, पोलीस स्टेशन ला जावे लागत असे.तेथे ,'अरे, याला बरोबर घ्या, याला चांगलं बोलता येतं' असं म्हणत.मग नंतर २-४ वर्षात दारूमुळे मी एकटा पडत गेलो.बोलणे वगैरे संबंध संपला.कुणाला बोलायला, कुणात मिसळायला नको वाटते, किंवा दारू पिल्याशिवाय बोलावे वाटत नाही.
गेल्यावर्षी 'मुक्तांगण' मध्ये डॉ.नाडकर्णी यांनी सर्व पेशंटना वेळ दिला होतं, मी माझी समस्या त्यांना सांगितली, ते म्हणाले, बरेच वर्षे दारू पिल्याने असे होते.ते कायम नसते.याला 'सोशल फोबिया' असे म्हणतात.यावर डॉ.गाडेकरांनी कांही औषधे दिली, पण मी दारू प्यायला सुरुवात केल्याने ती औषधे घेतली नाहीत, तशी गरजही वाटत नाही.कारण दारू असल्यावर औषधाची गरजही वाटत नाही!नसतेही!
तर या पार्श्वभूमीवर आपल्याला नेमकं काय होतंय हे कळणं आणि सद्यस्थितीत नोकरीच्या ठिकाणी काय परस्थिती आहे हे ठाऊक नाही.तेंव्हा मॅडमच्या सल्ल्याने तेथे जाणे ठरवले आहे.
कारण याआधीच qt मध्ये लिहिल्याप्रमाणे मी कधी काहीच काम केले नाही किंवा करायची इच्छाच नसेल तर काही उपयोग नाही.दोन बाबी तर माझ्याबाबतीत स्पष्ट आहेत...
याआधी देखील आणि आताही मी इथे 'मला बरे वाटावे म्हणून आलो आहे' त्यामुळे माझ्यादृष्टीने सध्या जरी आर्थिक दृष्ट्या मदत करीत असले तरी समजा उद्या मी दुसरे क्षेत्र निवडले, त्यात अपयश आले, किंवा परत स्लीप झाली तर ते मदत करतीलच असे नाही,त्यामुळे अनिश्चिततेचे तत्व जरी गृहीत धरले तरी यापुढे मला 'आर्थिक अवलंबित्व 'नको आहे.त्यामुळे 'सोब्रायटी' टिकवणे हे गृहीत धरूनच माझ्यादृष्टीने 'आर्थिक सुरक्षा' महत्वाची वाटते.
नमस्कार,
आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभं असणे हि फार महत्वाची व स्वतःला छान वाटणारी गोष्ट आहे.त्यामुळे ते एक [अनेक ध्येयांपैकी] ध्येय ठाव्ने फार संयुक्तिक आहेच.त्यानुसार कांहीतरी प्लांनिंग करणे.
तुम्ही जे म्हणताय कि बाहेर पडल्या पडल्या प्रलोभने आहेतच पण तुमची जी मनातली, कल्पनेतली भीती
[स्वतःच्या सोबर राहण्याची] आहे.
कदाचित वास्तवात एवढी नसेलही, विचार करून सांगा.
तुम्ही जे उस्मानाबाद बद्दल लिहिलंय त्याबद्दल एक छान गोष्ट मला माहित आहे.भेटलो कि आठवण करा, मी सांगेन!
वैशाली जोशी मॅडम



