Friday 31 December 2010

2011 HAPPY NEW YEAR

Tuesday 28 December 2010

Funny Cats

सेनेच्या 'पुणे बंद' ला हिंसक वळण : सेनेचे कार्यकर्ते अटकेत

आज शिवसेनेचा पुणे जिल्हा बंद!

Thursday 23 December 2010

08/10/2010

आज आकाश कंदील बनवण्याच्या कारणास्तव आउटपूट झाले नाही, त्यामुळे सेल्व्ज बद्दल काही विचारायचे होते, ते राहून गेले. कारण जे पाच प्रायमरी सेल्व्ज आहेत ते लहानपणापासूनचे वर्तन ध्यानात घेता कमी अधिक प्रमाणात माझ्यात आहेत. पण कांही कांही संदर्भातच. कारण एक पुस्तक वाचत होते, ;मनोविकाराचा मागोवा' तर त्यात उल्लेख केलेले फोबिया, मनिया, मंत्रचळ, स्किझोफ्रेनिया, मद्यपाश! इ.इ. सर्व मला स्वतःला झाल्याचे अथवा त्यांची लक्षणे असल्याचा भास होतो! तर तेंव्हापासून तसले काही वाचतच नाही!!
इतक्या कमी वेळात सेल्फ बद्दल लिहिणे संभव नाही. म्हणून दुर्लक्ष देखील करत नाही.
काही किरकोळ प्रसंगात निकष लावून आपण स्वतःला अमुक एका सेल्ववर काम करायचे असे किरकोळीतच ठरवावे लागते!
किरकोळ उदाहरणच घ्यायचे झाले तर, समजा मी भिडस्त स्वभावाचा, म्हणजे प्लीजर आहे, तर मी जेंव्हा वारकाकडे कटिंग करायला जातो, तेंव्हा वास्तविक मला साधी कटिंग अपेक्षित असते..आणि तो न्हावी सांगतो, की तुम्हाला अमुक एक 'कट' चांगला दिसेल, तेंव्हा मी त्याला उगाच वाईट वाटेल, म्हणून त्याच्या मनाप्रमाणे करतो. मात्र नंतर त्याला मी शिव्या देऊ लागतो (अर्थात मनातल्या मनात) आणि वरवर मात्र चांगली केली असे म्हणतो, वास्तविक ती कट अतिशय छपरी अशा प्रकारची असते!

घाशीराम कोतवाल या नाटकाचे नव्याने प्रयोग होत आहेत त्याची काही छायाचित्रे2







घाशीराम कोतवाल या नाटकाचे नव्याने प्रयोग होत आहेत त्याची काही छायाचित्रे1



घाशीराम कोतवाल या नाटकाचे नव्याने प्रयोग होत आहेत त्याची काही छायाचित्रे




Wednesday 22 December 2010

06/10/2010

एक वीस-बावीस वर्षाची  तरुणी. तिचे एका तरुणावर प्रेम. हा तरुण कमी शिकलेला,  बेरोजगार. त्या मुलीचे वडील त्याला घरी बोलावतात. पण अपमान करून घालवतात. तो जातो.
त्यानंतर एक पावसाळी रात्र. ती मुलगी त्या रात्री पावसात नावेने नदी ओलांडून त्या मुलाकडे जाते. नावाडी मुलीच्या निरुपायाचा फायदा घेऊन तिच्याकडून अंगठी, चैन घेतो..मात्र तिला पैलतीरी पोचवतो.
ती मुलगी त्या मुलाकडे येते. मात्र..तो तिला नाकारतो आणि येथून निघून जा असे सांगतो.
त्याचवेळी तिथे एक दुसरा मुलगा उपस्थित होतो. तो तिला सांगतो, की त्याचे तिच्यावर खूप-खूप प्रेम आहे..मात्र ती दुस-याशीच प्रेम करत असल्याने आणि हे त्याला ठावूक असल्याने तो काही बोलला नव्हता. तेंव्हा आता तू माझ्याशी लग्न करशील का? असे तो दुसरा मुलगा विचारतो.
यावर ती मुलगी चटकन तयार होते. आणि ती मुलगी त्या दुस-या मुलाशी लग्न करते. 
हि झाली आजची रेणूताई गावसकर यांची कथा. त्यांनी हि कथा सांगितल्या नंतर त्या कथेतील पाच पात्रांच्या भूमिकेत जाण्यास सांगितले. तेंव्हा त्यांचे मूल्यमापन न करता ते त्यांच्या भूमिकेत साजेशे वागले असे थोडक्यात म्हणू शकतो. कारण कोणताही बाप आपल्या मुलीला बेरोजगार वगैरे माणसाच्या पदरी बांधणार नाही. तिथे ते बापाचे प्रेमच असते. त्याने प्रथम मुलीला रागावयास हवे हे म्हणणे ठीक आहे, मात्र जसे इतरत्र ते घडते तसे इथे घडले नाही, इतकेच.
दुसरा मुद्दा म्हणजे तो नावाडी. तो प्रसंगानुरूप वागला म्हणावा लागेल कारण जरी त्याने अंगठी, हार वगैरे घेतला तरी दुसरा गैरफायदा घेतला नाही हि सुदैवाने चांगलीच बाजू.
आता ज्या मुलावर 'त्या' मुलीचे प्रेम होते तो असा का वागला? तर कदाचित प्रेमापेक्षा त्याला आपला 'इगो' महत्वाचा वाटला असेल. तो इथल्या भाषेत स्वतःपेक्षा 'द अदर्स' ला महत्व देत असावा. 
दुसरा मुलगा संधिसाधू जरी वाटला तरी त्याने पहिल्याने त्या मुलीला नाकारेपावेतो कुठेही मध्ये लुडबूड केली नव्हती.
मुलीला जेंव्हा त्याने हे सांगितले की त्याला तिच्याविषयी प्रीती वाटते, आणि तो तिच्याशी लग्न करू इच्छितो, तेंव्हा मुलीकडे बापाकडे वापस येण्याचा अथवा स्वतःचे आयुष्य एकटे, नव्याने सुरवात करण्याचा आणि लग्नास 'नाही' म्हणण्याचा देखील पर्याय होता.
मात्र...मात्र असे कोणतेही पर्याय न निवडता, तिने 'त्या' दुस-या मुलाशीच की, ज्याच्याविषयी तिला काडीमात्र माहिती नाही, अशा अनोळखी मुलाशीच लग्नाचा का निर्णय घेतला? हा कळीचा मुद्दा आणि मुलगी कथेची केंद्रबिंदू असल्याने महत्वाचा आहे. 
तिने दुस-या मुलाशी लग्न करणे हा पर्याय निवडताना नाकारण्याचा (पहिल्याने) हा एक भाग असू शकेल किंवा दुसरा कुणी माझ्यासाठी जीव टाकायला तयार आहे, हि तात्कालिक पण सुखावणारी सुखद मात्र क्षणिक भावना आहे.
या विषयावर 'आदर्श' काय असायला हवे होते?
प्रत्येकाचा दृष्टीकोन कसा हवा होता?
आणि आवश्यक जरी नसले तरी चूक/बरोबर काय?
याविषयी एखाद्या कादंबरी इतका लेख तयार होऊ शकतो. पण आज तो विषय नाही आणि हे स्थळ देखील नाही.
'त्या मुलीच्या जागी तुम्ही असता तर तुम्ही काय केले असते?' या उत्तरादाखल मी हात वर देखील केला मात्र, नेहमीप्रमाणे माझ्या 'मुखदौर्बल्याने' उत्तर दिले नाही.(दारू पिल्यानंतर हे
'मुखदौर्बल्य' कोठे जाते कुणास ठावूक!) पण त्यामागे empathize  करताना मी 'स्त्रीमन' 'तिच्या भावना' 'तिची त्याक्षणीची मन:स्थिती' इ.इ.गोष्टींचा उगाच भाकड तर्काने,  अनुमानाने अंदाज न बांधता, फक्त 'ती' म्हणजे 'मी' असे ठरवूनच निर्णय घेईन आणि तो निर्णय नक्कीच असेल की त्या 'दुस-या मुलाशी लग्न करण्याचा!
याचे सबळ कारण मला ती नाकारण्याची भावना (feeling of rejection) इतकी तीव्र आणि जिव्हारी लागेल की, मी केवळ पहिल्याचा सूड म्हणून देखील की, 'बघ, तू नाहीस तर, माझ्यावर मारणारे अजून कितीतरी आहेत..!' म्हणून मग तो दुसरा दारुडा असू देत किंवा जुगारी असू देत किंवा चोर, खुनी असू देत!
मी त्या पहिल्याला धडा शिकवणे किंवा त्याला पश्चाताप व्हावा म्हणून मुद्दाम लग्न करेन!
वास्तविक ret ची परिभाषा येथे लावता येते.
१.महत्वाच्या व्यक्तीच्या प्रेमाव्यतिरिक्त देखील आपण स्वतंत्र व्यक्तिमत्वाने जगू शकतो.
२ सर्वांनाच धडा शिकवणे आपले काम नाही.
३ स्वहित प्रथम जपले पाहिजे.  इ. इ.
मात्र इथे सर्व विवेकी कल्पनावर अविवेकी कल्पना मात करतील.
त्यामुळे मी अद्याप पुरेसा विचार करू शकत नाही त्यामुळे विवेकी अथवा अविवेकी असे सदा सर्वदा काही नसते याचे भान धरून देखील मी वारंवार स्लीप होते हे प्रमाण मानले तर,
मी त्या दुस-या मुलाशी ताबडतोब लग्न करेन हे निश्चित!
शेवटी जाता जाता त्याचा एक असाही शेवट मनात आलाच की, 
ती मुलगी दुस-याशी लग्न करते. पहिला मुलगा नंतर पश्चातापाने दग्ध होतो आणि दारूच्या आहारी जातो. मुलीला नंतर आपली चूक समजते आणि तिच्या मनात आता लग्नानंतर पहिल्याचेच विचार सुरु होतात. त्यामुळे दोघांत वारंवार खटके उडतात...त्याला कंटाळून दुसरा देखील मद्यपान सुरु करतो.
आणि शेवटी पहिला 'मुक्तांगण' आणि दुसरा 'कृपा' मध्ये दाखल होतो!(हो, कारण उगाच हा नसता त्रिकोण आपल्या इथे इतरवेळी मिटिंग मध्ये वगैरे नको!)असो.
हे सर्व डोके दुखावणारे कथानक एकदा रोहिणी निनावे यांना दिले पाहिजे! मग त्या यावर नक्कीच पाच ते सहा हजार भागांची महामालिका लिहितील. नंतर प्रत्यक्षात टीव्हीवर आणायला एकता कपूर आहेच!..आणि बघायला?...अर्थातच सर्व रिकामटेकड्या स्त्रिया....




