Monday 13 December 2010

09/07/2010

मला कुत्री खरं तर मनापासून आवडत नाहीत, मात्र आज लिसा (कुत्री) दोन-तीनदा पायातून घोटाळत गेली. तेंव्हा समजले कि आज ती खिन्न आहे कारण आज तिची पिल्ले सोडून देण्यात आली. मलाही अस्वस्थ वाटले. पण त्याचवेळी मनात विचार चमकून गेला...'तुला कुत्र्याचे बरे कळते?' तेंव्हा भावनाप्रधान, संवेदनाक्षम वगैरे म्हणवताना माणसांच्या बाबतीत ती कोठे जाते कोण जाणे!
आज प्रार्थनेच्या आउटपूट विषयी की जे मी मागील qt मध्ये लिहिले आहे त्याप्रमाणे मला काय आवडते आणि माझ्यासाठी चांगले काय?
यातील आणि मला काय शक्य आहे व काय अशक्य आहे, यातील फरक समजणे म्हणजेच शहाणपण हे साधारणपणे सांगण्यास योग्य वाटते. मात्र हे शहाणपण येण्यासाठी god ला मी प्रार्थना करतो तेंव्हा विचार, संकल्पना प्रत्यक्षात आणण्यास काही काळ व्यक्ती आणि सद्सदविवेकबुद्धी जागी करणारी घटना, प्रसंग इत्यादी इत्यादी. हे सर्व खरे आहे मात्र, माझी 'सरेंडर'ची भावना खरी वाटणारी असली तरी फसवी असते कारण तेंव्हा मी 'अहं ब्राह्मस्मी' च्या तो-यात स्वतःलाच देव समजत असतो. कारण मी स्वतःला शहाणा समजतो. हे महत्वाचे वाटते ते यासाठी की, जरी वरवर हो हो म्हटले तरी कुणी (बाह्य व्यक्तीने) मला विचारले की, 'तू आता 'कृपात' आहेस तेंव्हा, व्यवसाय, नोकरी, नातेसंबंध किंवा मनातील गोंधळ याबाबत तू तुझ्या कौन्सिलरचे ऐकशील का?' तर..
तेंव्हा मी पटकन बोलेन, 'मी कांही वेडा नाही! कौन्सिलर मला उद्या विहिरीत उडी मारायला सांगतील! मी मारीन की काय?'
तेंव्हा हे विसरून जातो की पुढचा भाग... माझ्या भल्यासाठी कार्यरत असलेली उच्च शक्ती ती ए.ए. वा 'कृपा' पण ...पण माझ्यासारख्या दारुड्याचा कोणावरच विश्वास नसतो..अगदी स्वतःवर देखील!
पण माझ्या बाबत तरी जरूर तेवढे समजून घेऊन त्यानुसार कृतीचा प्रयत्न करणे मात्र हि अवस्था पूर्ण न झाल्याने किंवा न समजल्याने 'झैलसिंग' सारखी झाली आहे.
त्याचे असे आहे की, झैलसिंग यांना इंग्रजीचा प्रॉब्लेम असल्याने राजीवजी आपल्या सुधारणावादी दृष्टीने त्यांना केम्ब्रिज येथे पाठवतात. परत आल्यावर त्यांना चाचणी घेतात, ती अशी की त्यांनी तिथे उपस्थित सर्वाना 'कम हियर' असे इकडे ये असे नाव घेऊन म्हणायचे असते ब-याच लोकांना ते बोलावतात. आता नजमा हेपतुल्ला यांना तिकडे जा असे सांगण्यास राजीवजी सांगतात..त्यावर झैलसिंग विरुद्ध कोप-यात जाऊन म्हणतात,'नजमा, काम हिअर!!' आता परत त्यांना इंग्रजीचे बेसिक शिकण्यासाठी राजीवजी ऑक्सफर्ड येथे पाठवतात. परत आल्यावर त्यांना एबीसीडी म्हणायला सांगतात. त्यावर झैलसिंग विचारतात, "जी पहलेवाली बोलू या दुसरेवाली?"
विनोदाचा भाग सोडला तरी काही बाबतीत हि अवस्था आहे खरी!
शिवाय भावनात्मक प्रसंगांना rational दृष्टीकोनातून बघणे आणि हाय सेल्फ इमेज याबद्दल मी नंतर बोलेनच. हे सर्व लिहिताना कधी कधी हसू येते की, कारण आमच्या गावाकडे जर कुणी या वह्या पहिल्या तर म्हणतील, "साधी दारू सोडायची! तर त्यासाठी एवढा खटाटोप कशाला?"
साधा मनावर कंट्रोल असला की पुरे!!
हेही खरेच आहे. पण त्याशिवाय माझुई छोटी बहिण म्हणते त्याप्रमाणे, तुला काही झाले नाही, होत नाही, तुला आलाय माज!!
हे देखील तितकेच खरे!!!

नमस्कार,
सगळं कळतंय ते बरं आहे!
आपले विचार किंवा दृष्टीकोन बदलला आहे असं आपण म्हणतो तर मग ते कसं?  ते सांगू शकाल का?
तुमच्या प्राथमिकता कोणत्या आहेत, ते जरा विचार करून ठेवा. आपण बोलू.

वैशाली मॅडम

No comments:

Post a Comment

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....