Thursday 28 January 2010

06-11-2009

एकदा एखादी भावना, विशेषत: राग आला की तो कळतो, तो त्या त्या प्रसंगापुरता मर्यादित राहत नाही, त्याला मागचे कांही अनुभव जोडले जातात...तो तीव्र होतो.....तो व्यक्त करू नये हे कळते...चिडचिड होते...पुढे..एक विचार...पद्धतशीरपणे थोड्या प्रमाणात व्यक्त करून[तसे दाखवून] पण स्वतः थोडी चिडचिड वगळता अस्वस्थ न होता प्रसंग हाताळला तर त्याला नाटक तर म्हणू शकत नाही, की, दुसऱ्यांना सांगतो, 'त्यात काय एवढं?आणि स्वतः पहा केवढा चिडतो?'हे ऐकणे अपेक्षित असूनही ते करतो ..तेंव्हा याला काय म्हणावे?
असा एक छोटासा प्रसंग काळ घडला होता.[इथल्या तुलनेने मोठाच!] निमित्त होते कुत्रीने चप्पल पळविण्याचे, खूप शोधली , सापडली नाही.थोडा चिडलो, कुत्रीला एक लाथ मारली!वास्तविक इथे मी सारंग सरांना नवी चप्पल आणण्याविषयी सांगितले होते, शिवाय मला इथे कुणाकडे दोन जोड आहेत{माझ्या पायाचे,मापाचे}ते माहिती होते.एक दिवसासाठी त्याने नाहीही म्हणले नसते, इथे विषय संपला होता, संपण्यास हरकत नव्हती.पण कांही पूर्वग्रहांमुळे नंतर उगाच जसे कांही मला प्रचंड रागच आला आहे असे दर्शवित मी 'कुत्री मारूनच टाकीन' वगैरे बोलत बसलो.खरे पाहता राग किंवा संताप खरच मनात असता तर, वर्तनात displesment [विस्थापन] म्हणून इतर कुणावर राग किंवा कुणाशी गैर वागलो असतो...पण तसेही नाही..तसेही कांही केले नाही..कारण बाब साधी तरीही माझ्या दृष्टीने महत्वाची होती.
प्रसंग महत्वाचा नाही पण जी थोडी चिडचिड झाली त्यात विश्लेषण केले तर आढळले की मुळात मुद्दा चप्पलचा नव्हता तर..माझी पूर्वीपासूनची 'समस्या' मी मदत मागतं नाही!, का मागावी?..कुणी दिल्यास घेण्यास संकोच करतो.
यामागेही मी का मागावे? हा विचार प्रबळ ठरतो.समस्या काय? तर चप्पल कुत्रीने पळवली!मग समस्येचे मूळच नष्ट करा, कुत्रीच मारून टाका!म्हणजे लोकांकडे मागायला नको!
अर्थात हा अविवेकी विचार आहे हे मान्य आहे.पण मी माझ्या पूर्वायुष्यात [मी आजही कुत्र्यांना भितो हे खरे आहे.]केवळ कुत्रा अंगावर आला, भुंकला, म्हणून खरेच जीवानिशी मारूनही टाकले आहेत.पण आता हे बदलाने आवश्यक वाटते.
आदर्शवाद वगैरे गप्पा मारायला, बोलायला चांगला वाटतो पण माझ्यासारख्या सामान्य दारुड्याला या साध्या साध्या वाटणाऱ्या गोष्टीतच टेन्शन येतं बुवा!
त्यामुळे आज जिथे कुत्री मारू वाटली, तिथे उद्या माणूस मारू म्हटले तरी कांही विशेष वाटणार नाही.कारण तेही पूर्वी सख्या आईपासून ते बाहेर सगळीकडे केलेच आहे.
तेंव्हा आतातरी reaction तात्काळ देत नाही हेच महत्वाचे.
response देईन तेंव्हा देईन!

नमस्कार,
एवढं awareness आहे तर reaction चा response नक्की होईल अशी मला आशा आहे.विचार करणं, वाचन करणं ह्या सगळ्यात तुम्ही अगदी तरबेज आहात, problem फक्त implementation [प्रत्यक्षात उतरवण्याबद्दल आहे]
तुम्ही जे त्या खेळाबद्दल लिहिले आहे, त्यात तुम्ही तुमचा awareness इतरांना दाखवत नाही हे खरे आहे पण तरीही मागे जाऊन विचार असा करा की, कुठेतरी न्यूनगंड नाही ना?
यापुढे काय करायचं ह्याबद्दल विचार केला आहात का?कांही प्लान आहे का?
वैशाली जोशी मॅडम