Tuesday 21 December 2010

04/10/2010

आज बिडी झोन मध्ये गप्पा ऐकत बसलो होतो. त्या होत्या तमाशा, बारी आणि एकंदर थिएटर विषयीच्या. याबाबत मी स्वतःशी विचार केला असता, पैसा आणि परिस्थिती या दोन्ही बाबत मी स्वतःला सुखी मानतो. कारण जर घरची परिस्थिती जर अत्यंत चांगली (आर्थिक) असती, तर मी काय केले असते देव जाणे!
ज्याला निव्वळ अय्याशी असे म्हणता येईल ती मी सुरुवातीच्या पाच ते दहा वर्षात केली. मात्र ती दुस-यांच्या पैशावर! वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत माझी दारू नियमित मात्र नियंत्रित होती. त्यावेळी माझ्यापेक्षा वयाने मोठ्या असणा-या मित्रांच्या नादाने त्यांच्या पैशांनी हे शौक केले. मात्र अठरा ते तेवीस या वयाच्या काळात मी तेथे जायचो ते फक्त भरपूर दारू पिण्यासाठी! असो.
हे एक आणि दुसरी बाब की मी अजून गांजा वगळता ब्राऊन शुगर/चरस हे कधी पहिले देखील नाही आणि पहायची इच्छा देखील नाही. यापैकी बारीचे आकर्षण हे नसण्याचे कारण पैसा नसून माझ्यामते त्या नादात भल्या-भल्याचे जे झाले, त्याचा मी एक साक्षीदार असल्याने त्यापेक्षा दारू बरी, या निष्कर्षापर्यंत मी आलो. कारण जुगार, दारू पेक्षा देखील मी थोडा आउटलाईन शी संबंधित असल्याने यात बरबाद झालेली माणसे मी पहिली होती.
मात्र राहून राहून एक विचार असा डोकावतो की, हेच दारूच्या बाबत का होत नसावे? कारण मी आता मागच्या महिन्यात 'आनंदवन' इथे दाखल असताना मला माझे मित्र उदयन कायंदे यांचा फोन आला की आमचा सोलापूरचा मित्र अनिकेत अवसेकर याने फाशी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. हा तिशीतला मुलगा, एक दोन वर्षाचा फरक सोडता समवयस्क म्हणता येण्याजोगा. घरी हॉटेल, लॉज, बार असे सर्वकाही...
त्यातही तुलना करता आपले मन अजून तितके कमकुवत झाले नाही असे जाणवते.
याच वेळी मला आनंदवन मधील, ज्याचे उत्तम व्यक्तिचित्र होऊ शकेल असा चरसी मुलगा, आदिल चरसी आठवतो. वय साधारण बावीस. हा लहानपणापासून चरसी झालेला. आता त्याने 'सायको' ची प्राथमिक अवस्था गाठलेली. याला पाहताना मी दारू पिल्यावर हिंस्त्र होतो असे कुणी सांगितले तर भीती वाटते. 
भीती कदाचित जेलची नसून आपण वेडे होऊ की काय याची असते. आणि आपण काय करतो हे कळत नाही त्यामुळे स्मरणशक्ती नष्ट होण्याची देखील. असो.
आज tda देखील नेहमीप्रमाणेच (टंगळमंगळ करत ) केला.

ओशो: आस्तिक कौन?

OSHO: Kople Phir Phoot Aayeen

ओशो : जीवन एक अवसर है

OSHO: Mano Mat, Jano, मानो मत, जानो

Monday 20 December 2010

01/10/2010

हा रीलॅप्स खरा तर सध्या सोप्या आणि स्पष्ट शब्दात सांगायचे तर त्याचे वर्णन 'माज' असे करता येईल. पण माझ्यामते ते तितकेसे खरे नाही, कारण याबाबत माझे असे मत आहे की, 'कृपा' किंवा ए.ए. चे साहित्य हे विशिष्ट प्रकारचे संस्कारच असतात, त्यानुसार माझ्यात कांही मला आणि इतरांना देखील जाणवणारे बदल हे होत असतात. त्याचे कांही सकारात्मक परिणाम देखील मला मिळू लागतात. मात्र त्याचवेळी हे बदल मला नकोसे देखील होतात. किंवा ते तसेच राहतील का? मला ते पेलवतील का? या शंका मनात घर करतात. त्याचा परिपाक किंवा परिणीती ही हा रीलॅप्स घडण्यात होते.
आज आउटपूटमध्ये वेक अप कॉल यासंबंधी बोलण्यास सांगितले. पण मी ते टाळले कारण वेक अप कॉल ला वास्तवाची 'जाणीव' हा शब्द वापरणे उचित राहील. (पण इथे 'जाणीव' या शब्दाचे पेटंट आणि कॉपीराईट असल्याने त्याचे हक्क घेऊनच वापरावा लागतो!)तर माझ्याबाबत ख-या अर्थाने ही जाणीव पहिल्या अॅडमिशन मध्ये तब्बल चौथ्या महिन्यात झाली!
कारण त्यावेळी मी कोणत्याही प्रकारे स्वतःपुरते देखील पैसे न कमावता केवळ दारू पीत राहणे असे काहीतरी ध्येय बाळगून होतो. कारण दारू मी बंद करू शकतो, दारू 'सुटू' शकते, किंवा सोडायची आहे हा विचारच मी करू शकत नव्हतो. तेंव्हा स्वतःकडे त्यादृष्टीने विचार सुरु केला, तेव्हाच माझ्यासाठी ख-या अर्थाने 'वेक अप कॉल' होता.
त्यानंतर दोन वेळा प्रयत्नात अडथळा आला, स्लीप(!) मूळे, मात्र ती आजाराचाच एक भाग म्हणून आणि परत पीत बसने हा काही उपाय नाही हे जाणून परत प्रयत्न सुरु केले. त्यात अजून एक अडचण अशी सतावते, की, मनासारखे पैसे, नोकरी  नाही मिळाली तर पुढे काय? कारण मी आतापर्यंत दारू पिणे आणि भांडणे या व्यतिरिक्त काही केलेच नाही!
आता दुसरा मला सतावत असणारा मुद्दा, की, जोपर्यंत मी मला आवश्यक वाटतील तेवढे पैसे कमावण्यास सक्षम होईन तोपर्यंत माझा भाऊ मला पैसा पुरवेन, असे म्हणाला तो त्याचा मोठेपण आहे... मात्र... त्यात पुन्हा अटीचा प्रश्न की दारू पिली तर परत रस्त्यावर.....
 
त्यासाठी हे अवलंबित्व नको वाटते.
आता थोडे जी. ए. च्या कथा वाचत आहे त्या वाचताना आयुष्यांत दु:खाची आणि निरर्थकतेची जाणीव होते त्यावरून दोन-चार दिवसांपूर्वीची बातमी आठवली, की..'नीलहिलइझम' या कसल्याशा इझम वाल्या मुलाने २००० पानी (निश्ते सारख्यांच्या अभ्यास करून) इमेल पत्र लिहून आत्महत्या केली.
त्याची कीव वाटली.कारण त्याआधी त्याने जी.ए.ची कथा एकतरी वाचायला हवी होती!
द.भी.कुलकर्णी यांनी त्यांना आयुष्यातले दु:ख वेचीत हुडकत फिरणारा फकीर म्हटले आहे,  ते अतिशय योग्य आहे.

