Tuesday 23 November 2010

हँगओव्हर...

सकाळ झाली...
कोवळी उन्हे पसरली आहेत परत...
घर आवरतो आहे परत स्वच्छ
पण खरंच 'आवरता' येणार आहे का हे घर?....

वस्तू पोचल्या आहेत जागच्या जागी
सेट्सच्या जागी पोहोचल्या आहेत
सेट्स
आणि 'मी त्यातला नाहीच' असा साळसूद टेप....
जमिनीवर जाणवत आहेत अजून
घरभर पसरलेल्या उदास गझला...
भिंतीवर चिकटलेल्या, झुंबर झालेल्या...
दारुनी ओलेत्या मनाला
जरा जास्तच बसतो गझलचा शॉक...!!

गच्चीतल्या धुळीत उतरले आहेत
माझ्याच पावलांचे वेडेवाकडे ठसे...
मी इतका अस्ताव्यस्त चाललो?
पण विश्वास ठेवणे भाग आहे!
आता हे नीट झाडून ठेवण्यापूर्वी
फोटो काढून ठेवावा का ह्यांचा?
'येती'च्या पावलांचा ठेवतात तसा?
मला वाटते आहे
की एखादा प्रलय बिलय होऊन
हे सगळे घर, हे सगळे शहर
सगळी संस्कृती गाडली गेली--
--आणि कित्येक वर्षानंतर
एखाद्या उत्खननात सापडली,
तर
असे आवरलेले घर पाहून
त्यांना कसे वाटेल?
आपले पूर्वज सभ्य होते?
आणि काळ रात्रीच गाडले गेले असते तर?
अविकसित, पथभ्रष्ट आदिमानव
अस्तित्वात होते
अशी नोंद एखाद्या शास्त्रज्ञाने केली असती!....

मग मी दारंखिडक्या घट्ट लावून घेतो
आणि युद्धपातळीवर आवराआवरीला लागतो...
टेप बंद, फन बंद, कॉईलचे पिंप बंद....

काल रात्री माझ्या दोन जिवलग मित्रांनी
एकमेकांची गचांडी धरली...
(मी खसखसा जमीन पुसू लागतो!)

काल एक आनंदी चेह-याचा माणूस
का कुणास ठाऊक
हमसाहमशी रडू लागला..
(मी चुरगळलेली चादर स्वच्छ अंथरतो!)
अगदी नाहीच राहवले तेंव्हा
एकाने काल मला सांगितलेच-
'मी तुझा हेवा करतो आणि द्वेषसुद्धा'
(मी चेह-याला कडक इस्त्री मारतात
तशी कपड्याला मारू लागतो!) 
तिच्या सा-या आठवणींना केले होते तडीपार
त्या सा-या काल आल्या, नग्नावस्थेत घरभर नाचल्या
मला सहन झाले नाही....
सिंड्रेलाच्या बुटासारखे त्यांचे एक एक वस्त्र
पडले आहे पापण्यांत,
पण मी ते गुंतावळासारखे बाल्कनीच्या खाली
टाकून देईन....

सारे भरभरा करायचे रिकामे...
स्वच्छ घासायची भांडी....स्वच्छ चेहरे...स्वच्छ डोळे....
सारे कसे स्वच्छ, सुंदर...सारे कसे जागच्या जागी
सारे कसे आलबेल...सारे कसे शांत शांत....
जणू काही घडलेच नाही काही असे....
जणू काल विसरलीच रात्र घरात यायची असे....
तीस-या घंटेपूर्वी सारे आवरून,
दबा धरून बसावे असे...

...हं..आता उघडतो दारं, उघडतो खिडक्या...
थोडा वारा येऊ दे...थोडं उन्ह येऊ दे...
छान..
या...
आता तुम्हालाही आत यायला हरकत नाही!...


संदीप खरे
संकलक:प्रवीण कुलकर्णी


चुकली दिशा तरीही

चुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारे;
वेड्या मुशाफिराला सामील सर्व तारे

मी चालतो अखंड चालायचे म्हणून;
धुंदीत या गतीच्या सारेच पंथ प्यारे.

डरतात त्या वादळांना जे दास त्या धृवाचे;
हे शीड तोडले की अनुकूल सर्व वारे!

मग्रूर प्राक्तनाचा मी फाडला नकाशा;
विझले तिथेच सारे ते मागचे इशारे.

चुकली दिशा तरीही आकाश एक आहे;
हे जाणतो जायला वाटेल तेथ न्यारे.

आशा तशी निराशा, हे श्रेय सावधांचे;
बेसावधास कैसे डसणार हे निखारे?

विंदा करंदीकर
संकलन:प्रवीण कुलकर्णी




आम्ही!

जगाची झोकुनी दु:खे सुखाशी भांडतो आम्ही
स्वतःच्या झाकुनी भेगा मनुष्ये सांधतो आम्ही

फुकाचे काय शब्दांना मिळे दिव्यत्व सत्याचे?
घराची राखरांगोळी कपाळी लावतो आम्ही

कुण्याही चंद्रभागेचा किनारा प्यार आम्हाला
तिथे नाचे विठू झेंडा जिथे हा रोवतो आम्ही

तुरुंगातील स्वप्नांची आम्ही धुंडाळीतो स्वप्ने
वधस्तंभास्तवे दाही दिशांना हिंडतो आम्ही

दिले प्रत्येक वस्तीला आम्ही आकाश सोनेरी
जिथे जातो तिथे हाका उषेच्या वाटतो आम्ही

जरी या वर्तमानाला कळेना आमुची भाषा
विजा घेऊन येणा-या पिढ्यांची बोलतो आम्ही!

सुरेश भट
संकलन:प्रवीण कुलकर्णी

Monday 22 November 2010

05/07/2010


आजच्या बोलण्यातून शेवटी audult  विषयी कल्पना एकंदर स्पष्ट झाली. मात्र तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे मागच्या वेळी मला या सर्वांची गरजच वाटत नव्हती. कारण शेवटी ज्या दोघा-चौघांत मी राहणार आहे, तिथे मी राहणार कि नाही? हाच प्रश्न होता. तो तब्बल पाच महिन्यानंतर स्पष्ट झाला.
तितक्याही दिवसत मी 'याला काय वाटेल', 'त्याला काय वाटेल' याचाच जास्त विचार करत असल्याने 'मला काय वाटते' याकडे कधी बघितलेच नाही. आणि basic needs मधेच गुंतून असल्याने तिकडे दुर्लक्ष झाल्याचा संभव आहे.
त्याचबरोबर मी म्हणतो त्याप्रमाणे 'घरची धुनी' धुण्याचे हे ठिकाण नव्हे. हेदेखील खरे आहे. कारण इथे आपली दिशा फक्त कशी असावी याबाबत मी प्रयत्न करू शकतो. इतरांना मी बदलणे अशक्य आहे. असो.
आज आउटपूट मध्ये माझ्या मते सरांची देखील सेल्फ इंटरेस्ट बद्दल थोडी गल्लत झाली असे वाटते. (कदाचित चुकीचे असू शकेल) कारण इंटरेस्ट हा शब्द बहुतेकांनी आणि शेवटी सरांनी रस, गोडी या अर्थाने वापरला.जसे : त्यांना संगीतामध्ये '
इंटरेस्ट' आहे, तसा इतरांना कॉमर्स, इंजिनिअर यांत असू शकतो. हे सांगितले.
इंटरेस्ट हा स्वहित या अर्थाने इथे वापरणे माझ्यामते संयुक्तिक ठरेल. कारण जरी मला कला शाखेत इंटरेस्ट(रस)असला तरी संधी नसल्यामुळे अथवा प्राप्त परिस्थितीत अपरिहार्यच असेल तर अर्थ, शारीरिक कष्ट इत्यादी इंटरेस्ट(रस)नसलेल्या बाबी इंटरेस्ट(स्वहित)साठी करणे भाग आहे. असो.
कारण मला हे कळले किंवा आत्मपरीक्षण हे माझ्या 'स्वहिता'साठी असले, तरी तुम्हाला बोअर न करणे हे 'परहित जाणा' याखाली येत असल्याने तूर्त थांबावे हे उत्तम!
आज जुने काही कागद काढताना मागे, इथे आउटपूट मध्ये कांही वेगळे प्रकार घेतले, त्यात एका कागदावर प्रत्येकाचे एकमेकांनी काय आवडते आणि काय आवडत नाही हे हे लिहायचे असे कांही होते. तो फाटका कागद पाहताना करकरे मॅडम यांनी माझ्या आवडते खाली 'motivated ' आणि आवडत नाही खाली introvert असे लिहिले होते. माझ्या मते मी तसा
introvert  नाही कारण ब-यापैकी पारदर्शकता माझ्यात आहे. कारण एकंदर व्यक्ती/घटना या दारुड्याच्या आयुष्यात कमीच असतात. त्यामुळे जे आहे, ते सांगणे व किमान इथे तरी लपवण्यासारखे काही नसते.
मागे दिवे आगर इथे समुद्रकिनारी फिरत असताना भावाने विचारले, "या समुद्राचे वर्णन एका शब्दात कसे करशील?" मी उतरलो, "अथांग." तसेच माझेही आहे. माझे वर्णन एका शब्दात करू शकतो, 'दारुडा!' असो.
'कृपा'मधील इतर कांही फायदे हळूहळू दिसले. पण एक फायदा झाला की पेपर आणि टीव्ही ची सवय मोडली! आज 'भारत बंद' आहे, हे देखील आत्ता कळले.
यासंदर्भात,  खरे तर हा राष्ट्रव्यापी बंद असल्याने तसा मुख्यमंत्र्यांचा कांही दुरून देखील संबंध येत नाही. हा (महागाई) सर्वस्वी केंद्राचा विषय आहे. तरी एक जन मुख्यमंत्र्यांना शिव्या घालत होता, तेंव्हा त्याला एक गोष्ट सांगितली.....
प्राचीन काळी एका राज्यात सलग दोन तीन वर्षे दुष्काळ पडला. जाणता मुख्यमंत्री मेला. त्याची जागा भरून काढण्यासाठी, जो पाऊस कधी पडेल हे सांगेल त्याला मुख्यमंत्री करण्याचे राजाने ठरवले.
सर्वत्र दवंडी गेली. आणि असा माणूस शोधण्यास अधिकाऱ्यांचे जथ्थे रवाना झाले. कांही अधिकारी जंगलाजवळील रस्त्याने जात असता तेथील एका छोट्या वाडीत त्यांचा मुक्काम पडला. दुस-या दिवशी ते जात असता तेथील धोब्याने त्यांना जाऊ नका असे विनवले. कारण विचारताच त्याने आता भयंकर पाऊस पडेल असे सांगितले. त्यांनी ते ऐकले आणि ते थांबले. आणि खरोखरच पाऊस जोराचा पडला. तेंव्हा अधिका-याने विचारले, 'तुला कसे कळले की पाऊस पडणार?' त्यावर धोबी उत्तरला, "गाढवाच्या कानावरून! पाऊस पडणार असेल तर गाढव कान खाली टाकते.त्यावरून कळते की आज पाऊस पडेल!'  हे ऐकून त्यांनी गाढव आणि धोबी दोघानाही राजाकडे नेले आणि राजाने गाढवास मुख्यमंत्री केले.....
आजही तीच प्रथा चालू आहे!!