04-11-2009

aभंकस करणे हा स्वभावच होऊन गेला आहे.मला ज्या विषयात बऱ्यापैकी ज्ञान, माहिती आहे तो विषय; समोरचा माणूस सांगू लागतो, मी वेडयाचे[अडाणीपणाचे] सोंग घेऊन ऐकतो, प्रश्न विछारतो, तो प्रामाणिकपणे निरसन करतो.हा माझा आवडता खेळ.कारण माझ्या बोलीभाषेवरून वगैरे मी काही शिकलासवरलेला वगैरे अजिबात वाटत नाही.[पण थोडाफार शिकलो आहे.] त्यात देशी दारूच्या दुकानात याची मजा फार येते.त्यात भर म्हणजे मागच्या तीन वर्षात नोकरीत शिपाई, चतुर्थश्रेणी पद!याचा तर ह्या खेळात फार फायदा होतो.कारण समोरच्याचे माझ्याबद्दल तुच्छ मत होते.मग मी हळूहळू या खेळाची मजा घेतो.सकाळचेच उदाहरण यासाठी देतो...
सकाळी टीडीए आटोपून आम्ही कांहीजण उन्हाला थांबलो होतो.कुणी गात होते, कुणी कुणाला तरी शनिवारी काय गाणार हे विचारीत होते, एकजण म्हणाला, 'इथे कांही कुणी अजून कविता गात नाही.'[काव्यवाचन]
बास, मला फिरकी घ्यायची लहर आली.मी म्हणालो, 'कविता गातात? गाणं गातात! इथे मराठी गाणं तर बरेचजण गातात की!'
त्यावर तो उसळून म्हणाला, 'तसं नाही, काव्यवाचन नावाचा प्रकार असतो'.मी म्हणालो, 'म्हणजे शेरोशायरी का?'त्यावर माझ्या अज्ञानाची कीव करत तो म्हणाला, 'त्या दिवशी नाही का, मॅडमनी वाचली होती? तशी!'मी परत म्हणालो,'म्हणजे आम्हाला शाळेत होत्या तशा कविता का?'येरे येरे पावसा' सारख्या?यावर पुन्हा माझ्या अडाणीपणावर
कमालीचा खेद व्यक्त करत तो चिडून पुटपुटला, 'तुझ्या डोक्याबाहेर आहे, आता शनिवारी बघ म्हणजे कळेल.'
आता या प्रसंगात वास्तविक त्याला चिडवणे हा हेतू नव्हता तर मी प्रामाणिकपणे तो सांगतो ते ऐकत होतो.खरे पाहता मला आद्य कवियत्री [मराठीतील] महानुभाव पंथातील 'महदंबा' तीव्ह्या रचना 'धवळं' पासून नवकाव्याचे जनक बा.सी.मर्ढेकर यांचे 'पिपात मेले ओल्या उंदीर' ते संदीप खरे पर्यंत सारे माहित होते, मी काव्य संमेलने ऐकली आहेत, पण एकंदर रिकामा वेळ कसा काढावा हे मी गुत्त्यात शिकलो.त्यात कुणी २३ अध्यायाची ज्ञानेश्वरी देखील सांगितली, न्यूटनला आईनस्टाइन बरोबर गुरुत्वाकर्षणाचा २रा की ३रा नियम शिकवला.हे सारे मजेशीर होते.कदाचित मला ते अजूनही आवडते पण ह्या सर्व प्रकारात मी भंकस म्हणून सोडून द्यायला तयार नसतो.काही माहिती अजून कदाचित मिळेल म्हणून रमतो.[खरेतर ते सोडून द्यायला जमायला हवे.कारण उगाच गैरसमजही होतात.]

Love Short Sayings And Romantic Proverb

Hold fast to dreams for if dreams die, life is a broken winged bird that cannot fly.
Wise Interesting Quotes And Motivational Quotation Ideas must work through the brains and arms of men, or they are no better than dreams.
The cure for boredom is curiosity. There is no cure for curiosity.
Love Interesting Quotations And Famous Phrase Quotes Love is my Sword,
Goodness my Armor,
And Humor my Shield.
The impersonal hand of government can never replace the helping hand of a neighbor.
There is nothing stronger in the world than gentleness.
A generation which ignores history has no past and no future.
When the mind withdraws into itself and dispenses with facts it makes only chaos.
We teachers can only help the work going on, as servants wait upon a master.
I am for those means which will give the greatest good to the greatest number.
You are not angry with people when you laugh at them. Humor teaches them tolerance.
It is only to the individual that a soul is given.
The real object of education is to have a man in the condition of continually asking questions.
You cannot simultaneously prevent and prepare for war.
Quotes If a free society cannot help the many who are poor, it cannot save the few who are rich.
I am not part of the problem. I am a Republican.
For three days after death hair and fingernails continue to grow but phone calls taper off.
Partying is such sweet sorrow.
Paradise is exactly like where you are right now… only much, much better.
Inspirational Daily One Liners And Popular Phrase In a country as big as the United States, you can find fifty examples of anything.

One Liners for Today

  • Why is the third hand on the watch called the second hand?

  • If a word is misspelled in the dictionary, how would we ever know?

  • If Webster wrote the first dictionary, where did he find the words?

  • Why do we say something is out of whack? What is a whack?

  • Why does "slow down" and "slow up" mean the same thing?

  • Why does "fat chance" and "slim chance" mean the same thing?

  • Why do "tug" boats push their barges?

  • Why do we sing "Take me out to the ball game" when we are already there?

  • Why are they called "stands" when they are made for sitting?

  • Why is it call "after dark" when it really is "after light"?

  • Doesn't "expecting the unexpected" make the unexpected expected?

  • Why are a "wise man" and a "wise guy" opposites?

  • Why do "overlook" and "oversee" mean opposite things?

  • Why is "phonics" not spelled the way it sounds?

  • If work is so terrific, why do they have to pay you to do it?

  • If all the world is a stage, where is the audience sitting?

  • If love is blind, why is lingerie so popular?