Friday 17 December 2010

12/07/2010

इतके दिवस काही तरी बोलल्यावर आज जास्त काही लिहिण्याची आवश्यकता वाटत नाही, पण येत्या बुधवारी किंवा मी जाईन तेंव्हा माझा दृष्टीकोन बदलला म्हणजे काय? तर यावेळी 'चौकशी' ला सामोरे जाण्यासाठी (यात काही नवीन नाही!) पण निदान की कामच करणार नाही, हे पक्कं असल्याने टेन्शन नाही. कारण याआधीपर्यंत जे अकार्यक्षमतेकडे झुकणारे वर्तन होते, ते तरी निदान कमी होईल. शिवाय आता इतर वेळ घालवण्याचे चांगले पर्याय दिसू लागले आहेत. आणि शिवाय दारू इतर कोठेही उपलब्ध असतेच, मग जिथे जास्त वेळ active addiction मध्ये वेळ घालवला तेथे थोडा ताण हा जाणवणारच. असो.
माझ्या मूळ पदासाठी वाट पाहत दारू पीत राहिल्याने खरेतर आज हि वेळ आली हे पटणे अथवा मान्य करणे हा देखील माझ्यामते दृष्टीकोनात्मक बदल असू शकतो. कारण जरी मला आजपर्यंत चांगलेच लोक भेटत गेले, हि वस्तुस्थिती असली तरी, त्याचा कितपत गैरफायदा घ्यावा? यालादेखील मर्यादा असते हे देखील त्याच शिक्षणाचा भाग होय.
इतरांना माझ्यापासून आणि मला इतरांपासून त्रास होणार नाही अथवा, कमीत कमी होईल (कारण त्रास होणारच नाही असे नाही) या दृष्टीने काही काम केल्यास ती देखील तत्व म्हणून पाळता येतील. शब्दांच्या जंजाळात हरवणे हे आता जमत नाही आणि कविकल्पना आता मला परवडणा-या नाहीत. त्यापेक्षा गिल्ट, भीती,न्यूनगंड-अहंगंड आदी वाटत नसेल तर एखाद्याच्या कानाखाली वाजवणे हे देखील rational आहे, असे मी मानतो.
तर ret हि केलेल्या कृत्याची जबाबदारी घ्यायला शिकवते असे ज्यावेळी म्हणतो त्यावेळी जबाबदारी हा शब्द मला फार संयमाने घ्यावा लागेल असे वाटते.
शिवाय आज माझ्या या निवडीला कदाचित घरचेच नको असे म्हणण्याची शक्यता आहे, मात्र आता दुसरे पर्याय आहेत, आणि हा दोन्ही कोणत्याही परिस्थितीत निदान clear राहून साध्य होतील असे वाटते.
त्यामुळे आता जास्त न लिहिता, स्वतःच स्वतःला all the best म्हणतो!

नमस्कार,
आमच्याकडूनही तुम्हाला
all the best!!
वैशाली मॅडम

Thursday 16 December 2010

8x10तसवीर {फुल मूवी}

जेल {फुल मूवी}

माझं आयुष्य हि उत्तम पटकथा : गुरु ठाकूर (मुलाखत)

माझी मैना गावाकडं राहिली...:छक्कड:अण्णा भाऊ साठे

Pentagon Whistleblower Daniel Ellsberg on Wikileaks Iraq War Docs (Part 1 of 2)

ट्रक किंवा रिक्षाच्या मागील साहित्य ...

ट्रक किंवा रिक्षाच्या मागील साहित्य हे कधी हसवणारे असते , कधी विचार करायला लावणारे असते.


' मेरा भारत महान '
" बघतोस काय ? मुजरा कर .....! "
बघतोस काय रागाने , ओव्हरटेक केलंय वाघाने!
" बघ माझी आठवण येते का ?"
" पाहतेस काय प्रेमात पडशील "
"साधू नाही झालात तरी चालेल. संत नाही झालात तरी चालेल. पण माणूस व्हा माणूस."
अं हं. घाई करायची नाही.
तुमच्या हॉर्नने सिग्नल बदलत नाही
" गपगुमान माझ्या मागं मागं सांग-लीला येतीस का ?"
" तुच आहेस तुझ्या जेवणाचा शिल्पकार.. "
" अहो , इकडे पण बघा ना... "
" हे ईश्वरा सर्वांचं भलं कर..... पण सुरुवात माझ्यापासुन कर".
"थांब लक्ष्मी कुंकू लावते!"
"तुमचे लक्ष आमच्याकडे का ?"
" लायनीत घे ना भाऊ"
"चिटके तो फटके!"
"राजे तुम्ही पुन्हा जन्माला या"
"अयोध्या , बेळगाव , कारवार् , निपाणि , इंदौर् , गुलबर्गा , न्यू जर्सी , ह्युस्टन , सॅन्टा क्लारा , सनिव्हेल , फ्रिमॉन्ट् , हेवर्ड , बिजिंग ह्यांच्यासह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे."
"१३ १३ १३ सुरूर !"
" नाद खुळा"
" हाय हे असं हाय बग"
"आई तुझा आशिर्वाद."
" सासरेबुवांची कृपा " -----
" आबा कावत्यात!"
पाहा पन प्रेमाणे
नवतीचा नखरा , गुलजार पाखरा , खरा न धरा , भैरोबा-भैरोबा स्मरा.
" हे तुम्हाला वाचता येत असेल तर तुम्ही फार जवळ आलेला आहात!"
"अच्छा , टाटा , फिर मिलेंगे."
"हरी ओम हरी , श्रीदेवी मेरी..."
"योग्य अंतर ठेवा वाहनामध्ये ...आणि ...मुलांमध्ये.."
"वाट पाहिन पण एस टी नेच जाईन."
"गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी"
"हेही दिवस जातील"
"नाद नाही करायचा ढाण्या वाघाचा"
"घर कब आओगे ?"
"१ १३ ६ रा"
"सायकल सोडून बोला"
"हॉर्न . ओके. प्लीज"
"नानाचा जोर...पप्पु , पिंकी , छोटी , चिंटु , ताई , अमोल , बबलु"
एका एस. टी. च्या मागे (बहुधा ट्रक ड्रायव्हर्स ना उद्देशून)
"तुमच्या वाहनात ऊस , कापूस , कणसं माझ्या वाहनात लाख मोलाची माणसं याचा विचार करून गाडी चालवा "
बाकईच्या मागे सापडलेली काही वाक्ये--
सुसाईड मशिन
मिसगाईडेड मिसाईल
मॉम सेज नो गल्स
बाई(क) च्या मागे नका लागु...माझ्याशी गाठ आहे...
एका ट्रक च्या मागे लिहले होते: राजू , चिंटू , सोनू ....!
अणि खाली लिहले होते .....
बैंक ऑफ़ महाराष्ट्र याच्या सौजन्याने !
एका टेम्पोच्या मागे लिहिलेले: "माझ्याशी पैज लावू नका लय भरी पडेल " आणि खाली लिहिले होते....
" ड्रायवर शिकत आहे" (बारीक़ अक्षरात)
अजस्त्र डंपरच्या पाठीमागे
उगीच हॉर्न वाजवू नये
तुला चिरडायला एक सेकंद पुरेल
एका टेम्पोच्या मागे..
आलात आनंद , बसलात अत्यानंद , उतरलात परमानंद!

फू बाई फू, फुगडी फू

फू बाई फू, फुगडी फू
दमलास काय माझ्या गोविंदा तू
आत पोकळ, बाहेर पोकळ डोंबा-याचा वेळू
म्हातारपणी नवरा केला तोही पोरखेळू
माय-लेकी गोष्टी सांगे त्यांची प्रीत मोठी
...लुगडं सोडून देऊ लागली जावयाच्यासाठी
नवी नवी नवरी तवा शेवरीवाणी लाजं
आता झाली चिली-पिल्लं कोंबडीवाणी झुंजं
काजळ ल्याली, कुंकु ल्याली, टिकली दवी लोका
देवाजीचा संग नाही रंग झाला फिका
संतांची निंदा केली, निंदा नाही बरी
तुकाराम शरण गेले सद्गुरू पायी.

बेस्ट एवर रजनीकांत जोक ....