नमस्कार,
तुम्ही म्हणता तसे सेल्फ इंटरेस्ट बद्दल झालं असेलही, मी सरांना विचारेन. पण तुमची कॉन्सेप्ट क्लीअर आहे ते बघून छान वाटले.
घरची धुनी इथे धुवू नयेत याला मी सहमत नाही. कारण जरी त्या लोकांबद्दल आम्ही कांही action  level वर करू शकत नसलो तरी तुमचा (पेशंट) स्वभाव detail  मध्ये कळण्याकरिता त्याचा एक तर उपयोग होतो व तेच matter कधी कधी आम्ही त्यात पडलो बोललो तर चांगल्या पद्धतीने सुटते किंवा थांबते. आपण यावर बोलू.
सेल्फ इमेज ह्या गोष्टीवर काम करणे तुम्हाला जरुरीचे आहे असे वाटते. कारण विरोधाभास जाणवतो. दारुडा असं कोण्या एका माणसाचं वर्णन पुरं होतं का? ह्यावरून वाटतं की inferiority   चे फिलिंग आहे की काय? पण at the same time काही बाबतीतला firmness किंवा तापटपणा पहिला की वाटतं की सेल्फ एस्टीम आणि इमेज high  आहे की काय?
यादेखील विषयावर आपण बोलू..बाकी गोष्ट भारी!as usual .

वैशाली मॅडम

Sunday 21 November 2010

किशोरकुमार यांची लता मंगेशकर यांनी घेतलेली शेवटची मुलाखत

तुम तो ठहरे परदेसी : अल्ताफ राजा

तुम तो ठहरे परदेसी, साथ क्या निभाओगे...
तुम तो ठहरे परदेसी, साथ क्या निभाओगे...

सुबह पहली... सुबह पहली... सुबह पहली... गाड़ी से घर को लौट जाओगे...

तुम तो ठहरे परदेसी साथ क्या निभाओगे...

जब तुम्हें अकेले में मेरी याद आएगी...
जब तुम्हें अकेले में मेरी याद आएगी...

खीचें खीचें हुए रहेतीं हो क्यों...
खीचें खीचें हुए रहेतीं हो ध्यान किसका हैं...
ज़रा बताओ तो यह इम्तिहान किसका हैं...
हमें भुला दो मगर यह तो याद ही होगा... हमें भुला दो मगर यह तो याद ही होगा...
नयी सड़क पे पुराना मकान किसका हैं...

जब तुम्हें अकेले में मेरी याद आएगी...
आसुओं की... आसुओं की...
आसुओं की बारिश में तुम भी भीग जाओगे...
आसुओं की बारिश में तुम भी भीग जाओगे...

गम के धूप में दिल की हसरतें ना जल जाए...
गम के धूप में दिल की हसरतें ना जल जाए...

तुझको यह तुझको देखेंगे सितारें तो ज़िया माँगेंगे...
तुझको देखेंगे सितारें तो ज़िया माँगेंगे...
और प्यासे तेरी ज़ुल्फो से घटा माँगेंगे...
अपने काँधे से दुपपता ना सरकने देना...
वरना बूढ़े भी जवानी की दुवा माँगेंगे...
ईमान से...

गम के धूप में दिल की हसरतें ना जल जाए...
गम के धूप में दिल की हसरतें ना जल जाए...

गेसुओ के... गेसुओ के... साए में कब हमें सुलाओगे...
गेसुओ के... गेसुओ के... साए में कब हमें सुलाओगे...

तुम तो ठहरे परदेसी, साथ क्या निभाओगे...

मुझको कत्ल कर डालो शौक से मगर सोचो...
मुझको कत्ल कर डालो शौक से मगर सोचो...

इस शहरे नामुराद की इज़्ज़त करेगा कौन...
अरे हम ही चले गये तो मोहब्बत करेगा कौन...
इस घर की देखभाल को वीरानियाँ तो हो..
जाले हटा दिए तो हिफ़ाज़त करेगा कौन...

मुझको कत्ल कर डालो शौक से मगर सोचो...
मेरे बाद... मेरे बाद... तुम किस पर ये बिजलियाँ गिरावगे...

तुम तो ठहरे परदेसी, साथ क्या निभाओगे...

यू तो ज़िंदगी अपनी मयकदे में गुज़री हैं...
यू तो ज़िंदगी अपनी मयकदे में गुज़री हैं...

अश्को में हुसनो रंग समेट रहा हू मैं...
आँचल किसी का थाम के रोता रहा हू मैं...
निखरा हैं जाके अब कही चेहरा शहूर का...
बरसो इसे शराब से धोता रहा हू मैं...

यू तो ज़िंदगी अपनी मयकदे में गुज़री हैं...
बहकी हुई बहार ने पीना सीखा दिया...
बदमस्त बरगो बार ने पीना सीखा दिया...
पीता हूँ इस गरज से के जीना हैं चार दिन...पीता हूँ इस गरज से के जीना हैं चार दिन...
मरने के इंतेजार ने पीना सीखा दिया...

यू तो ज़िंदगी अपनी मयकदे में गुज़री हैं...
इन नशीली... इन नशीली... इन नशीली... आँखों से कब हमें पीलाओगे...
इन नशीली आँखों से कब हमें पीलाओगे...
तुम तो ठहरे परदेसी, साथ क्या निभाओगे...

क्या करोगे तुम आख़िर क़ब्र पर मेरी आकर...
क्या करोगे तुम आख़िर क़ब्र पर मेरी आकर...

क्यों के जब तुमसे इतेफ़ाक़न... जब तुमसे इतेफ़ाक़न... मेरी नज़र मिली थी...
अब याद आ रहा हैं... शायद वो जनवरी थी...
तुम यूँ मिली दुबारा... फिर माहे फ़रवरी में...
जैसे के हमसफ़र हो... तुम राहें ज़िंदगी में...
कितना हसीन ज़माना... आया था मार्च लेकर...
राहें वफ़ा पे थी तुम... वादों की टॉर्च लेकर...
बाँधा जो अहदे उलफत... अप्रैल चल रहा था...
दुनिया बदल रही थी... मौसम बदल रहा था...
लेकिन माई जब आई... जलने लगा ज़माना...
हर श्कस की ज़बान पर... था बस यही फसाना...
दुनिया के दर्र से तुमने... बदली थी जब निगाहें...
था जून का महीना... लब पे थी गर्म आहें...
जुलाई में जो तुमने... की बातचीत कुछ कम...
थे आसमान पे बादल... और मेरी आँखें पूरनम...
माहे अगस्त में जब... बरसात हो रही थी...
बस आसुओं की बारिश... दिन रात हो रही थी...
कुछ याद आ रही हैं... वो माह था सितंबर...
भेजा था तुमने मुझको... करके वफ़ा का लेटर...
तुम गैर हो रही थी... ओक्टूबर आ गया था...
दुनिया बदल चुकी थी... मौसम बदल चुका था...
जब आ गया नवंबर... ऐसी भी रात आई...
मुझसे तुम्हें छुड़ाने... सजकर बारात आई...
बेखैफ़ था दिसंबर... ज़ज्बात मार चुके थे...
मौसम था सर्द उसमें... अरमान बिखर गये थे...

लेकिन यह क्या बताउन अब हाल दूसरा हैं...
लेकिन यह क्या बताउन अब हाल दूसरा हैं...

लेकिन यह क्या बताउन अब हाल दूसरा हैं...
अरे वो साल दूसरा था यह साल दूसरा हैं...


क्या करोगे तुम आख़िर क़ब्र पर मेरी आकर...
थोड़ी देर... थोड़ी देर... थोड़ी देर... रो लोगे और भूल जाओगे...

तुम तो ठहरे परदेसी साथ क्या निभाओगे...
तुम तो ठहरे परदेसी साथ क्या निभाओगे...

सुबह पहली गाड़ी से घर को लौट जाओगे...
सुबह पहली गाड़ी से घर को लौट जाओगे...

गोष्ट छोटी डोंगराएवढी 1

गोष्ट छोटी डोंगराएवढी 2

चेकमेट 1

चेकमेट2

Saturday 20 November 2010

कैसे बताऊं मै तुम्हे मेरे लिए तुम कौन हो?

कैसे बताऊं मै तुम्हे मेरे लिए तुम कौन हो?
कैसे बताऊँ...कैसे बताऊँ मै तुम्हे तुम
धडकनों का गीत हो जीवन का संगीत हो
तुम जिंदगी तुम बंदगी तुम रोशनी तुम ताजगी
तुम हर ख़ुशी तुम प्यार हो मनमीत हो
आँखों में तुम यादों में तुम सासों में तुम
आहों में तुम नींदों में तुम ख्वाबों में तुम
तुम हो मेरी हर बात में तुम हो मेरे दिन रात में
तुम सुबह में तुम शाम में तुम सोच में तुम काम में
मेरे लिए पाना भी तुम मेरे लिए खोना भी तुम
मेरेलिए हंसना भी तुम मेरे लिए रोना भी तुम
और जागना सोना भी तुम
जाओ कहीं देखो कहीं तुम हो वहां तुम हो वहीं
कैसे बताऊँ मै तुम्हे तुम बिन तो मै कुछ भी नहीं
कैसे बताऊँ मै तुम्हे मेरे लिए तुम कौन हो
ये जो तुम्हारा रूप है ये जिन्दगी की धुप है
चन्दन से तराशा है बदन बहती है जिसमें एक अगन
ये शोखियाँ ये मस्तियाँ तुमको हवाओंसे मिलीं जुल्फें घटाओसे मिली
हाथों में कलियाँ खिल गई आँखों को झील मिल गई
चेहरे में सिमटी चांदनी आवाज में है रागिनी
शीशे के जैसा अंग है फूलों के जैसा रंग है
नदियों के जैसी चाल है क्या हुस्न है क्या चाल है
ये जिस्म की रंगीनियाँ जैसे हजारों तितलियाँ
बाँहों की यह गोलाइयाँ आंचलमें यह परछाइयां यह
नगरियाँ है ख्वाब की कैसे बताऊँ मै तुम्हे हालत दिले बेताब की
कैसे बताऊँ मै तुम्हे मेरे लिए तुम कौन हो
कैसे बताऊँ कैसे बताऊँ कैसे बताऊँ मै तुम्हे मेरे लिए तुम धरम हो
मेरे लिए ईमान हो तुमही इबादत तुम ही तो चाहत हो मेरी
तुमही मेरा अरमान हो तकता हूँ मै हर पल जिसे
तुमही तो वो तस्वीर हो
तुमही मेरी तक़दीर हो तुमही सितारा हो मेरा
तुम ही नजारा हो मेरा यूँ ध्यान में मेरे हो तुम जैसे मुझे घेरे हो तुम
पूरब में तुम पश्चिम में तुम उत्तर में तुम दक्षिण में तुम
सारे मेरे जीवन में तुम हर पल में तुम हर चिर में तुम
मेरे लिए रास्ता भी तुम मंझिल भी तुम सागर भी तुम साहिल भी तुम
मै देखता बस तुमको हूँ सोचता बस तुमको हूँ
मै जानता बस तुमको हूँ मै मानता बस तुमको हूँ
तुमही मेरी पहचान हो कैसे बताऊँ मै तुम्हे देवी हो तुम मेरे लिए भगवान् हो कसे बताऊँ
कैसे बताऊँ मै तुम्हे मेरे लिए तुम कौन हो कैसे बताऊँ......