  • Why do you press harder on the buttons of a remote control when you know the batteries are dead?

  • Why do we put suits in garment bags and garments in a suitcase?

  • How come abbreviated is such a long word?

  • Why do we wash bath towels? Aren't we clean when we use them?

  • Why doesn't glue stick to the inside of the bottle?

  • Why do they call it a TV set when you only have one?

Jokes! One-liners to Ponder

geek

  • I saw a woman wearing a sweatshirt with 'Guess' on it. I said, "Implants?"
  • I don't do drugs anymore 'cause I find I get the same effect just standing up really fast.
  • Money can't buy happiness, but it sure makes misery easier to live with.
  • If flying is so safe, why do they call the airport the terminal?
  • I live in my own little world. But it's ok... they know me here.
  • I don't approve of political jokes... I've seen too many of them get elected.
  • I love being married. It's so great to find that one special person you want to annoy for the rest of your life.
  • Shopping tip: You can get shoes for about a buck at the bowling alley.
  • If I am a nobody, and nobody is perfect; then I must be perfect.
  • I married my wife for her looks... but not the ones she's been giving me lately!
  • Everyday I beat my own previous record for number of consecutive days I�ve stayed alive.
  • How come we choose from just two people to run for president and 50 for Miss America?

smiley

spacer bar

Famous Words And Quotable Good Proverb

Quotes Freedom is just Chaos, with better lighting.
Cute Quotations And Long Wise Quote A man makes inferiors his superiors by heat; self-control is the rule.
Adopting the right attitude can convert a negative stress into a positive one.
Happy are the people whose annals are blank in history books
Our doubts are traitors, and make us lose the good we oft might win by fearing to attempt.
It is well to be up before daybreak, for such habits contribute to health, wealth, and wisdom.
Motivational Words And Memorable Romantic Word Theories are always very thin and insubstantial, experience only is tangible.
He who loses money losses much. He who loses a friend loses more. But he who loses faith loses all.
Liberty has restraints but no frontiers.
Common sense is instinct, and enough of it is genius.
Gossip is sometimes referred to as halitosis of the mind
Quotes Hatred - The anger of the weak.
“Oh,” replied his patient, with no malice aforethought, “he told me to come and see you.”
An idea, to be suggestive, must come to the individual with the force of revelation.
Practical observation commonly consists of collecting a few facts and loading them with guesses.
Beware of him who hates the laugh of a child.
I always keep a supply of stimulant handy in case I see a snake—which I also keep handy.
The time to stop talking is when the other person nods his head affirmatively but says nothing.
England and America are two countries separated by a common language.
Great One Liners And Amazing Good Proverb If rich people could hire other people to die for them, the poor could make a wonderful living.

02-11-2009

अभिप्रायाबद्दल धन्यवाद; पण आज थोड वेगळं [भंकस] लिहिणार आहे.त्याबद्दल क्षमा असावी.किंवा वाचूही नये कारण मी थोडाफार योगायोगावर विश्वास ठेवतो, सकाळी इनपुटला येण्याआधी बिडीझोन मध्ये कुणीतरी पंकज उधासची एक गजल गुणगुणत होता , मी आणि किशोभाई तिथे बसलो होतो, खरेतर मी पंकज उधासचा खूप चाहता आहे.पण आज थोडी फिरकी घ्यावी वाटली.
मी म्हणालो, 'किशोरभाई, हि गजल मी निदान पंधरा वर्षांपासून ऐकत आहे.पण याचा जो शेवटचा 'शेर' आहे, तोच, त्याचा मतितार्थ, आपण तीन महिने इथे इनपुट आउटपूट मध्ये ऐकतो.पण मग इतक्यांदा ती गजल ऐकून आपण सुधारलो नाही, तर मग आता कसे सुधारू?
किशोरभाईनां मी थोडे स्पष्टीकरण दिले.प्रथम त्या चार ओळी अशा...
कैसी लत कैसी चाहत कंहा कि खता [२]
बेखुदी मी ही अन्वर खुद ही का नशा
जिंदगी एक नशे के सिवा कुछ नाही [३]
तुमको पिना न आये तो मी क्या करू?
मी म्हणालो, 'लत म्हणजे habit ,चाहत म्हणजे likeing ,खता=guilt ही सर्व समर्थने आहेत.बेखुदीमे ही अन्वर [शायर] खुद ही =self का नशा;
मग परत एकदा आपण आपल्या सेल्फ बद्दल जागरूक नसतो हेच तो सांगतो.
हे ते एकदा कळले कि पुढे [पंकज उधसच्या गाण्याची शैली म्हणूनही कदाचित पण परत तीन तीनदा] जिंदगी एक नशे के सिवा कुछ नही.
मग इतके कळूनही तुम्हाला जगता येत नसेल तर;तुमको पिना न आये=जिना न आये तो मैं क्या करू?असा सवाल तो करतो.
मग इथेदेखील सकाळ-दुपार तेच तर सांगतात कि सेल्फ इनट्रोस्पेक्ट करा म्हणून!
मग किशोरभाई तुम्ही आम्ही तेंव्हाच का नाही सुधारले?'
गंमतीचा भाग सोडला तरी हा 'अन्वर' याला थोडेच सिग्मंड फ्राईड, अल्बर्ट एलीस ठाऊक?तरीही तो सहजतेने गजल लिहून सांगतो, आम्ही वर्षानुवर्षे निव्वळ गुणगुणतो पण मतितार्थ सोडा पण एखाद्या 'शेर' चा [संपूर्ण गजल तर दूरच!] अर्थ सुद्धा कधी लावावा वाटत नाही.किंवा तो दारूपासून दूर जात असेल तर मग विषयच बाद; अशी कांहीशी अवस्था, मानसिकता आहे, त्यात बदल घडवण्यासाठी 'भंकस' का होत नाही पण लिहिणे आवश्यक आहे.
नमस्कार,
ह्या भंकसबद्दल मनापासून अभिनंदन!ह्याला भंकस का म्हणता आहात?
तुम्ही स्वतःला कमी लेखणं जरा कमी करता का? कदाचित हे व्हीजुअस सर्कल असेल कि गेली कांही वर्षे नीटपणे कांही जमलं नाही; न्यूनगंड व तसं वाटतं म्हणून challenge घेणं नकोच असं वाटून परत निष्क्रियता.तर आपल्याला हे वर्तुळ छेदनं जरुरी आहे.
तुम्हाला काय वाटतं?
वैशाली जोशी मॅडम