बेस्ट एवर रजनीकांत जोक ...........................
रजनीचा रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही. खरं तर आपण जमिनीवरच झोपतो, अजूनही जुनाच ब्लॅक अँड व्हाईट मोबाईल वापरतो, साधी कार वापरतो एवढंच नाही तर इतर कलाकारांसारखे विग लावून हिंडत नाही. तरी सुद्धा आपण एवढे अस्वस्थ का हे काही त्याला कळलं नाही. तरी बरं त्यानं झोपण्यापूर्वी एकदा नाही तर दोनदा इन्फिनिटीला झिरोनं डिव्हाईड करून बघितलं होतं आणि दोन्हीवेळा उत्तर सारखंच आलं होतं!
काय बरं झालं असेल? की काही शतकांपूर्वी आपण एका घोड्यावर रागवून त्याच्या तोंडावर खालून एक बॉक्सिंग पंच मारला होता आणि नंतर त्याच्या पुढच्या पिढ्या स्वत:ला जिराफ म्हणवून घेऊ लागल्या होत्या. त्यांचे तळतळाट तर नसतील? पण आपल्याला कुणाचे तळतळाट लागणार आहेत? आपल्या दिशेनं आलेल्या निगेटिव वेव्जना तर आपण नुस्त्या नजरेनं पॉझिटिव करून टाकतो आणि पुढच्या येणा-या निगेटिव वेव्जच्या दिशेनं पाठवतो. नंतर त्या दोन्ही वेव्जची टक्कर होऊन प्रकाश आणि आवाज तयार होतो, काही मूर्ख लोक त्यालाच ‘विजांचा कडकडाट’ असंही म्हणतात, त्याला आता आपण काय करणार? त्यामुळे या शक्यतेलाही काही अर्थ नव्हता. पण झोप येत का नाहीये याचं उत्तर त्याला काही केल्या उत्तर सापडेना.
तेवढ्यात त्याचा फोन वाजला. (आपण तर मिस्ड कॉल्सनाही उत्तर देऊ शकतो, त्यानं मनात विचार केला!) त्यानं डाव्या हातानं फोन उचलला आणि आणि उजव्या हातात फेकला. फेकतानाचा त्याचा अँगल एवढा नेमका होता की हवेच्या प्रेशरमुळे त्याची ‘आन्सर की’ बरोब्बर प्रेस झाली आणि पलिकडला ‘हलो’ ऐकायला आला. एवढ्या रात्रीच्या त्या ‘हलो-हलो’ला हलकट उत्तर द्यावं, असं त्याला वाटलं पण त्याने नुस्ताच हुंकार दिला.
“सायेब, एक मराठी पिच्चर प्रोडूस करतुय त्याबाबद तुमच्याशी बोलता यील ना आत्ता?”

“मला कोणत्याही वेळी बोलता येतं. मी व्हॅक्यूम मध्ये सुद्धा बोलू शकतो.”

“नायी, वाल्युम मोठाच आहे इकडं. पन रागावू नका जरा रातच्याला फोन केला. नाईट कालिंग हाफ रेट मध्ये पडतं ना. आमी प्रायोगिक निर्माते आहोत सायेब, पिच्चर करायचा म्हन्जे पैसे
वाचवावे लागतात सर्वीकडे. तुमी मराठी पिच्चरमदी काम करायचं म्हनला म्हनून फोन केला.”
"ते माहित्येय मला. काय स्टोरी आहे तुमची?”
“ष्टोरी तुमी म्हनाल ती.”
“पण तुमच्या डोक्यात काहीतरी असेल ना?”
“गरीबाला कसली आलीय ष्टोरी न् बिरी सायेब. गावाकडची मान्सं, एक चांगला शेतकरी आन् त्याच्या चांगल्या बायकोचा हात धरनारा बाराचा सरपंच. घरात म्हातारी सासू आन् तमाशाला
जानारा दीर आसलं कायतरी जुगाड असतं सायेब आमचं. तुमी आमच्या पिच्चरमदी काम करा तुमाला पायजे तो रोल करा, हवं तर समदे रोल तुमीच करा पन तुमची ती ष्टाईल आमच्या गावाकडं लई आवडते पब्लिकला तेवडं जमवा सायेब.”
“डिरेक्टर कोण आहे?”
“शंकर.”
“शंकर? त्याच्यासोबत मी लेटेस्ट रोबो केला तो पण मराठी सिनेमा करतोय?”
“न्हाई तो तुमचा शंकर न्हायी सायेब, आमचा शंकर, शंकर विसपुते. ‘सडा निळ्या कुंकवाचा’ला
असिश्टन होता तो सायेब, सातवा. पन तेवडं गागलवाल्या ष्टाईलचं जमवा.”
“बरं.”
“आन् त्या गागलवाल्या ष्टाईलमदे सायेब तुमी गागल वर फेकून डोळ्यावर बशिवता तेवा वरून खाली पडताना तो मोडत आसंल ना कदीमदी?”
“हो मोडतो बरेचदा. त्याचा रिटेक घेतो मग आम्ही.”
“आन् मग गागल तुमी आन्ता का आमाला द्यावा लागंल? न्हायी, रागवू नका सायेब पन आसले रेबानचे चार गागल तुमी मोडले तर बसला का चार चोक सोळा हजाराला बांबू आमाला?"
“अरे पण प्रॉपर्टी तर तुम्हालाच द्यावी लागेल ना?”
“आमी फार तर तुमच्या बिडी फेकन्याच्या ष्टाईलसाठी शिवाजी बिडीचं एक बंडल देऊ. हवं तर माचिसचा आख्खा बॉक्स आनू नवा कोरा. पन काय सायेब आमालाबी परवडलं पायजेल ना? आनि काश्चूम तुमचा तुमाला आनावा लागेल.”
“कमाल झाली तुमची.”
“तसं नाय सायेब, पन अशोक शिंदेसाठी शिवलेली कापडं तुमाला नाई बसली तर कम्परटेबल वाटनार नाई तुमालाच. आपली कापडं आपल्याबरोबर आसलेली बरी, कसं म्हंता?”

“जेवायला तरी घालाल की घरून डबा आणावा लागेल?”
“काय सायेब गरीबाची थट्टा करता? जेवायला घालू की आमी. काय पांढरा म्हना, तांबडा म्हना,
पेशल रस्सा करू रोज. झालंच तर मोर, ससे काय पायजेल ते देऊ की. जेवनात मागंपुडं बघत नाई आम्ही सायेब. शेवटी तुमी काय नि आमी काय, जे काय पैसे कमावतो ते दोन वेळच्या जेवनासाठीच ना? मग त्यात कसली कंजूशी करायची सायेब?”
“आणि पेमेंटचं काय?”
“पेमेंट कॅश करतो की रोजच्या रोज आमी.”
“नशीब माझं. पण किती देणार?”
“मोट्या हिरोला जेऊनखाऊन बारा देतो आमी रोजचे, तुमाला साडेबारा देऊ सायेब.”

“रोजचे साडेबारा लाख फक्त?”
“लाख नायी, हजार सायेब. साडेबारा लाखात तर आमचा पिच्चर कंप्लेट होतो सायेब.”
एवढं ऐकल्यावर रजनीनं एवढ्या रागानं मोबाईलवरचं लाल बटन दाबलं की त्या प्रेशरमुळे पलिकडच्या मोबाईलवर बोलणा-या निर्मात्याचे डोळे आले! गावात डोळ्याची साथ नसतानाही फक्त आपल्या एकट्याचेच डोळे कसे आले या शंकेनं पुढे अनेक दिवस तो बेजार होता म्हणतात. (हे वाचतानासुद्धा काही कमजोर वाचकांचे डोळे येऊ शकतात त्याला रजनी किंवा आम्ही जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.)
फोन झाल्यावर रजनीच्या डोक्यात एकदम प्रकाश पडला. (त्याच्या डोक्यात एकदा प्रकाश पडला की आसपासच्या सतरा जिल्ह्यांचं लोडशेडींग एक महिन्यासाठी बंद होतं!) त्याला एकदम झोप न
लागण्याचं कारण लक्षात आलं. ‘रोबो’च्या प्रमोशनच्या नादात आपण बाळासाहेबांना भेटलो आणि मराठी सिनेमात काम करायची इच्छा असल्याचं जाहीर केलं तेव्हापासून त्याला असल्या ऑफर्स येत होत्या आणि त्याची झोप उडाली होती, अस्वस्थ वाटत होतं. (परिणामत: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला) त्याला वाटलं मराठी सिनेमांची एवढी लाट आली, ऑस्करला मराठी सिनेमे जाताहेत, राष्ट्रीय पुरस्कार पटकावताहेत तेव्हा असेल त्याला मार्केट. पण
निर्मात्यांच्या बजेटचे आकडे ऐकल्यावर त्याला दरदरून घाम फुटला. (...आणि हवामान खात्याच्या
मेधा खोले म्हणतात परतीचा मान्सून!)
मराठी सिनेमाचं एकूण बजेट जेवढं असतं तेवढा खर्च आपल्या सिनेमात फक्त मेक-अप वर होतो आणि आपल्या सिनेमातल्या मेक-अप वर आपण जेवढा वेळ घालवतो साधारण तेवढ्या वेळात अख्खा मराठी सिनेमा पूर्ण होतो हे सूत्र त्याच्या लगेच लक्षात आलं. (एका निर्मात्यानं त्याच्या ‘शिवाजी द बॉस’ हा सिनेमा मराठीत डब करायचे हक्क मागितले होते. त्यानं तो चित्रपट बघितलाही नव्हता पण तो म्हणाला आमच्याकडे केवळ नावावर हा सिनेमा चालेल!)
मग तो हे आठवायला लागला की बाळासाहेबांच्या भेटीनंतर ‘मराठी सिनेमात काम करायची इच्छा आहे’ हे बोलायची आयडिया आपल्याला दिली कुणी? कदाचित असं झालं असेल की पत्रकार परिषदेत प्रश्न वगैरे विचारायचे असतात, असल्या जुनाट कल्पना डोक्यात घेऊन जर्नालिझम स्कूलमधून नुकत्याच बाहेर पडलेल्या एखाद्या अतिउत्साही पत्रकारानं किंवा आपल्या हातात काळं कणीस आहे तेव्हा आपण कुणालाही काहीही विचारू शकतो अशा अतिआत्मविश्वासू पत्रकारिणीनं आपल्याला ‘तुम्ही मराठी चित्रपटात काम करणार का?’ असा प्रश्न विचारला असेल आणि मुंबईत राहून या प्रश्नाला ‘नाही’ असं उत्तर देता येत नाही एवढं कळण्याचा कॉमन सेन्स आपल्याला असल्यामुळे आपण ‘हो’ असं उत्तर दिलं असेल आणि मग लगेच त्याची ‘रजनी करणार मराठी चित्रपटात काम’ अशी ब्रेकींग न्यूज झाली असेल.
...की हे आपणच आपणहून बोललो? कुणी बरं असं बोलायची आयडिया आपल्याला दिली असेल? रजनी विचार करू लागला. त्याच्या साध्या चालण्याचा वेगसुद्धा प्रकाशाच्या वेगाच्या जास्त असतो (आईन्स्टाईन आणि त्याचं याच विषयावर वाजलं होतं. रजनीच्या ऑर्ग्युमेंटनं आईन्स्टाईनच्या डोक्यावरचे केसही विस्कटले होते. ते नंतर कधीच सरळ झाले नाहीत. आज आईन्स्टाईन आपल्यात नाहीत. ईश्वर मृतात्म्यास शांती देवो!)
त्यामुळे त्याचा विचार करण्याचा वेग एवढा प्रचंड होता की पहिला विचार इष्ट स्थळी
पोचायच्या आत मागचा विचार त्याला येऊन भिडत होता. आणि ही प्रक्रिया एवढी प्रचंड वेगात
चालू होती की स्टीफन हॉकिंग्ज तिथे असते तर बिग बँगचं गूढ सहज उकलता आलं असतं. पण रजनीच्या दृष्टीनं त्याचा परिणाम एवढाच झाला की त्याला गाढ झोप लागली. अगदी गाढ.