 फिल्म: वजूद
संकलक और हिंदी रूपांतर: प्रवीण कुलकर्णी


Friday 19 November 2010

नाना पाटेकर सोबत सुधीर गाडगीळ यांनी घेतलेली दिलखुलास मुलाखत(येथे क्लिक करा)

गाब्रीचा पाऊस 2

गाब्रीचा पाऊस 1

भानावर या ! : डॉ. राजेंद्र बर्वे

एक सांगा, दिवसाकाठी किती वेळा, 'कळतं पण वळत नाही', 'पटतं पण वठत नाही', 'समजतं पण उमजत नाही' अशा अर्थाचे शब्द वापरता? खूप वेळा! हो की नाही? मग वाचा पुढे आणि असं म्हणावं लागत नसेल तर तुम्ही बुवा हुशार! मग तर जरूर वाचाच.
खरं पाहता, कळतं पण वळत नाही, हा तिढा सॉलिड ढासू आहे; म्हणजे भले भले आडवे होतात. अगदी मेनकेला पाहून पाघळणा-या विश्वामित्रापासून ते टिव्ही, दारू, सिगरेटी, चकाट्या पिटणा-या सोमाजी-गोमाजीपर्यंत, सगळे 'कळतं पण वळत नाही'चे बळी ठरतात. त्यामागचा फंडा काय आहे, ते पाहू. आपल्याकडे ज्ञान अथवा माहिती असते, पण स्वतःचं भान नसतं.
ज्ञान आहे पण भान नाही, असं झालं की वांधेच वांधे.
म्हणजे महावीर अर्जुनाकडे धनुर्विद्येचं ज्ञान होतं. युद्ध करायला हवं हे कळत होतं, पण वळत नव्हतं. कारण आपण ते युद्ध का करतो आहोत, याचं भान नव्हतं. भानाशिवाय ज्ञान म्हणजे कीबोर्डशिवाय सीपीयू. त्यामुळे आपण सतत भानावर राहिलं पाहिजे.
आपल्याला जे कळतंय किंवा कळल्यासारखं वाटतंय, ते प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी सतत भानावर राहावं लागतं. स्वतःला चुका करण्यापासून रोखण्याचं आणि अचूक कामं करण्याचं भान ठेवावं लागतं. तेंव्हा भान बाळगा. सदैव जागृत राहा. वास्तवात राहा. भानावर येण्याची आज सुरुवात करा, हो आता.
व अ 'भानावर राहण्याचा' डे!

'हव अ नाईस डे'मधून
संकलन:प्रवीण कुलकर्णी

 


Tuesday 16 November 2010

02/07/2010

आज किंवा आताच जे तीन पेशंट अॅडमिट झाले, त्यापैकी एकाची अवस्था फारच वाईट होती. तो खूप भूक लागली म्हणतो पण एखादेच बिस्कीट कसेबसे खातो. त्याला उठून बसवावे लागते. अर्धवट बेशुद्धी, आणि आता दारू हळूहळू उतरत असल्याने विड्रोल ची लक्षणे...कमालीचा अशक्तपणा हे सर्व पाहत असताना मला एक वर्षापूर्वीची माझी अवस्था आठवली. कोणीतरी शेअर केले तसे आता एक सराव केला पाहिजे की, obsession आले की हि अवस्था आठवण्याचा सराव केला पाहिजे. कॅजुअल अॅप्रोच आता थोडा दूर ठेवला पाहिजे असे वाटू लागते.
खरं तर कुठलीही घटना, संदर्भ मी माझाशी जोडू शकतो. त्याचा अन्वयार्थ माझ्यापुरता लावू शकतो. मी जेंव्हा एखादे पुस्तक वाचत असतो तेंव्हा त्यातील एखादे वाक्य त्या त्या कथानकाशी आणि पत्राच्या तत्वज्ञानाशी सुसंगत असतेच, मात्र त्याचा संदर्भ मी माझ्याबाबत देखील लावू शकतो. 
उदा: जसे, "आपला भविष्यकाळ वर्तमान झालेला कदाचित माणसास पाहता येईल, मात्र भूतकाळ वर्तमान झालेला पाहण्यास बहुदा तो जिवंत राहत नाही." हे आठवण्याचे कारण की, जर मी भूतकाळासारखी दारू पीत राहिलो तर निश्चितच फ्रेम मध्ये जाईन.(पुन्हा आपल्या नशिबी 'फ्रेम' तरी आहे की नाही कोण जाने!) कारण सकाळी इनपुट मध्ये संगीता मॅडम प्रार्थनेविषयी बोलताना काय बदलू शकतो आणि काय बदलू शकत नाही याविषयी सांगत होत्या. नंतर चहा पिताना कान्हेरे व मी बोलताना कान्हेरेंनी एक शेअरिंग सांगितले. की एक एक दिवसाच्या हिशेबाने पंचवीस वर्ष सोबर राहून एकाने त्या पंचवीस वर्षांचा 'भूतकाळ' देखील बदलून दाखवला! हे तांत्रिकदृष्ट्या बरोबर आहे, की तो चाळीस मधील पंचवीस वर्षे सोबर आहे आणि पंधरा वर्षे सातत्याने पिऊन राडा करण्यात गेली. हा काळ एकदम न घेता जर पंचवीस वर्षांचा घेतला तर निश्चितच तो भूतकाळ बदलू शकतो. असो.
आपल्या इथे एकजण  स्वतःशीच बडबड करतो. मी देखील काहीतरी जोरात बोललो (स्वतःशीच) तेंव्हा एकाने, 'त्याच्यासारखा ' काय बोलतो आहेस? असे विचारले.तेंव्हा मी म्हणालो , काही नाही self talk मोठ्याने झाला!
आपल्या नोटीस बोर्डवर एक अब्राहम लिंकनचे पत्र आहे. त्यातील बरेचसे शब्द तसेच ठेऊन स्वतःचे दोनचार आणि येथे सतत कानावर आदळणारे शब्द घालून 'व्यसनमुक्ती केंद्रातील गुरुजींना पत्र' एका सोबर बापाचे असे काहीतरी लिहिले आहे. नंतर दाखवेन.

माझी कादंबरी- एक ब्लडी हार्ड वर्क ! - भाऊ पाध्ये

(१९८१ साली 'आयुध' ह्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला हा लेख.)
 
नुस्तं लिखाण करणं म्हणजे चक्क ब्लडी हार्ड वर्क (अभिनेत्री तनुजाच्या शब्दांत!) असतं. आणि कादंबरीसारखं विस्तृत लेखन करणं म्हणजे तर....., मराठीमध्ये हल्ली जो तो कादंबरी लेखन करू लागलाय. ते पाहून मनात विचार येतो की एक तर आपल्याला वाटतं तितकं काही कादंबरी लेखन हार्ड वर्क नसावं किंवा मराठी भाषेतले लेखक असे काही जिनिअस असावेत की एकोणिसाव्या शतकातील ग्रेट रशियन रायटर्सही त्यांच्यापुढे फालतू वाटावेत.
 
लेखनासंबंधी म्हणाल तर तनुजाची जी भूमिका फिल्म इंडस्ट्री व अदाकारीसंबंधी आहे तीच आहे. (तिच्या क्षेत्रात ती आणि माझ्या क्षेत्रात मी सारख्याच उंचीचे आहोत, असे मला म्हणायचा मोह होतोय!)
 
माझ्या 'वासूनाका', 'बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर' अशा एक दोन चीजा गाजल्या तर तनुजाचीही 'दो चोर', 'अनुभव' अशी एक दोन पिक्चर्स चालली. दुसरे म्हणजे ती आपण फिल्म इंडस्ट्रीला बांधलेले आहोत असे मानते तसे मीही कादंबरी लेखनाला बांधलेलो आहे असे मानतो. कादंबरी हा सर्वात श्रेष्ठ वाङ्‌मयप्रकार असून नाटक-बिटक लिहिणे त्या मानाने फारच मामुली आहे असे मनापासून मी मानतो.
 
मी कादंबरी लिहायला घेतली त्या वेळी कादंबरी हा पॉप्युलर वाङ्‌मयप्रकार नव्हता. त्या वेळी मराठीत कादंबरीकार किती- तर हातावर मोजण्याइतके तीन-चार. श्री. ना. पेंडसे, व्यंकटेश माडगूळकर किंवा गो. नी. दां. कुठल्याही साहित्यप्रेमी व्यक्तीस मी, एका नवोदित लेखकाने कादंबरी लिहिली असे म्हटले, म्हणजे तो शॉक लागल्याप्रमाणे माझ्याकडे पहात असे. माणसाने हळूहळू लघुकथा लिहून हात घोटवावा. मग तो चांगला कसून तयार झाला की लिहावी कादंबरी असे तेव्हा मानले जात असे नि मला तसा हितोपदेश केला जात असे. अशी परिस्थिती. ...तोच प्रकार आता किती पॉप्युलर झाला पहा. मी लघुकथांचा संग्रह करावा म्हणून प्रकाशकाला शोधतो तेव्हा प्रकाशक मला सांगतो, "कादंबरी आहे का बोला? आज कादंबरी खपते." काय जमाना आहे पहा, ज्या वेळी मी हातात कादंबरी घेऊन प्रकाशकाकडे जात होतो, त्या वेळी त्याला कथा हव्या होतात. आता कथा घेऊन जातो त्या वेळी त्याला कादंबरी हवी. आज बाजारात हा माल खपतो म्हणून तो हवा. 'ऑफ सीझन'चा माल आणू नका. मागे दुसरा माल खपत होता, हा खपत नव्हता. हा माल 'ऑफ सीझन'चा ठरला होता. मराठी प्रकाशक प्रकाशक आहेत की बनिये?
 
असो. 'डोंबा-याचा खेळ' या माझ्या कादंबरीचे प्रकाशन म्हणजे मराठी साहित्याच्या इतिहासातली दर्दभरी दास्तान आहे. वो किस-किसको सुनाऊं! 'लग्न पहावं करून' या उक्तीप्रमाणे 'कादंबरी पहावी छापून' अशी एक म्हण मी त्या वेळी काढली होती. पण सध्या लग्न सराईची धामधूम पाह्यली की 'लग्न पहावं करून' म्हणण्याची सोय राह्यली नाही. ललित मासिकाचा कुठच्याही महिन्याचा अंक उचलावा नि नव्या कादंब-यांची जंत्री पहावी. लग्नानंतर फॅमिली प्लॅनिंग तरी करता येते- पण कादंब-यांच्या प्रॉडक्शनचे काय? सध्या ज्या जोमाने हे प्रॉडक्शन चालू आहे, त्यांच्या हिशेबात स्वत:चा विचार करता मला नपुंसकत्व आल्यासारखे वाटते.
 
लिहिण्याबाबत आपले लहरी खाते- हवं तर म्हणा. हवं तर 'लिहावेसे वाटेल तेव्हाच लिहावे' अशी यामागे तात्विक भूमिका आहे असे म्हणा. परंतु दर वर्षी बाजारात आपण काही माल टाकला नाही म्हणून गेलाबाजार पश्चात्ताप करण्याची वेळ नियमितपणे आली आहे.
 
खरे म्हटले तर आपला कादंबरीचा माल बाजारात टाकला आणि माल कसा काय खपला म्हणून बाँबे बुक डेपोवाले, मॅजेस्टिक बुकवाले यांच्याकडे जाऊन 'कसं काय चाललंय?' म्हणून विचारावं आणि माल खपत असला तर त्यांनी म्हणावं. "आणा आणा, आणखीन असला माल आणा- चांगली डिमांड आहे तुमच्या मालाला!" असे मलाही वाटते. असे भाग्य आपल्याला कुठे? आपण इतके कुठे सेलेबल आहोत? आपण म्हणजे आपला माल! आपला माल आणि आपण यात फरक कुठे आहे? माल कसा प्रोड्यूस करावा याचे बाजाराचे तंत्र आपल्याला कुठे ठाऊक आहे? आपल्या देशात बांगलादेशचे युद्ध झाले. त्या निमित्ताने दादरला एक परिसंवाद झाला. या परिसंवादात शाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी साहित्य व्यवसाय मार्गदर्शन करणारा बराच बोध केला. ते म्हणाले,"पहा, बांगलादेशचा लढा म्हणजे एक रोमहर्षक अनुभव आहे. यावर साहित्यिकाने लिहिले पाह्यजे! कुठे आहे साहित्यिक?" मी तोंड लपवले. कसं मी त्या शाहिरांना कादंबरीकार म्हणून आश्वासन देणार- "शाहीर, हा मी आहे. पाडतोच मी एक बांगलादेशच्या लढ्यावर कादंबरी!" आपली ती कुवत नाही. आपल्याला या मर्यादा मंजूर आहेत. त्यानंतर आणीबाणी आली तेव्हा हेच! ...हाही प्रसंग मोठा संघर्षमय! कुठे आहेत साहित्यिक? अश्या आपल्या रोमहर्षक ऐतिहासिक प्रसंगाच्या बसेस चुकत आल्या आहेत. एखाद्याच्या लेखणीच्या मर्यादा असतात! मर्यादा तरी वाचकांनी मंजूर करायला हरकत काय आहे?
 