30-10--2009

कृतीशुन्यता हा माझ्याबाबतीत मोठा दोष आहे हे अगदी मान्य केले आहे.कारण मी पहिल्यांदाच qt मध्ये लिहिले त्याप्रमाणे मी कधी कांही केलेच नाही, त्याचेही समर्थन मी दारू पिण्यातून वेळच मिळाला नाही असे करत असे.
समजा कांही काम वगैरे असेल तर मी आधीच म्हणतो, मला त्यातले कांही कळत नाही, मी कधी केले नाही.समोरून उत्तर येते कि जे मला अपेक्षित असते, 'बऱ्याच गोष्टी आपण आयुष्यात पहिल्यांदाच करतो!दारूही पहिल्यांदाच प्याली होती!यावर मी काहीतरी वेळ मारून नेतो.टाळतो.
दुसरी माझी समस्या म्हणजे खरेच मला काही कळत नाही हे मी परोपरीने सांगून देखील लोकांना पटत नाही.माझ्याजवळ ना धड व्यवहारज्ञान आहे न संवाद साधण्याची कला. हे मी खुल्या दिलाने मान्य करतो.त्यात मला लाज वाटत नाही.पण जेंव्हा मी खरेच काही सांगत असतो ते देखील पटत नाही तेंव्हा मात्र त्रास होतो. एक छोटासा प्रसंग..
मी इथे येण्याआधी औरंगाबादला लहान बहिणीकडे होतो.तिथे माझे दारू पिणे परत चालू झाले.मी एकटा राहण्याचा निर्णय घेतला पण दारू इतकी जास्त होत होतो, किंवा सहनही होत नव्हती तेंव्हा मी भावाला फोन करून इथला पत्ता आणि फोन दिला.इथे नाव नोंदविण्यास सांगितले, त्यानंतर साधारण शनिवारी मी इथे दाखल होणार होतो, पण त्याआधी मी स्वतः आता दारू प्यायची नाही असे ठरवले.मात्र दुसऱ्या दिवशी पुन्हा पिलो नंतर झोपेतून उठल्यावर बहिणीने जेवणाबद्दल विचारले, तेंव्हा खरेतर मी दारू थांबवण्याचा विचार, ठामपणा, पिण्याबद्दल परत परत य्णारी अपराधी भावना,नैराश्य अशा मन:स्थितीत होतो.मला खरेच दारू प्यायची नव्हती पण क्रेव्हिंग किंवा शारीरिक त्रास यामुळे मी परत परत पीत होतो.मी बहिणीला सांगितले कि, 'मी जेवणार नाही,मला त्रास होतोय, डिप्रेशन आल्यासारखे होतेय', यावर बहिण हसून म्हणाली, 'तुला? आणि डिप्रेशन? तू अरे सगळ्यांना डिप्रेशन आणशील!'
आता यावर काय बोलणार? तर नैराश्य, वैफल्य,राग या सर्व भावना अगदी टोकाच्या मला येतात पण मी हसून खेळून त्या टाळतो त्यामुळे रागातील आक्रमकता घरात दिसते, तसे इतर भावनांच्या बाबतीत होत नाही.किंवा त्या कुणी ओळखाव्यात आणि मला कुणाची सहानुभूती वगैरे असावी असे मला कधी वाटत नाही.हे चुकत तर नाही ना? कारण मी फक्त राग दाखवतो पण इतरवेळी 'निर्लज्जम सदासुखी' यावृत्तीने असतो.
नमस्कार,
तुम्हाला याबद्दल अवेअरनेस आहे, जाणीव आहे हे खूप चांगल आहे कि वाटणाऱ्या इतक्या आहेत पण इतरांना फक्त राग दाखवता.इतर भावना ऐदर सप्रेस करता [दडपता] किंवा मास्किंग [वेगळंच कांहीतरी दाखवता] तर हे विशेष बरे नाही.कारण इथे प्रामाणिकपणा सुटतो.
नैराश्य,वैफल्य येतं असं जे लिहिलं आहेत, त्याचं कारण काही सापडलं आहे का? नेमाने सलग करीयर न झाल्याने न्यूनगंड वाटतो का? आत्मविश्वासात फरक पडला आहे का?
तुम्ही स्वतःला नेहमी डिसऍडरेड करता, मला ते विशेष आवडत नाही.कारण मला तसं वाटत नाही.पण तुम्ही स्वतःला माफ केलेलं नाही का?इथे राहताना त्या दिशेने जरूर self talk तसा करा.स्वतःला इन्फ़िरिअर समजणारं वाक्य शक्यतो बोलयचं नाही.[मनात, बाहेर] असं दंडक करा.सेल्फ इमेज मध्ये कांही फरक पडतोय का ते बघा.
एक एक्सरसाईज करून बघा.
इथून बाहेर गेल्यावर तुमच्या विविध रोलप्रमाणे जबाबदारी कोणती कोणती आहेत ते लिहून काढा.
वैशाली जोशी मॅडम