Monday 13 December 2010

09/07/2010

मला कुत्री खरं तर मनापासून आवडत नाहीत, मात्र आज लिसा (कुत्री) दोन-तीनदा पायातून घोटाळत गेली. तेंव्हा समजले कि आज ती खिन्न आहे कारण आज तिची पिल्ले सोडून देण्यात आली. मलाही अस्वस्थ वाटले. पण त्याचवेळी मनात विचार चमकून गेला...'तुला कुत्र्याचे बरे कळते?' तेंव्हा भावनाप्रधान, संवेदनाक्षम वगैरे म्हणवताना माणसांच्या बाबतीत ती कोठे जाते कोण जाणे!
आज प्रार्थनेच्या आउटपूट विषयी की जे मी मागील qt मध्ये लिहिले आहे त्याप्रमाणे मला काय आवडते आणि माझ्यासाठी चांगले काय?
यातील आणि मला काय शक्य आहे व काय अशक्य आहे, यातील फरक समजणे म्हणजेच शहाणपण हे साधारणपणे सांगण्यास योग्य वाटते. मात्र हे शहाणपण येण्यासाठी god ला मी प्रार्थना करतो तेंव्हा विचार, संकल्पना प्रत्यक्षात आणण्यास काही काळ व्यक्ती आणि सद्सदविवेकबुद्धी जागी करणारी घटना, प्रसंग इत्यादी इत्यादी. हे सर्व खरे आहे मात्र, माझी 'सरेंडर'ची भावना खरी वाटणारी असली तरी फसवी असते कारण तेंव्हा मी 'अहं ब्राह्मस्मी' च्या तो-यात स्वतःलाच देव समजत असतो. कारण मी स्वतःला शहाणा समजतो. हे महत्वाचे वाटते ते यासाठी की, जरी वरवर हो हो म्हटले तरी कुणी (बाह्य व्यक्तीने) मला विचारले की, 'तू आता 'कृपात' आहेस तेंव्हा, व्यवसाय, नोकरी, नातेसंबंध किंवा मनातील गोंधळ याबाबत तू तुझ्या कौन्सिलरचे ऐकशील का?' तर..
तेंव्हा मी पटकन बोलेन, 'मी कांही वेडा नाही! कौन्सिलर मला उद्या विहिरीत उडी मारायला सांगतील! मी मारीन की काय?'
तेंव्हा हे विसरून जातो की पुढचा भाग... माझ्या भल्यासाठी कार्यरत असलेली उच्च शक्ती ती ए.ए. वा 'कृपा' पण ...पण माझ्यासारख्या दारुड्याचा कोणावरच विश्वास नसतो..अगदी स्वतःवर देखील!
पण माझ्या बाबत तरी जरूर तेवढे समजून घेऊन त्यानुसार कृतीचा प्रयत्न करणे मात्र हि अवस्था पूर्ण न झाल्याने किंवा न समजल्याने 'झैलसिंग' सारखी झाली आहे.
त्याचे असे आहे की, झैलसिंग यांना इंग्रजीचा प्रॉब्लेम असल्याने राजीवजी आपल्या सुधारणावादी दृष्टीने त्यांना केम्ब्रिज येथे पाठवतात. परत आल्यावर त्यांना चाचणी घेतात, ती अशी की त्यांनी तिथे उपस्थित सर्वाना 'कम हियर' असे इकडे ये असे नाव घेऊन म्हणायचे असते ब-याच लोकांना ते बोलावतात. आता नजमा हेपतुल्ला यांना तिकडे जा असे सांगण्यास राजीवजी सांगतात..त्यावर झैलसिंग विरुद्ध कोप-यात जाऊन म्हणतात,'नजमा, काम हिअर!!' आता परत त्यांना इंग्रजीचे बेसिक शिकण्यासाठी राजीवजी ऑक्सफर्ड येथे पाठवतात. परत आल्यावर त्यांना एबीसीडी म्हणायला सांगतात. त्यावर झैलसिंग विचारतात, "जी पहलेवाली बोलू या दुसरेवाली?"
विनोदाचा भाग सोडला तरी काही बाबतीत हि अवस्था आहे खरी!
शिवाय भावनात्मक प्रसंगांना rational दृष्टीकोनातून बघणे आणि हाय सेल्फ इमेज याबद्दल मी नंतर बोलेनच. हे सर्व लिहिताना कधी कधी हसू येते की, कारण आमच्या गावाकडे जर कुणी या वह्या पहिल्या तर म्हणतील, "साधी दारू सोडायची! तर त्यासाठी एवढा खटाटोप कशाला?"
साधा मनावर कंट्रोल असला की पुरे!!
हेही खरेच आहे. पण त्याशिवाय माझुई छोटी बहिण म्हणते त्याप्रमाणे, तुला काही झाले नाही, होत नाही, तुला आलाय माज!!
हे देखील तितकेच खरे!!!

नमस्कार,
सगळं कळतंय ते बरं आहे!
आपले विचार किंवा दृष्टीकोन बदलला आहे असं आपण म्हणतो तर मग ते कसं?  ते सांगू शकाल का?
तुमच्या प्राथमिकता कोणत्या आहेत, ते जरा विचार करून ठेवा. आपण बोलू.

वैशाली मॅडम

Tuesday 7 December 2010

आगगाडी आणि जमीन: कुसुमाग्रज

नको ग! नको ग!
आक्रंदे जमीन
पायाशी लोळत
विनवी नमून -

धावसी मजेत
वेगत वरून
आणिक खाली मी
चालले झुरुन

या ओळींच्या यमक-प्रासात रेल्वे गाडीच्या गतीचा ताल ऐकू येतो.

छातीत पाडसी
कितीक खिंडारे
कितिक ढाळसी
वरून निखारे!

नको ग! नको ग!
आक्रंदे जमीन
जाळीत जाऊ तू
बेहोष होऊन.

आगगाडी मात्र स्वतःच्या मस्तीत गुर्मित म्हणते -

दुर्बळ! अशीच
खुशाल ओरड
जगावे जगात
कशाला भेकड

पोलादी टाचा या
छातीत रोवून
अशीच चेंदत
धावेन! धावेन!

(आगगाडीचा ताल संपूर्ण कवितेत जाणवतो)

या उन्मत्त गाडीचे बोल ऐकून जमीन सूडाने पेटून उठते.

हवेत पेटला
सूडाचा धुमारा
कोसळे दरीत
पुलाचा डोलारा!

जमीनीच्या ताकदीपुढे गाडीचे काहीही चालले नाही -

उठला क्षणार्ध
भयाण आक्रोश
हादरे जंगल
कापले आकाश

उलटी पालटी
होऊन गाडी ती
हजार शकले
पडती खालती! 


संकलक : प्रवीण कुलकर्णी

क्रांतीचा जयजयकार : कुसुमाग्रज

क्रांतीचा जयजयकार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार
अन् वज्रांचे छातीवरती घ्या झेलून प्रहार!

खळखळू द्या या अदय शृंखला हातापायांत
पोलादाची काय तमा मरणाच्या दारात?
सर्पांनो उद्दाम आवळा, करकचूनिया पाश
पिचेल मनगट परि उरातील अभंग आवेश
तडिताघाते कोसळेल का तारांचा संभार
कधीही तारांचा संभार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!