कादंबरी लिहिणे हा हार्ड जॉब असो वा नसो, मला तो करावाच लागतो. आपल्याला मिळालेला तो शापच म्हणा. तुम्ही कधी एखाद्या प्रचंड कारखान्यात गेलात त्या वेळी तुम्हाला प्रचंड चक्र फिरताना, शॅफ्टस् हालताना दिसतात. अनेक वेळा ही यंत्र थांबवण्यासाठी आपला हात घालण्याची वेडी उर्मी माझ्या मनात आली आहे. तशीच माझ्या डोक्यात चालणारी चक्रे, शॅफ्टस्, पिस्टन्स थांबवावेत असे मला वाटले आहे. ही जोपर्यंत चालतात तोपर्यंत 'प्रॉडक्शन' निघणारच. ते अटळच असतं. कुठल्याशा अमेरिकन कादंबरीकाराला एका पत्रकाराने मुलाखतीत सवाल विचारला होता, 'आपण लेखक होऊ असे तुम्हाला केव्हापासून वाटू लागले?' मला हा प्रश्न विचारला असता तर मी उत्तर दिले असते, "अगदी फार पूर्वीपासून!. . . " पण, असे वाटत तरी मी लिहिण्याकडे कधीच तसे लक्ष दिले नव्हते. मला पुढारी व्हायचे होते, मला आदर्श शिक्षक व्हायचे होते. तरुण वय म्हणजे हिरो बनण्याची स्वप्न पहाण्याचे. ब्लडी हार्ड वर्क करण्याचे नव्हे. पुढारी बनणे सोपे आहे, कोवळ्या विद्यार्थ्यांवर भंपकपणे इंप्रेस करून हितोपदेश करून आदर्श शिक्षक होणे शक्य आहे. परंतु ब्लडी हार्ड वर्क केल्याखेरीज कादंबरीकार बनणे कसे शक्य आहे? मला वाटते म्हणूनच मी कादंबरी लिहिण्याचा माझा मनसुबा पुढे ढकलला होता. आयुष्यात चांगले कर्तृत्व संपादन करून उतार वयात निवृत्त व्हावे. आपली एखादी लायब्ररी असावी. उत्तमोत्तम ग्रंथांचे वाचन करून आपण व्युत्पन्न व्हावे. आपल्या जवळ भरापूर वेळ असावा. कधीही कॉन्स्टीपेशन होऊ नये आणि आपण तोंडात पाईप धरून धुराची वलये काढत गालिच्यावरून येरझारा घालत आपला नायक नायिकेशी कसा वागेल याचा विचार करावा वगैरे वगैरे. म्हणजे आपण पूर्ण कादंबरीकार बनू असे मला वाटायचे. सुप्रसिद्ध पाश्चात्य लेखक सॉमरसेट मॉम यांनी लेखनाविषयी एक ग्रंथ लिहिला आहे, तो मी वाचला होता. त्यातले एक वाक्य माझ्या नजरेत अंजन घालणारेच होते. "बरेच लेखक आपल्या तारुण्याच्या उर्मीमध्ये लिहितात, पण. . . " आपण तरुण असलो म्हणजे लिहिणे बरे नाही असे माझ्या मनात तेव्हापासून घर करून बसले होते. मग कादंबरीसारखा प्रदीर्घ व विस्तृत खटाटोप करण्यास पन्नाशीपुढचा निवृत्तीचा काळ योग्य नव्हे काय? तर कादंबरी लेखनासाठी योग्य काळाचे भान असूनही मी ऐन पंचविशीतच कादंबरी लिहावयास घेतली याचे कारण माझ्या डोक्यात चालणारी यंत्रेच होत, दुसरे काही नाही. पंचविशीत किंवा गद्धे-पंचविशीत विचार म्हणजे एक कथानक, एका विशिष्ट पार्श्वभूमीवर येणारी कॅरेक्टर्स व त्यातून निर्माण होणारे कथेचे सूत्र यापुढे गेलेला नसतो. हिंदी चित्रपटात कधी काश्मीर, कधी युरोप तर कधी मुंबई असे बॅक ड्रॉप वापरून हिरो-हिरॉईन व खलनायक, त्यांचे आईबाप, सहायक नट, त्याची प्रेयसी, विनोदी नट, नोकरचाकर असा एक संपूर्ण प्लॉट तयार करावा लागतो, त्याचप्रकारे कादंबरीचे आहे. तसे हिंदी चित्रपटाची पटकथा जमवणे वाटते तितके सोपे नसते. त्याचप्रमाणे ना. सी. फडक्यांच्या तंत्र - मंत्राने बेतून लिहिलेली कादंबरी लिहिणे सोपे नसते. दोन्ही हार्ड जॉब्स असतात. निवृतीच्या वयात बुद्धिबळ खेळण्याचा जो आनंद मिळेल तोच आनंद असे हार्ड जॉब्स करण्यात मिळतो. म्हणून हार्ड जॉब्स न करता लेखन हे इझी व्हायला हवे असते. असे इझी झालेलं लेखन हे केव्हाही अधिक समाधान देणारे असते. मी 'बॅ. अनिरुद्ध धोपेश्वरकर' ही कादंबरी एका महिन्यात 'नॉन स्टॉप' लिहिली. त्यामुळे ती चांगली उतरली यात मला शंकाच राह्यली नाही. कादंबरी लिहिताना आपला अनुभव, धडपड, मेहेनत, डोक्यातील चक्रे यांचा अशा रीतीने मिलाफ झाला पाहिजे की कधीही कॉनस्टीपेशन झाल्याप्रमाणे अस्वस्थ होता कामा नये. लेखन हे तेव्हाच स्वस्थता निर्माण करते जेव्हा तुम्हाला ते पार करताना कॉनस्टीपेटेड अवस्था अस्वस्थता निर्माण करत नाही. हा एक असा ब्लडी हार्ड जॉब आहे की जो कादंबरीकाराला आवडायला हवा. मी जेव्हा तो ब्लडी हार्ड जॉब म्हणतो, त्या वेळी कादंबरी लेखनाविषयीचा तिटकारा आणि कादंबरी लेखनाची ओढ यातील 'लव्ह-हेट रिलेशनशिप' मी अनुभवतो. या 'लव्ह-हेट रिलेशनशिप'मधूनच कादंबरी निखार चढतो. 'वैतागवाडी' हे माझ्या कादंबरीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. 'वैतागवाडी' ही मुंबईतल्या बेघर कारकुनाची कहाणी. ती लिहिताना मला फारच कॉनस्टीपेटेड अस्वस्थता जाणवली. मी हा विषय का लिहिण्यास घेतला हे मलाच समजत नव्हतं. या कादंबरीतला मध्यमवर्गीय बेघर माणूसच एकदा म्हणतो, "मला घर नाही ही काय समस्या आहे?" एका मोठ्या प्रकाशकाने ही कादंबरी (स्क्रिप्ट) वाचल्यावर मला म्हटलं, "ही कादंबरी तुम्हाला यश मिळवून देणार नाही कारण ही हिणकस आहे!" मी त्याच्याशी सहमत झालो नाही. माझे मित्र अशोक शहाणेही सहमत झाले नाहीत. मला बेघर माणसाचे दु:ख लिहिण्याची इच्छा डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या एका भाषणातून झाली. ते म्हणाले होते, "कल्पना करा, एखाद्या माणसाला रस्त्यावर पडल्यानंतर त्याची काय परिस्थिती होते ती." मी अनेक वेळा आमच्या गृहनिर्माण मंडळातील अनधिकृत भाडेकरूंना घराबाहेर काढल्याची दृश्ये पाह्यली. केव्हढी दर्दभरी शोकांतिका! सामानसुमान, बायकामुले यांसह माणूस घराबाहेर फेकला जातो, ते केव्हढे प्रचंड क्रौर्य दिसते. मी आमच्या समाजवादी कार्यकर्त्यांनाही तो कायदा बदलण्यासाठी हलवू लागलो होतो. 'वैतागवाडी'चा नायक अखेर आपला संसार, आपली ड्यू असलेली बायको घराबाहेर पडणार अशा परिस्थितीत येऊन पचतो, त्या वेळी त्याचा पुरुषार्थ संपतो. डोळ्यासमोर एक प्रचंड काळोखाची खाई पसरते नि तो रडतो. बेघर माणसाच्या प्रचंड शोकांतिकेच्या त्या शेवटाला पॅरलल फक्त डी-सिकाच्या 'बायसिकल थीफ'मधल्या नायकाच्या रडण्यामध्ये मिळेल.

कुठचीही कलाकृती म्हणजे कलाकाराने पसंत केलेला विषय आणि त्याचे व्यक्तिमत्व यांचे लग्न अशी माझी एक स्वत:च्या लेखनाच्या संदर्भात केलेली सुटसुटीत व्याख्या आहे. आपल्याकडचे सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे 'कोसला' ही कादंबरी आहे. ही कादंबरी आणि प्रा. भालचंद्र नेमाडे यांचे व्यक्तिमत्व ह्या गोष्टी अविभाज्य आहेत. आय राईट अ‍ॅज आय लिव्ह, असे ज्या वेळी लेखकाला म्हणता येते, त्याच वेळी आपल्याला त्या लेखकाची लेखन प्रवृत्ती लक्षात येते. बाजारात अनेक प्रकारचे खपाऊ माल हारीने पेश केले जातात, त्या वेळी लेखक स्वत:ला पेश करून आपले व्यक्तिमत्व अनेक प्रवाहपतितांपेक्षा वेगळे असे असल्याचे स्वच्छपणे दाखवतो. कादंबरी हे तुमच्या स्टेटमेंट व्हायला हवे. 'बॅ. अनिरुद्ध धोपेश्वरकर'मध्ये त्या कादंबरीचा नायक एका अपघाताविषयी चिंतन करताना दिसतो. मी असा अपघात- सामान्य अपघात जो मुंबईसारख्या शहरात घडतो- तो पाह्यला. तो पाह्यला यात विशेष काहीच नाही. तसा तो त्या वेळी अनेकांनी पाह्यालाच होता. हेमिंग्वेच्या शब्दांत 'एव्ह्री डेथ डीमीनिशेस मी' अशी अवस्था मला जाणवली. आणि ती बॅ. धोपेश्वरकराच्या चिंतनामध्ये मी मांडली. जो अनुभव अनेकांनी घेतला होता तरीसुद्धा मला तो माझ्या लिखाणातून पुन्हा सर्वांप्रत पोचवावासा वाटला, इतका तो माझ्या व्यक्तित्वाशी अटळ बनला होता.


असाच एक अनुभव म्हणजे माझ्या एका प्रिय पात्रासंबंधी. तिने एक दिवस लग्न जमवल्याची बातमी मला दिली. मला धक्का बसला. मी म्हणालो, "माझ्याबरोबर राह्यल्यानंतर तुला लग्नाची इच्छा कशी होते?. . . ज्या पुरुषाशी तू लग्न करण्यास तयार झालीस त्याच्यापासून तुला सुख मिळण्याची खात्री कुठे आहे?" तिने मला काय उत्तर द्यावे. "त्यात काय आहे? चार-चार वेळा पोट पाडूनही मुलींची लग्न होतात! मग माझे का होऊ नये?" ती स्वत:ला 'अग्रेसर चेंडू' म्हणवून घ्यायची. तिच्या या दृष्टीचा मी प्रथमच अनुभव घेत होतो. मी तिला मानलं. तिच्यासारख्या चार-चार वेळा पोट पाडणा-या समाजातल्या सर्व मुलींना मानलं! ती मुलगी चालू खरी परंतु तिच्या चालूगिरीमध्ये सुसंगतपणा होता. मानलं तिला मी!