Monday 25 January 2010

वैरी

वाऱ्याने हलते रान
तुझे सुनसान
हॄद्य गहिवरले
गायीचे डोळे करुण उभे की
सांज निळाईतले....



डोळ्यांत शीण
हातांत वीण
देहांत फुलांच्या वेगी
अंधार चुकावा म्हणून
निघे बैरागी...





वाळूंत पाय
सजतेस काय?
लाटांध समुद्राकाठी
चरणात हरवला गंध
तुझ्या की ओठी....


शून्यांत गर्गरे झाड
तशी ओढाळ
दिव्यांची नगरी
वक्षांत तिथीचा चांद
तुझा की वैरी?

ग्रेस
संकलन:प्रवीण कुलकर्णी

इराणी संगीताच्या प्रतिमा



इराणी संगीताच्या प्रतिमा
आपोआप हलतात इथल्या वाळूवर इराणी
संगीताच्या प्रतिमा....
मला अलिंगणात मरण तसा रात्रीचा शृंगार,
तुझे चांदरातीचे अर्थनिळे मन....
कुठे यांच्याही पलीकडे, कुठे त्यांच्याही पलीकडे संपूर्ण
अवकाशाला टाळून फक्त वाऱ्यालाच ऐकू येईल
अशी सारंगीची पिपासा
जशा इराणी संगीताच्या प्रतिमा.....
वाळू पसरली देहापार, कुणाच्या नादात?
कुणाच्या शोधात?
स्वरसिद्ध तिचे अनंत कण; रेषाबद्ध उंटांच्या
मानेंत जसे चंद्रबन....
कुणी दिसत नाही; नाही दिसत एवढ्या प्रचंड
टापूत मला, कुण्या युगांत येथे झाडे उगवली
असतील त्या डोळ्यांच्या निरंगी नश्वर सुरमा
जशा इराणी संगीताच्या प्रतिमा.....
मज्जेखालच्या तळमळणारे फुलांचे दैवी घोस....
की कुण्या वैदेहीची पंथविराम गुणगुण?
शिशिराच्या मागे वाजवी सूत्रधाराची धून....
नभ एवढे विराट, माझे नाही तसे तुझेही नाही या
वाळूच्या सप्तरंगी कणांचे अज्ञातपण
फक्त दु:खाच्या देखाव्यांना दिशाबद्ध
करणारे पिरॅमिडांचे अधांतर;
जशा इराणी संगीताच्या प्रतिमा...