क्रुद्ध भूक पोटात घालू द्या खुशाल थैमान
कुरतडू द्या आतडी करू द्या रक्ताचे पान
संहारक काली, तुज देती बळीचे आव्हान
बलशाली मरणाहून आहे अमुचा अभिमान
मृत्यूंजय आम्ही! आम्हाला कसले कारागार?
अहो हे कसले कारागार?
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!

पदोपदी पसरून निखारे आपुल्याच हाती
होऊनिया बेहोष धावलो ध्येयपथावरती
कधी न थांबलो विश्रांतीस्तव, पाहिले न मागे
बांधू न शकले प्रीतीचे वा कीर्तीचे धागे
एकच ताळा समोर आणिक पायतळी अंगार
होता पायतळी अंगार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!

श्वासांनो जा वायूसंगे ओलांडुनी भिंत
अन् आईला कळवा अमुच्या हृदयातील खंत
सांगा वेडी तुझी मुले ही या अंधारात
बद्ध करांनी अखेरचा तुज करिती प्रणिपात
तुझ्या मुक्तीचे एकच होते वेड परि अनिवार
तयांना वेड परि अनिवार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!

नाचविता ध्वज तुझा गुंतले शृंखलेत हात
तुझ्या यशाचे पवाड गाता गळ्यात ये तात
चरणांचे तव पूजन केले म्हणुनी गुन्हेगार
देता जीवन-अर्घ्य तुला ठरलो वेडेपीर
देशील ना पण तुझ्या कुशीचा वेड्यांना आधार
आई वेड्यांना आधार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!

कशास आई, भिजविसी डोळे, उजळ तुझे भाल
रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल
सरणावरती आज अमुची पेटता प्रेते
उठतील त्या ज्वालांतून क्रांतीचे नेते
लोहदंड तव पायांमधले खळखळा तुटणार
आई, खळखळा तुटणार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!

आता कर ॐकारा तांडव गिळावया घास
नाचत गर्जत टाक बळींच्या गळ्यावरी फास
रक्तमांस लुटण्यास गिधाडे येऊ देत क्रूर
पहा मोकळे केले आता त्यासाठी ऊर
शरीरांचा कर या सुखेनैव या सुखेनैव संहार
मरणा, सुखेनैव संहार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा क्रांतीचा जयजयकार 

संकलक : प्रवीण कुलकर्णी

कोलंबसाचे गर्वगीत:कुसुमाग्रज

हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे, प्रतिध्वनीने त्या समुद्रा, डळमळु दे तारे
विराट वादळ हेलकावु दे पर्वत पाण्याचे ढळु दे दिशाकोन सारे

ताम्रसुरा प्राशुन मातु दे दैत्य नभामधले, दडु द्या पाताळी सविता
आणि तयांची अधिराणी ही दुभंग धरणीला, कराया पाजळु दे पलिता

की स्वर्गातून कोसळलेला, सूड समाधान मिळाया प्रमत्त सैतान
जमवुनि मेळा वेताळांचा या दरियावरती करी हे तांडव थैमान

पदच्युता, तव भीषण नर्तन असेच चालु दे फुटु दे नभ माथ्यावरती
आणि तुटु दे अखंड उल्का वर्षावत अग्नी नाविका ना कुठली भीती

सहकाऱ्यांनो, का ही खंत जन्म खलाशांचा झुंजण्या अखंड संग्राम
नक्षत्रांपरी असीम नीलामध्ये संचरावे, दिशांचे आम्हांला धाम

काय सागरी तारु लोटले परताया मागे, असे का हा आपुला बाणा
त्याहुन घेऊ जळी समाधी सुखे कशासाठी, जपावे पराभूत प्राणा?

कोट्यवधी जगतात जीवाणू, जगती अन् मरती जशी ती गवताची पाती
नाविक आम्ही परंतु फिरतो सात नभांखाली निर्मितो नव क्षितिजे पुढती

मार्ग आमुचा रोधू न शकती ना धन ना दारा घराची वा वीतभर कारा
मानवतेचे निशाण मिरवू महासागरात, जिंकुनी खंड खंड सारा

चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती, कथा या खुळ्या सागराला
"अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला!" 


संकलक : प्रवीण कुलकर्णी

असाच : ना. घ. देशपांडे

वेगळीच जात तुझी;
वेगळाच ताल
तूं अफाट वाट तुझी
एकटाच चाल.

एकटाच चालत जा
दूर दूर दूर
गात गात तूंच तुझा
एकटाच सूर

एकटाच चालत जा
उंच आणि खोल;
बोल आणि ऍक पुन्हा
तूं तुझा बोल.

तूं असाच झिंगत जा
विस्मरून पीळ
तूं असाच फुंकीत जा
अर्थशून्य शीळ

अंतरात पाहत जा
भास तूं तुझेच्;
शांततेत ऍकत जा
श्वास तूं तुझेच.

खोल या दरीत अशा
गर्द साऊलीत
हो निमग्न तूंच तुझ्या
मंद चाहुलीत. 

संकलक: प्रवीण कुलकर्णी

WikiLeaks founder arrested in London

Nation on alert post Varanasi blast

Bomb blast in varanasi at 6:30 pm

संकीर्ण भाऊसाहेब : मराठी शायरी

पत्रे तिला प्रणयात आम्ही खुप होती धाडली,
धाडली आशी होती की नसतील कोणी धाडली

धाडली मजला तिने ही, काय मी सांगु तीचे
सव॔ ती माझीच होती, एकही नव्हते तीचे

पत्रात त्या जेव्हां तिचे ही पत्र हाती लागले
वाटले जैसे कोणाचे गाल हाती लागले

पत्रात त्या हाय ! तेथे काय ती लिहीते बघा
माकडा आरशात आपुला चेहरा थोडा बघा

साथ॔ता संबोधनाची आजही कळली मला
व्यर्थता या य़ौवनाची तिही आता कळाली मला

नाही तरिही धीर आम्ही सोडीला काही कुठे
ऐसे नव्हे की माकडाला, माकडी नसते कुठे 

एकदा मेल्यावरी मी परतुनी आलो घरी
तेच होते दार आणि तीच होती ओसरी ।

होती तिथे तसबीर माझी भिंतीवरी टांगली
खूप होती धूळ आणि कसर होती लागली ।

द्रवलो तिला पाहून, होती शेवटी माझीच ती
दिसली मला पण आज माझ्या प्रेताहुनी निस्तेज ती ।

बोलली की हीच का, माझ्यावरी माया तुझी
गेलास ना टाकून, होती प्रत्यक्ष जी छाया तुझी ।

बोलली हे ही तुला का सांगावया लागते
मेल्यावरी जगण्यास वेड्या, खूप कीर्ति लागते ।

होऊनी स्वार्थांध नुसता, कैसातरी जगलास तू
आहेस का, केला कुठे, जगण्याविना पुरुषार्थ तू? ।

समजली ना, आता तरी, आपुली स्वत:ची पायरी
समजले ना काय मिळते, नुसती करूनी शायरी? ।

ओशाळलो ऐकून, नेली तसबीर मी ती उचलुनी
सांगतो ह्याची तिथे, चर्चाही ना केली कुणी । 

हसतील ना कुसुमे जरी, ना जरी म्हणतील 'ये'
पाऊल ना टाकू तिथे, बाग ती आमुची नव्हे
भ्रमरा परी सौंदर्य वेडे, आहो जरी ऐसे अम्ही
इष्कातही नाही कुठे, भिक्षुकी केली अम्ही

खेळलो इष्कात आम्ही, बेधुंद येथे खेळलो
लोळलो मस्तीत नाही पायी कुणाच्या लोळलो
अस्मिता इष्कात सार्या, केव्हाच नाही विसरलो
आली तशीही वेळ तेव्हा इष्क सारा विसरलो

रडलो आम्ही इष्कात, जेव्हा आम्हा रडावे वाटले
तेव्हा नव्हे इष्कास जेव्हा आम्ही रडावे वाटले
आसूवरी अधिकार हाही, इष्कात ज्याला साधला
नुसताच नाही इष्क त्याला मोक्ष आहे साधला

बर्बादिची दीक्षा जशी इष्कात आम्ही घेतली
इष्कही बर्बाद करण्या, माघार नाही घेतली
ना रडू नुसतेच आम्ही, हाय ना नुसते करु
आहो शिवाचे भक्त आम्ही, हेही करु तेही करु

नव्हता तसा केवीलवाणा, इष्क केव्हा आमुचा
होता पुरे प्रणयात सारा, नुसता इशारा आमुचा
दोस्तहो, या अप्सरांनी नाही आम्हांला रडविले
रडविले जे काय आमुच्या संयमाने रडविले

हे खरे आहो अम्हीही इष्कात या रडलो कधी
रडलो असे इष्कात नाही नयनासही कळले कधी 

सांगशी निष्काम कर्मा, कृष्णा अरे वेदांत तू
समजला की काय आम्हा किर्लोस्करांचा पंप तू

मोक्ष हा परमार्थ ऐसे सांगशी जेथे तिथे
तू तरी देवा कधी आहेस का गेला तिथे?