मोटार अपघात ही एक सर्वसामान्य घटना असेल किंवा अग्रेसर चेडूची विचार करण्याची पद्धत जगावेगळी असेल, या दोन्ही घटनांकडे मी माझ्या दृष्टीकोनातून पाहातो म्हणूनच त्या मला सिग्निफिकंट वाटतात. ज्याप्रमाणे बॅ. अनिरुद्ध धोपेश्वरकर हे माझे कॅरेक्टर मृत्यूच्या दर्शनाने हादरते व अंतर्मुख होते त्याच प्रमाणे अग्रेसर चेडूला सवाल करणारा मी आपल्या कनिष्ठ मध्यम वर्गातील तरुण मुली व्होअरिश लेव्हलवर कशा जगात असतात हे दाखवतो. पावित्र्याचे आणि पातिव्रत्याचे, सेलेबल नीतिमत्तेचे बोजड कुबड पाठीवर न बाळगता त्या अधिक मुक्त जीवन जगतात. (साहजिकच स्त्री-मुक्तीची चळवळ त्यांना अपील होत नाही.) सध्या लेखकांच्या व्यक्तिमत्वाविषयी मराठी भाषेमध्ये चर्चा करणे थांबलेच आहे. आणि चर्चा तरी कुणाची करणार?. .. आजचा एखादा लेखक स्वत:ला मार्क्सवादी म्हणवतो, म्हणजे काय, तर काहीच नाही! किंवा एखादा लेखक स्वत:ला दलित म्हणवतो. म्हणजे तो ज्या समाजात वाढला त्या समाजाचा आरसा समाजापुढे ठेवतो आहे. त्याच्याविषयी इंटरेस्ट वाटेल असे कुठे आहे. मी कादंबरीची व्याख्या केली त्याप्रमाणे कादंबरी म्हणजे लेखकाचा विषय आणि व्यक्तिमत्व यांचे लग्न आहे असे एकदा गृहीत धरले तर आजच्या कादंबरीच्या बोहल्यावर फक्त विषय उभा आहे. परंतु आंतार्पाटापलीकडे नवरा मुलगा जो लेखक असायला पाहिजे त्याचा पत्ताच नाही. लेखक हा युनिक असायला हवा. तो दुस-या कुणासारखा असू नये. अर्थात युनिक माणसालाच युनिक अनुभव मिळतात आणि युनिक अनुभवांतूनच तो युनिक निर्मिती करू शकतो. अलीकडे एका अमेरिकन ज्यू लेखकाची- आयझॅक सिंगरची मुलाखत वाचली. तो जे म्हणतो, टॅलेंट नेव्हर ट्राइज टू इमिटेट अदर टॅलेंट. इट इज इटसेल्फ. ही स्वत:च्या लिखाणाविषयी जागरूक असलेल्या लेखकानेच खबरदारी घेतली पाह्यजे. मी माझ्या कादंब-यांच्या आलेखाकडे वळून पहातो, त्या वेळी किती वेगवेगळ्या विषयांना मी हाताळले आहे, हे मला सांगावेसे वाटते. डोंबा-याचा खेळ, करंटा (कामगार चळवळ), वैतागवाडी (गृहहिनांची समस्या), वासूनाका (रोडसाईड रोमिओज), बॅ. अनिरुद्ध धोपेश्वरकर (परात्म व्यक्तिमत्व), अग्रेसर (कनिष्ठ मध्यम वर्गातील मुलीचे जीवन), राडा (बेछूट तरुण व्यक्तित्व), वणवा (नवश्रीमंत व निसर्ग), होमसिक ब्रिगेड (शैक्षणिक विकासाचे प्रकल्प), वॉर्ड नं. ७ सर्जिकल (एका निर्मितीक्षम कलावंताच्या समस्या). प्रत्येक कादंबरीमध्ये मी आहे म्हणून या कादंब-यांमध्ये एक अदृश्य धागा आहे. मी जर पुढे मागे लिहीत राह्यलो तर तो धागा पुढे वाढत चालणार आहे. मी पाह्यल्या त्या मिशनलेस संस्था (कामगार चळवळ, शिक्षण प्रकल्प), घनघोर अंधाराने भरलेले आभाळ (वैतागवाडी, राडा) नव-श्रीमंतांचा उद्दामपणा व आत्मघातकीपणा (वणवा), अस्तित्व विचार (बॅ. अनिरुद्ध धोपेश्वरकर) हे पेश करताना माझ्या व्ह्यू- पॉईंटमध्ये वाचकाला इंटरेस्ट वाटतो की नाही, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. मी जे कादंबरीमधून विधान करतो, त्यामुळे वाचक सिरीअसली स्टीम्युलेट होतो की नाही हा प्रश्न आहे. माझी 'होमसिक ब्रिगेड' दादा कोंडकेला दिली. अर्थातच ती त्याला आकलन होण्याच्या पलीकडची आहे, त्यामुळे तो कसा काय स्टीम्युलेट होणार? ते अशक्यच आहे.


वाचकाची समस्या सर्वच चांगल्या रीडर्सना भेडसावणार. अमेरिकेत ३ टक्के लोक वाचतात. ते सिंगर आपल्या मुलाखतीत म्हणतातच,
नंबर ऑफ पोटेंशिअल रीडर्स इज डिमीनीशींग. आपल्या वाचकाच्या संदर्भात मी माझी तक्रार पूर्वीही मांडली आहे.

आपल्या वाचकांचा प्रॉब्लेम काय आहे. आपल्याकडे दोन प्रकारचेच वाचक आहेत, एक प्रोफेसरी टीकाकार आणि दुसरे न वाचणारे वाचक. असे वाचक ज्या मराठी समाजामध्ये आहेत; त्या समाजात लिहिण्याचे ब्लडी हार्ड वर्क केल्यानंतर सवाल उभा रहातो तो असा की, कुणासाठी हा खटाटोप? गेल्या दहा वर्षांत मराठीतील वाङ्‌मयीन अ‍ॅक्टीव्हिटीज खतम होत चालल्या आहेत. आणि त्याबद्दल कुणालाही चिंता आहे, असं मला वाटत नाही. प्राध्यापक मंडळी सबस्टॅन्टीव्ह लेखनाची जाणीवपूर्वक दाखल घेण्याचे टाळत आहेत. एक आघाडीची समीक्षिका कुठच्याही व्यासपीठावरून मराठी साहित्याबद्दल रोजचीच तक्रार करत असे- "या देशात विकासाची कामे वगैरे काही चाललंय? पण मराठी वाङ्‌मयात त्याचं दर्शन कुठे आहे?" मला तिला विचारावसं वाटलं- "होमसिक ब्रिगेड हे काय आहे?" पण मला वाटतं, तिला त्या तपशीलात शिरणे सोईचे वाटत नसावे. भाऊ पाध्यांची कादंबरी टाळणेच सोयीस्कर वाटत असावे. प्राध्यापकांची काय कथा! वृत्तपत्रे, दैनिके, नियतकालिके तर साहित्य समीक्षा अंगाबाहेर टाकू लागली आहेत. मराठीतील सर्वाधिक खपाच्या दैनिकाच्या संपादकाला मग भाऊ पाध्येच्या पुस्तकावर लिहिणे म्हणजे आपल्या दैनिकाच्या जागेचा अपव्यय वाटतो. हेमामालिनी किंवा अमिताभ बच्चन यांच्यावरील मजकूर पेईंग वाटतो. परत इतकी मराठी साहित्यविषयक तुच्छता बाळगूनही परत मराठी साहित्याच्या प्लॅटफॉर्मवर मिरवण्याची संधी ते सोडत नाहीतच! त्यातच टीव्हीसारख्या गोष्टीही मराठीतील पोटेंशिअल वाचकाला दूर नेत असतातच!


लिहावे लागते अश्या कुडकुडणा-या मॉर्गसारख्या जगामध्ये. मराठीमध्ये लिहिताना असेच म्हणावे लागते, "ही माझी भाषा आहे. मी सेलेबल असलो काय किंवा नसलो काय, मला निर्धार करून लिहिलेच पाहिजे. वैफल्य वाटून घेता कामा नये. शेंडी तुटो वा पारंबी तुटो. लिहिणे. दुसरं काही नाही! 'वासूनाका' आणि ' बॅ. अनिरुद्ध धोपेश्वरकर' यापलीकडे मी काही लिहिलं आहे की नाही, हेसुद्धा आमच्या तथाकथित पोटेंशिअल रीडरला ठाऊक नसते. नाटके, टीव्ही, चित्रपट कथा- कुठचेच माध्यम आपण गाजवत नाही म्हणजे आपल्या अस्तित्वावरून या तथाकथित पोटेंशिअल रीडरने छेद मारलेला असतो. अर्थात या मुश्कील हालातमध्ये आपली जिंदगी कशी काटणार असे वाटत रहाते. पण तरीसुद्धा एक आशा नेहेमीच लेखकाला वाटावी लागते, आपण युनिक आहोत; आपण निवडलेला विषयही आगळा आहे. . . आय शल नेव्हर ट्राय टू अपील टू द रीडर व्हू हॅज लिटल ऑर नो टेस्ट बट बिग प्रिटेंशन्स! वन डे धिस रीडर इज गोईंग टू व्हॅनिश- आय सिन्सिअरली होप. अखेर लेखकाच्या सेलेबिलिटीची आपल्या समाजात कसोटी लागणार नसून या मिशनलेस समाजाच्या ससेप्टीबिलिटीची कसोटी लागणार आहे.


मिशनलेस सोसायटी इज अ थिंग आणि तिला सामोरे जाण्यात मला स्वारस्य वाटतं. हॅरॉल्ड रॉबिन्स स्टायलीने इथे तिथे चावे घेणे आणि अखेर एस्टॅब्लिश्ड व्हॅल्यूजना शरण जाणे मला मंजूर नाही. आयझॅक सिंगर म्हणतो ते मला यथातथाच वाटते. रिअल रायटर्स स्टे इन देअर इनव्हीरॉनमेंट- इन देअर कॉर्नर. मुंबईकर रहाणे आणि मुंबईकर म्हणून लिहिणे मला मंजूर आहे. एरव्ही माझे रूट्सही मुंबईतच आहेत. कुठच्याही ग्रामीण किंवा इतर समाजाशी नाते मला सांगता येणार नाही. अपघात म्हणून मी दिल्लीला जाईन (होमसिक ब्रिगेड), जंगलात फेरफटका मारीन (वणवा). परंतु मला मुंबईबाहेरच्या जगाबद्दल औत्सुक्य नाही.


मुंबईच्या जीवनाइतकाच लैंगिक संबंधही मी महत्त्वाचा मानतो. माझ्या 'डोंबा-याचा खेळा'पासून 'वॉर्ड नं. ७' पर्यंत माझ्या कादंब-यांमधून लैंगिक जीवनाचे दर्शन नॅचरली पेश केले गेले आहे. आपल्या समाजाच्या लैंगिक जीवनाबद्दल मी काय सांगावे. डॉ. लोहियांनीच आपला समाज लैंगिकदृष्ट्या विकृत आहे असे प्रतिपादन केले आहे. जर डॉ. लोहियांसारखा विचारवंत लैंगिक जीवनावरील भाष्य उघडपणे मांडतो तर ते मी 'वासूनाक्या'तून आणले तेव्हा अनेक प्रोफेसरी समीक्षकांनी, मला लैंगिक जीवनाशिवाय काही दिसतच नाही, अशी बोंबाबोंब केली होती. लैंगिक संबंध व न-संबंध, दोन्ही बाजू मी हाताळल्या आहेत. दुर्गाबाईंच्या मते या दोन्ही बाजू हाताळण्यातच लेखकाचे सामर्थ्य आहे.


मी 'वेडा' (एक सुन्हेरा ख्वाब) नावाची एक बलात्कार विषयावरील कथा माझी पत्नी शोशन्ना हीस वाचावयास दिली होती. ती वाचल्यानंतर शोशन्ना भयंकर अस्वस्थ. ते पाहून मला चित्रण यथार्थ असल्याचे समाधान झाले. लैंगिक चित्रणाचा आस्वाद वाचकांनी अलिप्तपणे घेतला तर ते खरे नव्हे. त्यामुळे वाचक अस्वस्थ झालाच पाह्यजे. तीच त्याची कसोटी होय. मीही हे चित्रण करताना खूपच अस्वस्थ होतो.