ग्रेस
संकलन:प्रवीण कुलकर्णी



रंग खेळतो हरी


आज गोकुळात रंग खेळतो हरी;
राधिके, जरा जपून जा तुझ्या घरी!

तो चटोर चित्तचोर वाट रोखतो,
हात ओढुनी खुशाल रंग टाकतो
रंगवुनी रंगुनी गुलाल फासतो...

सांगते अजूनही तुला परोपरी!


संग श्यामसुंदरास काय जाहले?
रंग टाकल्याविना कुणा न सोडले;
ज्यास त्यास रंग रंग रंग लागले!

एकटीच वाचशीस काय तू तरी!



त्या तिथे अनंगरंगरास रंगला:
गोपगोपिकांसवे मुकुंद दंगला;
तो पहा मृदंग मंजिर्यात वाजला...

हाय! वाजली फिरून तीच बासरी!


सुरेश भट
संकलन:प्रवीण कुलकर्णी

उष:काल होता होता


उष:काल होता होता काळरात्र झाली!
अरे, पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली!

आम्ही चार किरणांचीही
आस का धरावी?
जे कधीच नव्हते त्याची
वाट का पहावी?
कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली!


तेच घाव करिती फिरुनी
ह्या नव्या कटारी;
तेच दंश करिती आम्हा
साप हे विषारी!
अम्ही मात्र ऐकत असतो आमुची खुशाली?

तिजोऱ्यात केले त्यांनी
बंद स्वर्ग साती,
अम्हावरी संसाराची
उडे धूळमाती!
आम्ही ती स्मशाने ज्यांना प्रेतही न वाली
!


अशा कशा ज्याने त्याने
गाडल्या उमेदी?
असा कसा जो तो येथे
होतसे खरेदी?
ह्या अपार दु:खाचीही चालली दलाली
!



उभा देश झाला आता
एक बंदिशाला,
जिथे देवकीचा पान्हा
दुधाने जळाला!
कसे पुण्य दुर्दैवी अन पाप भाग्यशाली!



धुमसतात अजुनी विझल्या
चितांचे निखारे!
अजुन रक्त मागत उठती
वधस्तंभ सारे!
आसवेच स्वातंत्र्याची अम्हाला मिळाली!



सुरेश भट
संकलन:प्रवीण कुलकर्णी






28-10-2008

२८-१०-२००९
काल ए.ए.मिटींगमध्ये शेअरिंग ऐकल्या त्यात एक माझ्या अनुभवांशी मिळती-जुळती वाटली.रात्री झोपताना थोडा विचार केला.कारण याआधीही माझे ए.ए. विषयी फारसे चांगले मत नव्हते पण हळूहळू ते बदलत गेले.मी एक दारुडा आहे हे जरी मी मान्य केले असते तरी १० वर्षापुर्वीच आजचे चित्र थोडे वेगळे दिसले असते.

मी फर्स्ट इयरला असताना सहज म्हणून साहित्यसम्राट तात्यासाहेब उर्फ न.ची.केळकर यांचे रसशास्त्रावारचे एक पुस्तक वाचले होते.त्यात 'कॅथर्सीस' चा सिद्धांत होता.तो ए.ए.च्या माध्यमातून आज पटला!
त्यावेळी त्यात एक शब्द खटकत होता.मी म्हणत होतो, अनुभवांची पडताळणी होते, प्रत्यय येतो, भावनांचे विरेचन होते इथपर्यंत ठीक आहे.पण खटकणारा शब्द म्हणजे 'पुन:प्रत्ययाचा आनंद' मी म्हणायचो, समजा एखाद्याची आई मेली, माझीही मेली त्यात कसला आनंद? पण त्या वेळी जे कळले नाही ते आज पंधरा वर्षांनी कळले, कारण ए.ए. मध्ये माझ्या दृष्टीने शेअरिंग करणारा समोरचा सोबर मनुष्य [मग तो किती काळ सोबर आहे त्याला महत्व नाही] पण सांगतो तोच माझा अनुभव असेल याची जर पडताळणी झाली आणि आज तो भावनिकदृष्ट्या त्याच्या त्याच्या विश्वात ठामपणे उभा असेल[आर्थिक भाग कदाचित वेगळा असू शकतो]
तर मलादेखील विश्वास येतो कि मी देखील उभा राहू शकेन.कदाचित त्याच्या मार्गांनी अथवा अन्य पर्यायी मार्गावर श्रद्धा ठेऊन पण पर्याय नक्की असू शकतात हे पटते.
याकरिता 'बोअर' जरी वाटले तरी निश्चितच ऐकावे वाटते.'असे' वाटणे हि देखील माझ्यामते माझ्यात होत असलेल्या सुधारणेचे एक पाऊल आहे.