भोगीशी ऐश्वर्य, सारे वंदिति एच्छा तुझी
सन्यास पण सार्‍या जगाने, घ्यावा अशी एच्छा तुझी

निष्कामता अंगी, थोडी जरी असती तुझ्या
धावूनी सार्‍या येता, आमच्याकडे गोपी तुझ्या

अरे भगवंता भेटुनीया, मज काय देशील तू?
मंत्र्या परी येशील, थोडा हासूनी जाशील तु

प्रारब्ध जर अमुचे, आम्हा आहे भोगायचे
सांग तर आम्ही कशाला,कुंकू तुझे लावायचे 

नाजूकता ऐसी कुणी पाहिली नाही कधी
नजरही आम्ही तिच्यावर टाकली नाही कधी
भय आम्हा नाजूकतेचे हेच होते वाटले
भारही नजरेतला या सोसेल नव्हते वाटले

टाकसी हळुवार अपुली नाजूक ईतुकी पाऊले
टपकती हलकेच जैसी परिजाताची फ़ुले
नाजूकता जाणून आम्ही आधीच होती बिछवली
पायातळी केव्हाच तुझिया विकल ह्रुदये आपुली

इतुका तरी हा स्पर्श ह्रुदया होईल होते वाटले
इतुके तरी सद्भाग्य उदया येईल होते वाटले
कल्पना नाजूकतेची आम्हासही नव्हती कधी
गेली आम्हा तुडवून आम्हा कळलेच ना गेली कधी 

भीती तिला प्रणयात कोणी पाहील याची वाटते
येवूनही स्वप्नी माझ्या हेच तिजला वाटते

म्हणते कशी कैसी तरी स्वप्नात ह्या आले तुझ्या
सारेच पण आहेत बाई भोवती जागे तुझ्या

जाणते सर्वांस यांना मी ही नव्हते साधी तशी
स्वप्नातही येतील मेले मी जशी आले तशी

भेटण्या जेव्हा तिच्या स्वप्नात मी गेलो तिथे
स्वप्नातही अपुल्या स्वत:च्या हाय ती नव्हती तिथे

त्रास ऐशा अप्सरेला हाच असतो सारखा
नेतो तिला उचलून जो तो आपुल्याच स्वप्नी सारखा

ऐकिले दुसर्‍या कुणाच्या स्वप्नात ती आहे तिथे
बोलाविले नव्हते तरीही धावुनी गेलो तिथे

आता तरी दुर्दैव वाटे नकीच माझे संपले
पोचण्या आधीच ते ही स्वप्न सारे संपले 

जन्मातही नव्हते कधी मी, तोंड माझे लपविले
मेल्यावरी संपूर्ण त्यांनी, वस्त्रात मजला झाकले

आला असा संताप मजला, काहीच पण करता न ये
होती आम्हा जाणीव की, मी मेलो, आता बोलू नये

कफ़न माझे दूर करुनी, पाहिले मी बाजूला
एकही आसू कुणाच्या, डोळ्यात ना मी पाहिला

बघुनि हे, माझेच आसू धावले गालावरी
जन्मभर हासून मी, रडलो असा मेल्यावरी

मरता आम्ही, शोकार्णवी बुडतील सारे वाटले
श्रद्धांजली तर जागजागी देतील होते वाटले

थोडे जरी का दु:ख माझे, असता कुणाला वाटले
जळण्यातही सरणात मजला, काहीच नसते वाटले

ऐसे जरी संतोष तेव्हा मानिला इतुकाच मी
कळलेच ना तेव्हा कुणा कफ़नात जे रडलो आम्ही

त्यांचेच हे उपकार ज्यांनी, झाकले होते मला
झाकती प्रेतास का ते तेव्हा कुठे कळले मला

लाभला एकांत जेव्हा, सरणात त्या माझ्या मला
रोखता आलाच नाही, पूर अश्रूंचा मला

जेव्हा चिता ही आसवांनी, माझी विझाया लागली
चिंता कसा जळणार आता, ह्याचीच वाटू लागली

मारतो राजास एक्का, नहिल्यास दहीला मारतो
कल्पनेचे खेळ सारे, कोणी कुणा ना मारतो
पाहता कोणात काही नाही कुठेही वेगळे
सारेच तुकडे कागदाचे, छाप नुसते वेगळे

आता जरासा रंग काही खेळास येऊ लागला
पत्यातला राजा स्वतःला राजाच मानू लागला
राणीसही जाणिव काही और होऊ लागली
लाजलि नव्हती कधी ती आज लाजू लागली

दिनतेचा खेद आता दुर्रीस होऊ लागला
पंजा म्हणे चौर्र्यास आता श्रीमंत वाटु लागला
विसरून निजरुप नुसत्या नामरुपी गुंतले
भलत्याच कुठल्या अवदसेच्या पाषात आता गुंतले

नुसता उपाधी भेद कोणी राजा नव्हे राणी नव्हे
आणखी सांगु पुढे तो खेळही अमुचा नव्हे
खेळतो दुसराच, त्याला पाहिले नाही कुणी
म्हणती तयाला ईश, म्हणति अल्ला कुणी, येशू कुणी

त्याचा म्हणे हा खेळ, नुसते पत्ते आम्ही पत्यातले
एका परि पत्त्यास कळले मर्म हे पत्यातले
आहे इथे रंगेल कोणी पत्ता असा पत्यातला
आहे जरी पत्यातला तो नाही तसा पत्यातला

नामरूपाचा सतःच्या पत्ताच ना त्याला कधी
ना कशाची खंत होतो राजा कधी, दुर्री कधी
हासतो नुसताच आहे सर्वाहुनी हा वेगळा
आणखी सांगाल काहो वेदांत कोणी वेगळा 

संकलक:प्रवीण कुलकर्णी

क्षितीज रुंद होत आहे - नारायण सुर्वे

आज माझ्या वेदनेला
अर्थ नवा येत आहे
आणि मेघांच्या डफावर
थाप बिजली देत आहे
आज मरण आपुल्याच
मरणाला भीत आहे
आणि मृत्युंजयी आत्मा
पुन्हा धडक देत आहे
आज शुष्क फांद्यावर
बहर नवा येत आहे
भूमीच्या गर्भामधुनी
बीज हुंकार देत आहे
आज सारे गगन थिटे
नजरेला येत आहे
काळोखाच्या तबकडीत
सूर्य गजर देत आहे
आज तडकलेले मन
एकसंध होत आहे
आणि उसवलेले धागे
गुंफूनीया देत आहे
आज माझ्या कोरड्या गा
शब्दात आग येत आहे
आणि नव्या सृजनाचे
क्षितीज रुंद होत आहे. 

संकलक: प्रवीण कुलकर्णी

प्रिझनर्स डिलेमा : अजय भागवत

मनुष्यबळ विकास व्यवस्थापनाचा (एचआरएम) अभ्यास केलेले आणि "नेतेगिरी" (मराठी- लिडरशिप) चा अभ्यास केलेल्यांना कदाचित माणसाच्या ह्या मानसिक द्वंद्वाची, कलाची माहिती असेल. मला जेव्हा ह्या थेअरीची तोंडओळख झाली तेव्हा मी हरखून गेलो होतो व पटले की, ही एक बहूव्यापी थेअरी आहे. - असे मी का म्हणतो आहे, ते नंतर सांगितलेले आहेच. प्रथम ह्या थेअरीची पार्श्वभूमी (उगम) पाहू व तीचा नेतेगिरीत कसा वापर होतो ते पाहू.
"प्रिझनर्स डिलेमा" ला आपण ह्या गोष्टीपुरते "कैद्यांचा पेच" असे म्हणू. 
गृहीत धरा की, एका मोठ्या गुन्ह्यात दोन (अ आणि ब) संशयितांना पकडले आहे. पोलिस त्यांना वेगवेगळ्या कैद-खोलीत डांबून ठेवतात. नंतर पोलिस त्यांना वेगवेगळे भेटून त्यांच्यासमोर एकच आणि तोच प्रस्ताव ठेवतात. प्रस्ताव असा असतो- 