सेक्स ही दिलीप चित्रे म्हणतो त्याप्रमाणे एकच गोष्ट लिहिण्यासारखी आहे नि वाचण्यासारखी आहे. आपल्या एरव्ही अ‍ॅक्टीव्हिटीज खूप चालतात. परंतु अखेर आपल्या जीवनाचा ताळेबंद आपल्या लैंगिक जीवनातील यशापयशानेच होतो. मला वाटतं, कादंबरी किंवा कोणतेही लेखन या विषयाच्या संदर्भात असेल तरच ते वर्थ रीडिंग असते. मला ठाऊक आहे, सध्या लैंगिक विषयाकडे वाकड्या नजरेनं पहाण्याची लाट आली आहे. अरुण साधूसारख्या लेखकांना तर हा विषय हाताळताही येत नाही. (हे माझेच मत नाही, एका मोठ्या साहित्यिकाचेही मत आहे!) तरीसुद्धा तो मराठीतील अग्रगामी लेखक ठरतो. मराठी भाषेतच सेक्सशिवाय लिहिणारी माणसे मोठी होतात.

 
सेक्सवर लिहिण्यासारखे आपल्याला दर घडीला दिसून येते म्हणूनच आपण लिहीत आहे. मी सेक्सवरच लिहितो आणि त्याच्याबद्दल मला यत्किंचितही शरमेची बाब नाही. इंग्लंडमध्ये एका जुन्या जमान्यात सेक्स संबंधात स्त्री-पुरुषांना लाजा वाटत- ते त्यांचे लैंगिक संबंध हे कर्तव्यबुद्धीवर आधारलेले असत. मजा अशी की आज जुन्या जमान्याप्रमाणे आपल्या प्रोफेसरांसकट सेक्ससंबंधी टॅबू बाळगणारे लोक पाह्यले की माझ्या लक्षात येते- आपण काही आपल्या समाजासाठी लिहीत नसलो पाहिजे, याची खात्री पटते. सहाजिकच आपण सेलेबल नाही. वि. स. खांडेकरच निरनिराळ्या मुखवट्याखाली या भाषेत जन्म घेतात आणि आपण त्यांचे रोम्यांटिक, अलंकार-भारलेले सुखवस्तू व चमचमीत लेखन हीच त्यांच्या आस्वाद्यमान्यतेची सर्वश्रेष्ठ क्षमता म्हणावी लागेल. . .आय सिन्सिअरली होप, दे विल पास. मगच मला आपला लेखक म्हणवणारी पिढी जन्माला येईल.
संकलक:प्रवीण कुलकर्णी

Monday 15 November 2010

30/06/2010


आज रीलप्सचा वर्क पेपर बघितला. त्याविषयी वर्कपेपरच्या वहीत लिहिलेच आहे. पेपर पूर्ण लिहिला नाही, कारण डोक्यात एक भन्नाट कल्पना आली.त्यावर लिहित होतो. म्हणून पेपर लिहिला नाही. पेपर का सोडवायचा? तर त्यातून स्वतःची स्वतःला एक नवीन ओळख प्राप्त होते. चुका समजतात, आणि मार्गदर्शन देखील प्राप्त होते. हे खरे असले तरी....
वर्क पेपर लिहिताना मी मुद्दामच पाल्हाळीक भाषा, विस्तार आणि साचेबद्धपणा मुद्दाम, जाणीवपूर्वक टाळला आहे. (मी मागच्या एका  केंद्रात होतो तेंव्हा माझ्या मनातील ऐसपैस लिहिण्याऐवजी माझ्या कौन्सिलरला साचेबद्ध उत्तरे हवी होती!)
साचेबद्ध या अर्थाने की, मी तसे लिहीन देखील मात्र 'सामाजिक नुकसान' यात काय लिहिणार? मी संपूर्ण दारुडा ज्या वयात झालो, त्या वयात समाजाशी ख-या अर्थाने  माझी पुरती ओळख देखील झाली नव्हती....'आर्थिक नुकसान' मी लौकिकार्थाने पैसा कधी कमावलाच नाही....ते एकच आणि शारीरिक पातळीवरचे नुकसान कदाचित सांगता येईल, मात्र मानसिक नुकसानीचा अद्याप अंदाज देखील नाही.  असो.
मी जुने QT वाचतो त्यावेळी, ब-याचदा हसू येते. की त्या वेळी आपले विचार 'असे' होते! पण ते विचार आता पूर्णत: बदललेले असतात. हे सहज घडत नाही त्यामागे कांही न कांही काम जाणीवपूर्वक केलेले असते.
बदललेले विचार, त्यासोबतच इतरांपेक्षादेखील स्वतःच्याच स्वतःकडून वाढलेल्या अपेक्षा, आणि ज्यावेळी अशा अपेक्षा वाढतात त्यावेळी त्या त्या अपेक्षापूर्तीसाठी योग्य ते परिश्रम घ्यायची माझी तयारी नसते.
इतरांना दु:ख न देता मी आनंदी आणि 'सोबर' राहण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे हेच मी सोयीस्करपणे विसरतो. आणि त्यात भर म्हणजे मला माझ्या आनंदाची व्याख्या देखील ठरवता येत नाही.
आज कान्हेरेंचा सोब्रायटीचा पहिला वाढदिवस झाला. तेंव्हा त्यांनी सांगितलेले देखील पटते की, एकदम स्वभावदोष वगैरे काढण्यापेक्षा या भानगडीत न पडता प्रथम कृतीपासून दारूपासून दूर राहिले पाहिजे;
म्हणजे पुन्हा एकंदरीत प्राथमिकता दारू न पिणे हि आली. पण माझ्यामते वेळ द्यायला हवा याचा अर्थ त्या वेळेत जमेल इतपत स्वतःवर काम करणेदेखील आवश्यक आहे.
जसे, मी एखादी घटना मला वाईट वाटली, तर त्याचे विश्लेषण करत बसतो...त्याचप्रमाणे एखादी घटना मी टाळली, किंवा अगदी मनासारखी झाली तरी त्याचा स्वतःपुरता अर्थ लावून विश्लेषण करण्याची सवय लावून घ्यायला हवी. पुन्हा असो.
आता काल स्वार्थासंबंधी लिहिल्याने स्वहित आणि स्वार्थ यांत गल्लत होत नसली, तरी आत्मकेंद्रित वृत्तीमुळे क्षणिक समाधान आणि स्वहिताला बाधा पोचल्याचे जाणवते. हे जाणवते तर कधी? तर नुकसान झाल्यावर! त्यासाठी positive self talk कसा असावा?
त्याचबरोबर कोणत्याही केंद्रातील , 'मी येथे का आहे?' हा सनातन प्रश्न जसा वैदिक संस्कृतीत को SS चे उत्तर   सो SS हम आहे तसे आहे. आणि माझ्या बाबत या  प्रकरणाचा संदर्भ घ्यायचा तर, आमच्या ग्रामीण भागात एक म्हण आहे...
'हौसेने केला पती..
त्याला फुटली रगतपिती...!'
आणि आताच परत काय दक्षता घ्यावी हे समजले नाही तर पुन्हा हरिदासाची कथा मूळपदावर येऊन परत "QT पंचविशी" लिहिण्याचा प्रसंग ओढवेल!(यात पुन्हा विक्रम कोण आणि वेताळ कोण हा प्रश्न आहेच...!)


नमस्कार,
आपण यासंदर्भात बोललो आहोतच पण  self direction + concern about others
हे देखील स्वहीतामध्ये include असतं. self talk मध्ये माझ्या मते +ve किंवा -ve हे नंतर, मुळात जे वाटतं(परिस्थिती,मानसं) त्याचा awareness असणे जरुरी आहे. दुसरे म्हणजे घडणा-या गोष्टीत emotions ऐवजी rational approach असावा. आपण हे उदाहरणादाखल बोलू म्हणजे I can explain .

वैशाली मॅडम

28/06/2010

आज ए.ए. मिटिंगला जायचे असल्याने थोडाच वेळ आहे, तरी तुम्ही जो प्रश्न विचारला होता की, lust किंवा वासना यापेक्षा काही बाबतीत स्वतःला सिद्ध करणे हा हेतू असतो का? तर उत्तर निश्चितच होय असे आहे. ब-याचदा केवळ सेक्स पुरता नाही तर इतर सर्व बाबतीत performance मधील कमी हे आणि त्या अनुषंगाने येणारे न्यूनगंड आणि योग्य मार्गदर्शन न मिळण्याचा तो माझ्यामते एकत्रित परिणाम असतो.
वय इथे महत्वाचे नाही, तर दृध्तीकोन इथे महत्वाचा आहे. कारण स्थळ, काळ वेळ यांचे भान न ठेवल्याने घडणारे मनोरंजक किस्से
देखील मला ठाऊक आहेत. असो. 
आता स्मरणशक्तीवर परिणाम झाला आहे हे कबूल करावे लागते त्यामुळे जोर देऊन आठवावे लागते तेंव्हा कांही प्रमाणात माझ्या आत्मकेंद्रित (दारूसंबंधी, कारण इथे माझे हित नाही) स्वभाव किंवा वर्तन यांचे निकोलो मकव्हली याच्या म्हणण्यानुसार, मनुष्य हा जन्मत: धूर्त, लबाड, कापडी, आणि कोल्हयाप्रमाणे असतो, स्वार्थी असतो. इतरांचा स्वार्थ हितासाठी आणि इतर कशासोबत असेल मात्र माझ्यासारख्या दारुड्याचा स्वार्थ हा केवळ बाटलीभोवती फिरत असतो!
स्वार्थासंबंधी मनुष्याच्या जन्मजात कशा प्रेरणा असतात, हे विश्वास पाटील यांच्या झाडाझडती या कादंबरीत एका खेडवळ बाईच्या तोंडून, जी विस्थापित, धरणग्रस्त आहे. सांगतात.......
'मास्तर, माणसाची जातच मतलबी. मनुष्य जन्माला यायच्या आधी पोटात फार अडचणीत असतो, त्याला बाहेर यायचं असतं, पण आईला व त्याला त्रास होणार असतो, तो देवाला विनवणी करतो की, सोडव यातून....देव स्वयंभू असल्याने त्याला आईचे दूध माहित नसते, ते त्याच्यासाठी मौल्यवान असते. तेंव्हा बालक त्याला आईचे दूध देयचे कबूल करतो. देव हा त्रास सोडवून त्याला जन्माला घालतो तेंव्हा देव म्हणतो, आता माझे दुदु (दूध) दे! यावर लबाड बाळ म्हणते....कवा sss
कवा sss (केंव्हा?केंव्हा?मुळात ते ट्या असे वाटते) मी असे कवा म्हणालो? मी दूध देतो असे म्हणालोच नाही. अजूनदेखील बाळ दुध पिताना इकडे तिकडे देव दिसतो का ते पाहते!आणि देवाने दूध मागितले तर रडते आणि त्याला विचारते,.......कवा sss कवा sss ....