मी बाहेर गेल्यावर मिटिंग करेन कि नाही हि बाब अलहिदा, पण इथे मात्र आता "कंटाळा" येत नाही एवढे खरे!
नमस्कार,
तुमच्यात होणाऱ्या सुधारनांबद्दल मनापासून अभिनंदन! तुमच्या बोलण्यातूनही हे जाणवते कि, तुम्ही विचार नक्कीच करत असता.[स्वतःच्या विचारप्रक्रिया,कृतींबद्दल]

पुढे काय करायचे ह्याबद्दल विचारांमध्ये clarity आली आहे का?संगीता मॅडमशी बोलताहात ना? फक्त थेअरी, विचार मिळून कांही उपयोग होत नाही.कुठेतरी त्याचं application असणे हे खूप गरजेचे आहे.आपल्यात बदल होतो आहे हे आपल्या कृतीतून व इतरांशी आपलं जे वर्तन असतं, त्यातून जाणवलं तर त्याचा उपयोग आहे.
वैशाली जोशी मॅडम

26-10-2009

२६-१०-२००९
खर तर आज कांही लिहू नये असे वाटते पण [ २५ मिनिटात माझ्यामुळे टेबलवरील इतरजण बोलतात अशी तक्रार नको म्हणून आज लिहित आहे!]
खरेतर थोडा विचार केला तर नकारात्मक भवना, त्यांची तीव्रता कमी होते.तसेही माझ्या आयुष्यात फार कांही मोठ्या घटना, घडामोडी घडल्या आहेत असे नाही. त्यामुळे कदाचित फारसे कांही वाटतही नाही.मात्र मागे मी qt मध्ये उल्लेख केला होता कि, अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजांपलीकडे मी बघू शकत नाही. तेंव्हा संगीता मॅडमनी विचारले कि, हि तुमची अपरिहार्यता आहे कि संवेदना बधीर, बोथट झाल्या आहेत?
यावर आता असे सांगू वाटते कि, संवेदना तर असतातच पण रिकाम्या पोटी तत्वज्ञान गळी उतरत नाही हेहीं तेवढेच खरे!
मी मागे [ मागच्या वर्षी जे कांही दोन-तीन महिने 'सोबर' होतो तेव्हा टीव्ही फार बघायचो.अत्यंत बंडल, बकवास चित्रपट मजा घेऊन घेऊन बघायचो!]
तर तशा एका चित्रपटात नायक नायिकेला प्रेमाच्या भरात म्हणतो, मी तुम्हे सितारोके पार ले चलुंगा, एक नया जहां बसायेंगे वगैरे वगैरे, यावर माझा एक टोन्ट,टोमणा असे ,ते सगळं खरं पण खाणार काय? राहणार कुठं?
वास्तवात असं कांही नसतं त्यामुळे संवेदना वगैरे नंतर प्रथम मुलभूत गरजा हेच खरे. माझ्याबाबतीत हीच चूक मी केली दारू, एकटेपण यामुळे आहे ती नोकरी थोड्याफार मालमत्तेच्या जीवावर सोडण्याचा निर्णय घेतला पण वाटे वाढून मला हवे तेवढे पैसे मिळतील असे नाही त्यामुळे सद्यस्थितीत त्रास होतो आहे हे कळते.म्हणून
म्हणून आहे ते ठीक आहे.अजूनही वेळ गेलेली नाही असे समाधान करता येते, पण साध्या साध्या गोष्टीत राग, मोह टाळता येत नाही किंवा नियमनही जमत नाही, कठीण वाटते म्हणून इथे थोडे दिवस अजून बंधनात राहणे ठरवले आहे.

नमस्कार,
दारूचा मोह टाळता येत नाही आच तर आजाराचा भाग आहे तो आपल्याला स्वीकारणे भाग आहे, अपरिहार्य आहे पण तो मोह होईल हे स्वीकारून त्यापासून लांब राहणे हे जरुरी आहे.
वैशाली जोशी मॅडम

Sunday 24 January 2010

.मै जिन्दगी का साथ...

ये मेरा दीवानापन है.

.मुझे नौलखा मँगा दे रे..

मंझिले अपनी जगह है...

मेरी भीगी भीगीसी..

कभी कभी..

एक ख्वाब तो ये सिलसिले..

TAJ MAHAL 1963 Old Hindi Movie Part 1

The War on Musturbation: The Life and Times of Albert Ellis (movie trailer)

What is Rational Emotive Behavior Therapy (REBT)?

The worst & the most stupid indian action scenes

Mithun's WANTED - Funny Scene

उत्तरायण

Charlie Bit Me - The First TV Interview - Richard and Judy

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....