कैदी ब गप्प बसला
कैदी ब ने, अ बद्दल पुरावे दिले
कैदी अ गप्प बसला
दोघांना ६ महिन्याची साधी कैद
कैदी ब ची सुटका,
अ ला १० वर्षे कारावास
कैदी अ ने, ब बद्दल पुरावे दिले
कैदी अ ची सुटका,
 ब ला १० वर्षे कारावास
दोघांना ५ वर्षांचा कारावास
चौकटीत दाखवल्याप्रमाणे पोलिस त्या दोघांनाही तो प्रस्ताव समजावुन सांगतात. दोघांनाही त्यातील फायदे व तोटे स्पष्ट दिसतात. दोघेही गप्प बसले तर दोघांचाही त्यात फायदा असतो. पण एक जण गप्प बसला आणि दुसऱ्याने त्याच्याबद्दल पुरावे दिले तर साहजिकच गप्प बसणाऱ्याची मुक संमती आहे असे मानून त्याला गुन्ह्याची सजा मिळणार हे दोघांनाही समजते. 
आणि हाच त्यांचा पेच असतो. 
पहिल्या मार्गाचा अवलंब केल्यास (दोघांनीही गप्प बसणे), दुसऱ्याची काहीच शाश्वती नसल्यामुळे सरळसरळ आत्महत्या केल्यासारखेच होईल ह्या भीतीने गप्प आपण बसण्याचा मार्ग स्वीकारणे दोघांनाही योग्य वाटत नाही. त्यांना ही जाणीव असते की, त्यामुळे दोघेही कमीत-कमी शिक्षेच्या प्रस्तावाला मुकणार असतात. 
तो मार्ग दुसरा मार्ग स्वीकरल्यास (दोघेही एकमेकांबद्दल काही-बाही पुरावे देतील), दोघांनाही १० वर्षांऐवजी ५ वर्षे कैद होईल. आणि हाच मार्ग ते निवडतात. दुसऱ्याला आपल्या गप्प बसण्यामुळे पूर्ण फायदा होईल अ तो सुटेल आणि आपण मात्र १० वर्षे कैदेत खितपत पडून राहू हे शहाणपणाचे त्यांना वाटत नाही. दोघेही गप्प बसतील असा विश्वास त्यांना एकमेकाबद्दल वाटणे शक्य नाही, मग अशा परिस्थितीत ते दोघेही तोंड उघडतात व चक्क दुसऱ्याचा फायदा होऊ नये म्हणून आपले नुकसान स्वीकारतात. 
"दुसऱ्याचा फायदा होऊ नये म्हणून आपले नुकसान स्वीकारणे" हाच तो कळीचा मुद्दा, ज्याला कैदयांचा पेच असे म्हणले जाते. मनोभ्यासक ह्या मनोवृत्तीचा बारकाईने अभ्यास करतात व त्याचा संबंध आपल्या रोजच्या आयुष्यात कसा लागू पडतात ते पाहतात. 
सांघिक काम- टिमवर्क- हे जितके सोपे वाटते तितकेच अवघड असलेले एक कौशल्य. एकाच छपराखाली एकाच संघटनेत, कंपनीत, कार्यालयात काम करणाऱ्या संघांमधे अशी रस्सीखेच होणे हे नैसर्गिक आहे; पण ते हिताचे नाही. मानवाच्या ह्या अशा मनोवृत्तीची जाण असणे हे प्रत्येक नेत्याचे कर्तव्य आहे. त्यातून मार्ग कसा काढायचा हा लेखाचा एक स्वतंत्र विषय आहे. नेत्यांना ह्याची ओळख एका खेळाव्दारे करुन दिली जाते- "विन ऍज मच ऍज यु कॅन". 
पण ह्या मनोवृत्तीचे अस्तित्व कसे व्यापक आहे ह्याची काही उदाहरणे पाहू-
१. दोन शेजारील राष्ट्रे आपल्याकडील शस्त्रसंख्या, वैविध्य, आधुनिकता ह्यांचा विचार करत असतांना, दोघेही एकत्र येऊन शस्त्रांवर होणारा खर्च कमी करु शकतात. पण तसे होत नाही. दोघेही राष्ट्रे आपल्या इतर आवश्यक गुंतवणूकीवर टाच आणून शस्त्रांवर जास्तीत जास्त गुंतवणूक करतात. 
२. खेळामधे स्टेरॉइडचा वापर एकाने न करणे व दुसऱ्याने करणे....
३. वातावरणाला घातक अशा वायूंचा उत्सर्ग रोखण्यासाठी काही कठोर बंधंनं स्वतः वर लादून घेणे. पण दुसऱ्या राष्ट्रांनी जर तसे केले नाही तर पहिला त्यात नुकसान करुन घेईल व दुसऱ्या देशातील लोक मजा करतील....
तर, असा आहे प्रिझनर्स डिलेमा!
 
संकलक:प्रवीण कुलकर्णी

Monday 6 December 2010

07/07/2010

माझी सेल्फ इमेज कदाचित 'हाय' असू शकेल, मात्र मी मागच्या आउटपूट मध्ये सेल्फ एस्टीम बद्दल सांगितले की, स्वत्वाच्या ज्या पाच पातळ्या किंवा मापदंड आहेत, ओळख, सुरक्षा, तुमच्यासोबत कोण?, पात्रता...इत्यादी. या सर्वांमध्ये माझा सेल्फ एस्टीम हा अत्यंत लो दिसतो, असे जाणवते. असो.
आज आउटपुटमध्ये मोहित सरांनी एक टेस्ट घेतली. त्यात माझे रीलॅप्सचे चान्स २०% इतके आहेत म्हणजेच ८०%सुधारण्यास चान्स आहे! हे मी सकारात्मक दृष्टीकोनातून वगैरे लिहित नाही, तर त्यात विचारलेल्या कांही पश्नांच्या माझ्या उत्तरांवरून लिहित आहे. उदा: तुम्ही सगळ्या जगावर रागावला आहात काय? हे असले कांही माझ्याबाबत होत नाही. सगळ्या जगा-बिगावर आपण नाही रागवत बाबा! त्यामुळे माझ्यात सुधारणेला वाव आहे असे मी मानतो. असो.
आज टर्निंग पॉईंट मध्ये नीलकंठ सर होते. मिटिंग आगोदर मी त्यांची बोललो होतो. आम्ही जे बोललो तेच मिटिंग मध्ये पुन्हा ते बोलले उदा: व्यसन चालू असताना (active addiction ) मध्ये जी मंडळी (घरची सोडून ) आपल्याला पाहत असतात, त्यांच्यात परत जायला कितपत संकोच वाटतो? हा प्रश्न विचारल्यावर त्यांनी इथलेच उदाहरण दिले आणि 'बित गया सो बित गया' म्हणून सोडून पुढे जातो असे सांगितले. मात्र मी ते अजून करू शकत नाही. 
पण त्याचबरोबर एक मुद्दा त्यांचा आवडला की, काल(किंवा आजदेखील) जी चार माणसे मला वाईट समजतात, त्याचप्रमाणे शंभर माणसे चांगला देखील समजत असतात हे देखील इथे ध्यानात ठेवले पाहिजे. पण इथे देखील 'the others ' च्या वरच अवलंबित्व दिसते. असो. आणि पुस्तकाच्या झेरॉक्स प्रती दिल्याबद्दल धन्यवाद!
त्या पुस्तकातील काही कल्पना आवडल्या त्यात कॅरम खेळताना सहज जाणीवपूर्वक केल्या उदा: ऐनवेळी कच खाण्याची वृत्ती आणि त्यापाठीमागचे स्वागत तसेच डॉ. नाडकर्णी यांची कुल टेन्शन ची संकल्पना इत्यादी. अर्थात हे कदाचित हास्यास्पद वाटेल मात्र असे लहान लहान प्रयोग करायला मला आवडते. यानंतर लांबणीवर पडलेला मुद्दा, 'नकारात्मक भावनांची यादी करणे' हे कंटाळवाणे वाटते. आणि असे कांही वाचत असताना मी भयंकर रॅशनल वगैरे असल्याचा भास होतो!!
आता सर्वात आणि अत्यंत महत्वाचे..(हे शेवटच्या पाच मिनिटात लिहिण्याचा दंडक आहे.....)
ते असे की...मी एक साक्षात 'योगी' आहे, असा साक्षात्कार मला आज सकाळी, 'मिस्टर रॉब' यांनी घडवला!
तो असा की, त्यांनी योग म्हणजे काय हे सांगताना यम/नियम/आसन/प्राणायाम/प्रत्याहार/धारणा/ध्यान आणि समाधी या  ज्या आठ अवस्था सांगितल्या त्यापैकी मी व्यसन काळात (active  addiction )मध्ये पहिल्या सात अवस्था 'स्किप' करून डायरेक्ट थेट आठव्या समाधी अवस्थेस प्राप्त होत असे!
ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत या अवस्थेचे वर्णन केले आहे, ते म्हणतात, त्यानुसार ब्रम्हांडाचे दर्शन देखील मला होत असे! सूक्ष्माती सूक्ष्म प्रत्यय आणि निराकारता त्याचप्रमाणे मला स्थळ/काळाचे देखील बंधन नसायचे!
थोडक्यात, आत्मा परमात्मा एकरूप व्हायचा!
पण फरक इतकाच की, कांही नतदृष्ट लोक त्यास आंग्ल भाषेत black out म्हणत!(म्हणोत बापडे!, त्यांना हि अवस्था काय ठावूक?)


नमस्कार,
चला, हे बरे झाले की तुम्ही एवढी परमावधीची अवस्था अनुभवली हे भारीच! आम्हा पामरांना ते अजून जमलेले नाही.असो. ८०%आशा म्हणजे छानच!
फ्राईड म्हणतो ते खूप बाबतीत लागू पडतं, selective forgetting
किंवा selective hearing किंवा selective attentiveness हे सगळं असतंच त्यामुळे निगेटिव्ह कॉमेंट आपण जास्त लक्षात ठेवतो. सकारात्मक खुपदा घेताच येत नाही. त्याबद्दल  acceptance च नसतो. व त्या अळवाच्या पानावरून पाणी जातं तसं घसरून पडून जातात. compliments आणि नकारात्मकच लक्षात राहतं. तर त्यावर काम करावं लागतं तर साहित्यामध्ये काहीतरी करून दाखवा हेच तात्पर्य !

वैशाली मॅडम

 

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....