Wednesday 10 November 2010

25/06/2010

एक गोष्ट खरी आहे, की माझ्यात maturity किंवा परिपक्वता याचा अद्याप अभाव आहे. खरं आहे कारण दोन-तीन दिवसाखाली सायंकाळी जोशी सरांनी immaturity  ते maturity या विषयावर त्यांनी लिहिलेला लेख दाखवला त्यात फक्त लक्षणे होती. ती वाचली. त्यात बहुधा अवलंबित्व आणि असुरक्षिततेची भावना इथपर्यंत फक्त समजले. म्हणजे तिथपर्यंत ते माझ्यात जाणवते हे खरे.
पण तुम्ही म्हणता ते 'childish ' वागणे, हि नकळत होणारी क्रिया असेल किंवा जाणीव, awareness नसेल तर घातक आहे. यासंदर्भात माझात आणि सारंग सरांत बिडीवरून एक संवाद झाला. तो जोशी सरांनी ऐकला होता. मी त्यांना विनोदाने विचारले, 'याला जर strategy म्हटले तर? सर देखील विनोदी हसून म्हणाले, "याला over maturity असे म्हणतात.' मी म्हणालो, तसे नाही...शब्द जरी थोडा असभ्य असला तरी याला शुद्ध मराठी भाषेत 'शुद्ध हरामखोरी' असे म्हणतात!'
यातील विनोदाचा भाग जरी सोडला तरी, खरोखर भूतकाळ न विसरता विसंवादाचे संवादात रुपांतर शक्य व्हावे याकडे कसे पाहता येईल? हा खरं प्रश्न आहे.
पुन्हा आज Joe-Harry window मधील I know-you know या विंडोत राहनेसाठी 'पारदर्शकता' ही नेहमी आवश्यक असते. ती माझ्यात माझ्यामते जवळ जवळ आहे, पण...ती फार असेल तर थोड्या काळासाठी का होत नाही पण मारक ठरते याचा अनुभव आज आला. झाले असे की, मी आज आळस आणि चालढकल हे दोन स्वभावदोष घालवण्याच्या उद्देशाने (!) (खरे तर व्हॉलीबॉल बंद झाल्याने) वेंगुर्लेकर यांना मोठ्या लाकडी फांद्या, खांब कापून देण्याचे ठरवले. आता मला ते काम जमते. म्हणजे  I know-You know या फ्रेजमध्ये आलो. काल त्यांना हवे तितके कापून दिले. म्हणजे predictability  आली.
तर आज ते खांब रोवण्यापासून ते दुसरे खांब कापण्यापर्यंत काम अंगाशी आले! असो. काम केल्याने माणूस मारत नाही वगैरे खरे असले तरी छोट्या छोट्या गोष्टीत (कारण इथे काय...किंवा बाहेर काय...मोठे कांही घडणारच नसते....पुहा एकदा असो!) फार लक्ष देऊ नये हे उत्तम!आणि खरे! कारण यामुळे ही फ्रेज जेमतेम अर्धाच तास टिकते!
 
I don't know-you don't know या फ्रेजमध्ये मी किमान काही काळ, काही घटना यापुरता तरी मी मर्यादित होतो. त्यावेळी सरांनी आउटपूट मध्ये सांगितले की, किमान इथपासून ते I know पर्यंत येण्यास self discovery आवश्यक आहे. मग माझ्यामते QT देखील तेच आहे....(QT लिहिणे हा माझा पिढीजात व्यवसाय नाही...असे सांगणे तोंडावर आले होते मात्र संयम ठेवला!) अजून एक बाब मी इथे निरीक्षण केली की, कांही लोक मी इथे राहतो (इतके दिवस...न कुरकुर करता...) याचा फार हेवा करतात. कारण दोन महिने काय नि चार महिने काय...माझ्यावर कसलीच जबाबदारी नसल्याने (असे मी समजतो) Happy go lucky टाईप वागता येतं. टेन्शन न घेता इथे राहता येतं.
याबाबत 'सरकार' या सिनेमातला एक 'डायलॉग' मी एकाला ऐकवला....
"नजदीक का फायदा सोचनेसे पहले दूर का नुकसान सोचना चाहिये!" पण याचवेळी जर लोक देखील सिनेमे पाहतात ते याचाच दुसरा भाग असलेल्या "सरकारराज" मधील
'डायलॉग' ऐकवतील....
"नजदीक का नुकसान सोचनेसे पहले दूरका फायदा देखना चाहिये!" असो.
आपण (मी) यात न पडता, पिल्ले सरांचे एक वाक्य ध्यानि ठेवावं......

"short term goal sobriety...
                long term goal sobriety...!!"  

 

Monday 8 November 2010

क्या बात है

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
     
    संकलक:प्रवीण कुलकर्णी

pravinkk3

pravinkk2

pravinkk1

pravinkk

Wednesday 3 November 2010

23/06/2010

आज एक negativity विषयी एक टेस्ट मोहित सरांनी घेतली. त्याची उत्तरे हो आणि नाही यास्वरूपात या वहीत आहेत आणि निष्कर्ष तुमच्या कौन्सिलर्सकडे सांगण्यात येतील असे सांगितले. हे एक बरे झाले. कारण असे आठवून आठवून नेमक्या नकारात्मक भावना कोणत्या हे ओळखणे जरा कठीणच जाते अशक्य नाही मात्र कठीण आहे! यानंतर त्यांनी एक बाउन्सर की गुगली म्हणूया की जर दहापेक्षा जास्त हो असतील तर सर्व negative म्हणजे एकंदरीत सर्वच negative !म्हणावे लागेल. याविषयी समक्ष बोललेलेच बरे! अजून एक बाब अशी की रिलेशनशिप मध्ये मात्र कांही रिजाईंटमेंट या इगो आणि त्या अनुषंगाने discomfort anxiety ने तयार झालेल्या आढळतात.आणि याव्यतिरिक्त इतर रिलेशनशिप म्हणजे गर्लफ्रेंड वगैरेचा प्रश्नच नाही त्यात एक बाजू सामाजिक स्तर किंवा upbringing ची असली तरी दुसरी म्हणजे व्यसनाधीनतेची प्रचंड लाज आणि त्यानुसार guilt हि आहे. त्यामुळे कदाचित अजून बोलणेही व्यवस्थित जमत नसावे या निष्कर्षापर्यंत मी आलो आहे. असो. अजून भरपूर बाकी आहे. म्हणजे इथे काय किंवा बाहेर काय विनाकारण सल्ले देण्याची एक जन्मजात उर्मी दारूड्यांना असते, तशी ती माझ्यात देखील आहे. दोन दिवसापूर्वी 'बायकोशी पटत नाही', 'प्रकरण घटस्फोट घेण्यापर्यंत गेले आहे.' असे एकजण आम्हास सांगत होता.(आम्ही=मी कारण सल्ले देताना मी सुज्ञ असतो!) तर आम्ही त्यास सांगितले की, अरे, तू कामधंदा करतोस, तू घरात असतोसच किती? बारा घंटे कामात गेले सात घंटे झोपण्यात (प्रणय वगैरे रोज कोणी करत नसेल आणि केला तरी तो वेळ त्यातच मोजणे.) गेले. दोन तास जेवण किंवा आन्हिके उरकण्यात गेला दोन तास घरात इतर सभासदांसोबत गेला म्हणजे राहिलेला अर्धा-एक तास तू बायकोला देऊ नाही शकत? ऐकून घ्यायचं.....'बरे असेही नाही की होय रोज रोज तोंड पाहून कंटाळा आला असेल....हे ऐकून समोरचा पापभिरू तक्रारदार होय अशी पटल्यासारखी मान हलवतो आणि आम्ही समाधानाने दुस-यांना सल्ले द्यायला निघतो...
पण त्याचवेळी हाच प्रश्न स्वतःला विचारावा वाटतो...की आम्ही हेच घरी का करत नाही?(फरक बायकोच्या जागी आई आणि कामाच्या ठिकाणी सिनेमा किंवा बाहेर..) असो. हेदेखील करून बघायला हरकत नाही (समजा उद्या बायको आलीच तर त्रास नको!)
इतर भावनांविषयी टेस्ट मधील प्रश्नात असल्याने सविस्तर लिहित नाही.
'turning point 'मध्ये सचिन छान बोलला आणि अरुण आणि त्यांच्या पत्नी देखील चांगले शेअरिंग केले. उत्तमप्रकारे आपले अनुभव सांगून गेले. तसे या मिटिंगमधून बरेच घेण्यासारखे आहे.
आता प्रश्नोत्तरामूळे  जास्त लिहिण्यासारखे नाही आणि एकदा टेस्ट negative च आहे तर त्यासंबंधी एक विनोद....
एका सुशिक्षित, श्रीमंत मुलाला बघण्यास मुलीकडील मंडळी येतात. चहापान झाल्यावर, प्रश्नोत्तरे सुरु होतात. त्यात मुलाला विचारले जाते, का हो, मुलगा दारू पितो असे ऐकले खरे आहे का? त्यानंतर मामा (मुलाचे) सांगतात की,  त्यात काही वावगं नाही हो सध्या तशी फशनच आहे!
नंतर जुगराविषयी छेडले असता मामा सांगतात की ते श्रीमंतीचेच एक लक्षण आहे!
तीच बाब गर्लफ्रेंड अथवा बाईविषयी कारण हे श्रीमंतांचेच नाद आहेत. असे मामा सांगतात आणि वर जर हे नसेल तर मुलात काही कमी आहे असे समजतात, अशी वर मल्लीनाथी देखील करतात/ यावर मुलीचे वडील उद्गारतात, 'एकंदरीत काय! सर्वच negative !या मुलात 'positive 'काही आहे की नाही?
आहे ना, मामा उत्तरतात.
काय?
HIV Positive!      मामा उवाच!!

नमस्कार,
जोक भारी आहे...
तुम्ही जो स्वतःबद्दल प्रश्न विचारला आहे तो फार योग्य आहे. की सगळं कळून सावरून मग real मध्ये मधला ताण तसाच का राहतो? वर्षानुवर्षे त्याच भावना, तीच intensity हा जो आपला प्रवास आहे तो विचार करण्यासारखा आहे. स्वतःची growth , maturity यांत दिसते का? बटन दाबलं की पंख लागतो आपलंही काही बाबतीत तसंच का? यामध्ये काही बदल व्हावा असे वाटते का? (resentment, revenge, anger)
मनात ठेवून comfortable वाटतं का? मुख्य म्हणजे जर बदल करायचा असेल तर स्वतःसाठी  हे पहिले clear डोक्यात ठेवा. ह्यात उदात्त भावना नाही.

वैशाली मॅडम
 

21/06/2010

Qt  मध्ये काय लिहावं?  हा प्रश्न किंवा असा प्रश्न मला कधीच पडत नाही. काहीतरी विचार करून त्यानुसार थोडे लिहायला माझ्यामते हे एक उत्तम माध्यम आहे. म्हणून आज दोन महत्वाच्या आणि एक 'अत्यंत महत्वाच्या' मुद्द्यावर लिहावे लागेल असे वाटते.
तर पहिला मुद्दा असा की, आज 'पहला कदम' हा व्यसनमुक्तीकडे नेणारा माहितीपट वजा बोधपट पाहिला. जोशी सरांनी याविषयी QT  मध्ये लिहू शकता असे सांगितल्याने लिहावे किंवा लिहायचे म्हणजे 'पहला कदम' मध्ये दारुडा सुधारल्याचे positive चित्र दाखवले आहे. तपशील (माहितीपटाचा) वगळता माझ्या बाबतीत पडताळून पाहायचे तर 'त्याला' लवकर कळले आणि मला थोडे उशिरा! असे म्हणावे लागेल. कारण 'एकच प्याला' आणि 'देवदास' सारख्या अजरामर शोकांतिका जितक्या प्रभावी आणि ख-या वाटतात, तितका सुधारणेचा माहितीपट वाटत नाही कारण शेक्सपिअर च्या हेम्लेट, आणि इतर शोकांतिका सदैवच ख-या वाटतात. मला तरी आतापर्यंत दारुडा कधी सुधारू शकतो यावर विश्वासच नव्हता!असो.
आता दुसरा मुद्दा सायंकाळी (रविवारी) आई व भाऊ पालक मिटींगला येऊन गेले तेंव्हा जुजबी बोलून थेट डिस्चार्जलाच ये असे सांगितले. जास्त बोललो नाही. आपण मला आईविषयी empathize करण्यास लिहिले होते 
त्या संदर्भात मागे कधीतरी वाचलेले प्रसिद्ध पाश्चात्य नाटककार टेनेसी विल्यम्स यांच्या दोन नाटकांचा अनुवाद विजय तेंडूलकर यांनी फार सुरेख केला आहे. त्यात 'काचेचे घर' हे सन १९३७-३८ ,अधे लिहिले असावे.या 'काचेच्या घरात' मुख्य तीन पत्रे आई, मुलगा, मुलगी. बाप म्हणजे  या मुलांचा बाप आणि त्या बाईचा पती हा दारू पिऊन, त्रास देऊन मेलेला असतो. मुलगी प्रौढ कुमारिका (तिचे वेगळेच भावविश्व) आणि मुलगा एका कारखान्यात कामाला जात असतो आणि आताशा चोरून चोरून दारू पिऊ लागलेला असतो.
तो आपल्या नव-याच्या वळणावर अथवा वाटेने जाऊ नये यासाठी जीवापाड झगडणारी, काळजी वाहणारी आई, आणि मुलीसाठी नवरा हुडकताना तो निर्व्यसनी असावा यासाठी आटापिटा कारणी आई, तिचा भावी पती दारू तर पीत नाही ना यासाठी कमालीची जागरूक आई, मुलगा आपल्याच फँटसीत...ते पाहून कळवळनारी आई....हे सर्वच एकंदरीत कमालीचे हृद्यद्रावक वाटते. अमेरिका असो किंवा इंग्लंड किंवा भारत साल १९३६ असो २००९ स्थळ काळ कशाचाही या मद्याच्या समस्येवर उपाय नाही! असो. माझ्या बाबतीत सांगायचे तर आता आईने तिला वागावे तसे वागावे. अमुकच एक असा माझा अट्टाहास नाही. उलट मी माझ्या परीने कधी नाटक/सिनेमाला घेऊन जातो. पण संवाद अथवा बोलणे मात्र सहसा जास्त होत नाही. त्यामुळे आहे त्यात किंवा प्राप्त परिस्थितीत हसून-खेळून राहावे असे वाटते.
आता अत्यंत महत्वाच्या अशा तिस-या मुद्द्याविषयी......की मी रोज तीन/चार पाने Qt लिहितो...याचा अर्थ मी दररोजच्या 'कृपा' मधील घडामोडी, गॉसिप, आणि तक्रारी लिहितो असा समाज आमच्या एका आफ्टरकेअर मधील मित्राचा झाला आहे.
त्यामुळे गेला महिनाभर ते सर्वांनाच QT मध्ये अमुक लिहा तमुक लिहा...अमक्याची तक्रार करा असे काहीबाही सांगतात! पण काळ कमाल झाली म्हणजे ते चक्क मला जवळ बोलाऊन घेऊन म्हणाले, तू इतका लिहितो तर त्यात 'हेही' लिही!
मी पडलो भिडस्त स्वभावाचा माणूस! म्हणून आज लिहिणे भाग आहे!ते 
'हेही' असं की....आज (रविवारी) मटण शिजलेच नाही!(मला नक्की माहित नाही, कारण तामसी आहार सेवन केल्याने वृत्ती तामसी होते असे ऐकून मी सध्या तूर्त तामसी म्हणजे मांसाहार वर्ज्य केला आहे!) त्यामुळे ते सांगतात तसे मटण शिजले नाही याची नोंद घ्या!
आता पुढे लिहावात नाही कारण जोशी सरांना विचारा...असे लिहायचे ठरवल्यावर एकटाच कितीतरी वेळ हसत होतो आणि मटण शिजले नाही यावर तुमची प्रतिक्रिया काय असेल हे देखील जोशी सरांना नक्कल करून दाखवली(sorry )


नमस्कार,
यावर काय लिहू? माझी नक्कल केलेली फार मस्त! आपण बोललो असल्याने जास्त लिहित नाही तरी पण, आईच्या relation वर काम करणे जरुरी वाटते का? ते सांगा.

वैशाली मॅडम
 

Tuesday 2 November 2010

18/06/2010

आता QT लिहिताना छान रिमझिम पाऊस पडतो आहे. वातावरणात मळभ दाटल्याने थोडेसे औदासिन्य आलेले आहे.....अशा कातरवेळी, एकटेपणात कुणाचीतरी आठवण येते(असे म्हणतात!)... तसे आज मला प्रकर्षाने माधव गोळेंची आठवण आली.(हसण्याचा विषय नाही खरेच!) आणि त्यांच्या एका विधानाचाच (जे मागच्या वर्षी ते येथे दाखल होते तेंव्हा) विचार करत बसलो...
त्याचे असे झाले की, मागच्या वर्षी मी येथे होतो(त्यात नवल काय? त्याच्या मागच्या वर्षी 'मुक्तांगण' ला होतो.) त्यावेळी साधारण सप्टेंबर महिना असावा वातावरण असेच तीन-चार दिवस ढगाळलेले, कुंद आणि पावसाचे होते. त्यावेळी त्या दिवसात हे माधव गोळे अगदी एकटे बसत. तेंव्हा मी त्यांना विचारले,'काय माधवराव? दोन-तीन दिवसापासून जरा 'डिस्टर्ब' वाटताय?'
त्यावर त्यांनी शांतपणे स्थितप्रज्ञासारखे (किंवा तसा आव आणून ) सांगितले,"गेले दोन तीन दिवस विचार करतोय की या वातावरणात 'ऑब्सेशन' येतं की नाही?"
हे ऐकून मी वेड्यासारखा खोखो हसत होतो कारण 
'ऑब्सेशन' चा विचार (येतं की नाही?) हा करत बसणे वा तपासात बसणे हेच सर्वात मोठे  'ऑब्सेशन' माझ्यामते आहे.
माझ्याबाबत
'ऑब्सेशन' हा प्रकारच घडला नाही असे म्हटले तरी चालेल कारण दारू बंद (बराच काळ ) असल्यानंतरचा हा विषय आहे!
दारू बंद करण्याचा जीवाच्या भीतीने वा काहीतरी मोठे घडल्यावर क्षणिक पश्चातापाने जरूर कांही दिवस बंद करीत असे पण हा आमच्या भषेत आजपर्यंत रेकॉर्ड टाईम हा १००दिवस इतका आहे आणि या १००दिवसात किमान लाखवेळा तरी असले
'ऑब्सेशन' आले व ते मी टाळले असेल.
दारू बंद ठेवण्याची प्रामाणिक इच्छा हवी किंवा तसे प्रयत्न करण्यास मी मुळातच तयार नसतो. कारण मला बदल हवेत मात्र त्यासाठी लागणारे प्रयत्न फार नकोत, असे काही तरी आहे... या दहा -अकरा महिन्यात छोटे-छोटे बदल कायम राहावेत म्हणून देखील प्रयत्न करणे पण (इथे दोन महिने राहणे देखील नकोसे वाटते!)
'ऑब्सेशन' हा मुद्दा लांब ठेवला तरी दारू सोडल्यानंतर निर्माण होणारी पोकळी भरून काढण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करतो आहे मात्र, आता एखाद्या दुस-या पर्यायाची निवड करावी लागेल असे वाटते.

16/06/2010

इथे काय किंवा मुक्तांगण सारख्या ठिकाणी आम्हा सतत येणा-या लोकांना नवीन पेशंट हे 'सिनिअर' या नावाने संबोधतात! का कोण जाणे, पण त्यांना एक बाब काळात नसावी की, हे सतत येतात याचा अर्थ यांना कांही कळले नाही, आणि त्यामुळे वारंवार यावे लागते. पण होते उलटेच आम्ही त्यांना सराईत वाटतो! त्यामुळे साहजिकच कांही शंका-कुशंका आम्हाला ते विचारतात..
आपल्या इथे कधी कधी प्रचंड बोअर करणारा आउटपूट नावाचा एक प्रकार आहे, तो कधीकधी कंटाळवाणा वाटतो.(नेहमी नाही) कारण आमच्या वामकुक्षीची ती वेळ असते. तेंव्हा एका पेशंटने वडिलकीच्या नात्याने मला विचारले, की आता
आउटपूटमध्ये काय सांगायचे? मी शांतपणे उत्तरलो, म्हणालो, हे बघ सोपं आहे, फळ्यावर जेजे असेल तेते मी केले किंवा माझ्याबाबतीत झाले असे सरळ सांगायचे..अगदी सोपे! तेंव्हा आता जास्त विचार न करता झोप आणि मलादेखील झोपू दे.
हे १००% खरे आहे कारण डिफेन्स काय किंवा व्यसनाचा ग्राफ किंवा आलेख हा यात मला सर्व टप्पे आलेलेच असतात!बचावाचे पवित्रे मी कळत-नकळत वापरलेलेच असतात आणि 'टोटल डीफीट' पर्यंत मी आपोआप आलेलाच असतो त्यात मला वेगळे कांही करावे लागत नाही, जाणीवपूर्वक कांही प्रयत्न करावे लागत नाहीत.
मात्र रिकव्हरी चे तसे नाही, तिथे एक एक टप्पा जाणीवपूर्वक घ्यावा लागतो. जागरूकता लागते. त्यासाठी कृती आवश्यक आहे.(आमची तिथेच बोंब आहे!)  
काल ए.ए. मिटिंग मध्ये गजाभाऊचे शेअरिंग झाले तर आज turning point मध्ये भागवतांचे! मी दहा-अकरा महिने कसाबसा दारू न पिता राहिलो त्यामुळे मला स्वतःचेच कौतुक वाटू लागले आहे तेंव्हा या लोकांचे तर अगदी जास्त वाटते!त्यात नवल नाही.
याच संदर्भात ध्यानाचा विषय निघाला तर सारंग सरांचे देखील कौतुक वाटते. परवा एकाने त्यांच्या अर्धा-एक तास ध्यानस्थ बसण्यावरून थोडी चेष्टा केली. त्यावर मी त्याला सांगितले की मला जी बाब जमत नाही ती दुसरा सहज करतो त्याचे मला कौतुकच वाटते.
मी दारू प्यायचो तेंव्हा कुणी न कुणी माझ्या सोबत 'सोबत' म्हणून असायचे तेंव्हा असाच 'एक' माझ्यासोबत होता. आम्ही पिऊन फिरत होतो...मी रस्त्यात टपरीवर गुठखा घेतला..त्याला दिला नाही. पुढे डोंबा-याचा खेळ चालू होता...एक लहान मुलगी सायकलच्या चाकातून उड्या मारून दाखवत होती... मी तिला पाच रुपये दिले, तोच तो 'एकजन' मला म्हणाला, 'काय हे त्या मुलीला विनाकारण पाच रुपये दिलेस आणि मला एक रुपयाचा गुठखा नाही दिला?...'
मी म्हणालो, 'तू देखील त्या सायकलच्या चाकातून उडी मारून दाखव..तुलादेखील पैसे देईन!..' असो.
आता इथे  बसल्या
बसल्या काहीतरी उद्योग म्हणून थोडेफार लिहित आहे. तुम्हाला वेळ असल्यास दाखवेन. कारण तुम्ही म्हणता तशी संवेदनशीलता वगैरे माझ्यात असेलही पण माझा आतापर्यंतचा बहुतांश वेळ गुत्त्यात किंवा टिंगल टवाळी करण्यात गेला(अगदी घरात देखील)त्यामुळे सर्वच विनोदाने घ्यायची सवयच लागून गेली आहे.

नमस्कार,
तुम्ही म्हणता की सर्व विनोदाने घ्यायची सवय लागली आहे. पण मी या विधानाशी सहमत नाही. कोणी काहीही (घरच्यापैकी) बोललं जे जरा लागट आहे, तर त्याचा तुम्हाला त्रास होतो हे तर खरे आहे ना? म्हणजेच त्या comments तुम्ही seriously घेता! ह्याचा अर्थ असा की भावनांची तीव्रता आणि संवेदनशीलता तीव्र हि अजूनही जवळच्या लोकांबाबत आहे. तर ते accept स्वतःशी व जमलं तर संबंधितांशी communicate करा. कदाचित फरक पडेल.
तुम्ही लिहिलेले मी जरूर  वाचेन मला त्यात इंटरेस्ट नक्कीच आहे. 

वैशाली मॅडम

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....